शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

मारक कायद्यांनीच घोटला शेतीचा गळा !

By सुधीर महाजन | Updated: June 20, 2019 19:41 IST

शेतीमध्ये गुंतवणूक वाढल्याशिवाय ती गतिमान होणार नाही, म्हणून मूलभूत बदल अपेक्षित आहेत.

- सुधीर महाजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या पाच वर्षांत शेतीक्षेत्राकडे दुर्लक्ष झाले. देशातील शेतकरी नाराज होता. तो भाजपला मतदान करणार नाही, असे वातावरण होते. इतकेच नव्हे, तर लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी देशभरातील शेतकऱ्यांनी राजधानीत मोर्चा काढून असंतोष प्रकट केला होता. या पार्श्वभूमीवरही शेतकऱ्यांची मते भाजपच्या पारड्यात पडली. त्याच वेळी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात कृषी उत्पन्न बाजार समिती व जीवनावश्यक वस्तू कायदा, या दोन्ही गोष्टी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. पुन्हा सत्तेवर येताच मोदींनी तातडीने गेल्या आठवड्यात ‘नीति आयोग’ व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही निर्णय घेतले. २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्यासाठी शेतीक्षेत्राला गती देणे आणि रोजगारनिर्मिती, उत्पादन वाढ, क्रयशक्तीत वाढ करणे अपरिहार्य असल्याने या सगळ्या अंगांनी काही निर्णय घेतले. परवाच्या बैठकीतील पहिला महत्त्वाचा निर्णय जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करणे, शेतमाल वाहतुकीचे जाळे बळकट करणे, शेतमाल खरेदी यंत्रणा गतिमान करणे, विक्रीव्यवस्था सुधारणे आणि प्रक्रिया उद्योग वाढवणे, असे हे निर्णय आहेत. यामुळे शेतीक्षेत्राचा कायापालट होऊ शकतो; परंतु त्यासाठी शेतीच्या मूलभूत दुखण्यावर इलाज करावा लागेल; पण नेमकी तीच गोष्ट दुर्लक्षित राहिली. शेतीच्या व्यापार प्रक्रियेचा विचार करताना मूळ शेतीचाच विसर पडला.

शेतीमध्ये गुंतवणुकीचा अभाव आहे. कारण धारण क्षमता कमी आहे. दोन-पाच एकरांत गुंतवणूक होत नाही. यातील मुख्य अडसर हा कमाल जमीनधारणा कायदा आहे. या कायद्यातील कलम ४७ अन्वये काही क्षेत्रांना म्हणजे कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था आदींना या कायद्यातून वगळले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही यातून वगळले, तर त्याचे परिणाम दिसतील. छोटे शेतकरी कंपनी स्थापन करून क्षेत्र वाढवू शकतील. कंपनी असेल तर गुंतवणूक वाढेल. भागीदारी तत्त्वाची ही कंपनी केवळ उत्पादनच करणार नाही, तर शेतमालाच्या प्रक्रियेसाठी उद्योग उभारतील. त्यातून रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे उभे राहील. कंपनी म्हटल्यानंतर आज बँका शेतीकर्ज वाटपाविषयी उदासीन आहेत, तर याच बँका पतपुरवठ्यासाठी पुढे येतील. शिवाय खाजगी उद्योग ही यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त होईल; पण यासाठी सर्वात मोठा अडथळा हा कमाल जमीनधारणा कायद्याचा आहे.

जीवनावश्यक वस्तू कायदा हा एक मोठा अडथळा आहे. या कायद्याचा लाभ यादीतील उत्पादनाचा हमी भाव एवढाच असला तरी त्याचा शेतकऱ्यांना कधीच फायदा झालेला नाही. कांद्याचेच उदाहरण घेतले, तर कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा आहारात नसेल, तर त्याचे दुष्परिणामही नाहीत; पण केवळ राजकीय बुद्धीने कांद्याचा समावेश या यादीत केला गेला; पण हमीभावाचा फायदा शेतकऱ्यांना आजवर झालेला नाही. उलट जीवनावश्यक वस्तू कायदाच रद्द केला, तर सरकारचे एक मंत्रालयच बंद होऊ शकते. शेतमाल आयातीचा प्रश्न निकाली लागतो. खुल्या अर्थधोरणानुसार शेतकरी कोणताही माल बाहेर देशात पाठवू शकतो; पण सरकारला ते करायचे नाही. जमीनधारणाच दोन-पाच एकर असल्याने प्रक्रिया उद्योग उभारले जात नाहीत. आज केवळ दहा टक्के शेतमालावरच प्रक्रिया होते, तर ४० टक्के माल हा खराब होतो. हे नुकसान टाळता येईल. यातून ग्रामीण भागात उद्योग उभे राहतील. पंतप्रधानांच्या घोषणेचा विचार केला, तर शेतीचाच मूलभूत ढाचा बदलण्याची गरज आहे. त्यावर वरवरचे उपचार उपयोगाचे नाहीत. शेतीमध्ये गुंतवणूक वाढल्याशिवाय ती गतिमान होणार नाही, म्हणून मूलभूत बदल अपेक्षित आहेत. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र