शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मारक कायद्यांनीच घोटला शेतीचा गळा !

By सुधीर महाजन | Updated: June 20, 2019 19:41 IST

शेतीमध्ये गुंतवणूक वाढल्याशिवाय ती गतिमान होणार नाही, म्हणून मूलभूत बदल अपेक्षित आहेत.

- सुधीर महाजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या पाच वर्षांत शेतीक्षेत्राकडे दुर्लक्ष झाले. देशातील शेतकरी नाराज होता. तो भाजपला मतदान करणार नाही, असे वातावरण होते. इतकेच नव्हे, तर लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी देशभरातील शेतकऱ्यांनी राजधानीत मोर्चा काढून असंतोष प्रकट केला होता. या पार्श्वभूमीवरही शेतकऱ्यांची मते भाजपच्या पारड्यात पडली. त्याच वेळी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात कृषी उत्पन्न बाजार समिती व जीवनावश्यक वस्तू कायदा, या दोन्ही गोष्टी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. पुन्हा सत्तेवर येताच मोदींनी तातडीने गेल्या आठवड्यात ‘नीति आयोग’ व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही निर्णय घेतले. २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्यासाठी शेतीक्षेत्राला गती देणे आणि रोजगारनिर्मिती, उत्पादन वाढ, क्रयशक्तीत वाढ करणे अपरिहार्य असल्याने या सगळ्या अंगांनी काही निर्णय घेतले. परवाच्या बैठकीतील पहिला महत्त्वाचा निर्णय जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करणे, शेतमाल वाहतुकीचे जाळे बळकट करणे, शेतमाल खरेदी यंत्रणा गतिमान करणे, विक्रीव्यवस्था सुधारणे आणि प्रक्रिया उद्योग वाढवणे, असे हे निर्णय आहेत. यामुळे शेतीक्षेत्राचा कायापालट होऊ शकतो; परंतु त्यासाठी शेतीच्या मूलभूत दुखण्यावर इलाज करावा लागेल; पण नेमकी तीच गोष्ट दुर्लक्षित राहिली. शेतीच्या व्यापार प्रक्रियेचा विचार करताना मूळ शेतीचाच विसर पडला.

शेतीमध्ये गुंतवणुकीचा अभाव आहे. कारण धारण क्षमता कमी आहे. दोन-पाच एकरांत गुंतवणूक होत नाही. यातील मुख्य अडसर हा कमाल जमीनधारणा कायदा आहे. या कायद्यातील कलम ४७ अन्वये काही क्षेत्रांना म्हणजे कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था आदींना या कायद्यातून वगळले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही यातून वगळले, तर त्याचे परिणाम दिसतील. छोटे शेतकरी कंपनी स्थापन करून क्षेत्र वाढवू शकतील. कंपनी असेल तर गुंतवणूक वाढेल. भागीदारी तत्त्वाची ही कंपनी केवळ उत्पादनच करणार नाही, तर शेतमालाच्या प्रक्रियेसाठी उद्योग उभारतील. त्यातून रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे उभे राहील. कंपनी म्हटल्यानंतर आज बँका शेतीकर्ज वाटपाविषयी उदासीन आहेत, तर याच बँका पतपुरवठ्यासाठी पुढे येतील. शिवाय खाजगी उद्योग ही यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त होईल; पण यासाठी सर्वात मोठा अडथळा हा कमाल जमीनधारणा कायद्याचा आहे.

जीवनावश्यक वस्तू कायदा हा एक मोठा अडथळा आहे. या कायद्याचा लाभ यादीतील उत्पादनाचा हमी भाव एवढाच असला तरी त्याचा शेतकऱ्यांना कधीच फायदा झालेला नाही. कांद्याचेच उदाहरण घेतले, तर कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा आहारात नसेल, तर त्याचे दुष्परिणामही नाहीत; पण केवळ राजकीय बुद्धीने कांद्याचा समावेश या यादीत केला गेला; पण हमीभावाचा फायदा शेतकऱ्यांना आजवर झालेला नाही. उलट जीवनावश्यक वस्तू कायदाच रद्द केला, तर सरकारचे एक मंत्रालयच बंद होऊ शकते. शेतमाल आयातीचा प्रश्न निकाली लागतो. खुल्या अर्थधोरणानुसार शेतकरी कोणताही माल बाहेर देशात पाठवू शकतो; पण सरकारला ते करायचे नाही. जमीनधारणाच दोन-पाच एकर असल्याने प्रक्रिया उद्योग उभारले जात नाहीत. आज केवळ दहा टक्के शेतमालावरच प्रक्रिया होते, तर ४० टक्के माल हा खराब होतो. हे नुकसान टाळता येईल. यातून ग्रामीण भागात उद्योग उभे राहतील. पंतप्रधानांच्या घोषणेचा विचार केला, तर शेतीचाच मूलभूत ढाचा बदलण्याची गरज आहे. त्यावर वरवरचे उपचार उपयोगाचे नाहीत. शेतीमध्ये गुंतवणूक वाढल्याशिवाय ती गतिमान होणार नाही, म्हणून मूलभूत बदल अपेक्षित आहेत. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र