शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
6
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
7
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
8
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
9
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
10
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
11
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
12
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
13
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
14
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
15
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
16
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
17
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
18
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
19
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
20
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव

अवकाळीचा कहर; हजारो हेक्टरवरील पिकांची, फळबागांची नासाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 11:19 IST

हजारो हेक्टरवरील पिकांची, फळबागांची नासाडी झाली. शेतीच्या कामात मग्न असलेल्या आणि वादळवारे पाहून झाडांच्या आश्रयाला गेलेल्या कित्येक शेतमजुरांच्या अंगावर विजा कोसळून त्यांचा करुण अंत झाला. शिवाय, किती मुक्या प्राण्यांचे जीव गेले, किती झाडे जमीनदोस्त झाली याची तर मोजदादच नाही.

दरवर्षी मृग नक्षत्राकडे डोळे लावून बसणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यांत यंदा अवकाळी पावसाने पाणी आणले आहे. अवकाळी पाऊस असो की पाहुणा, कोणालाच हवासा नसतो. तो अनाहुतपणे आला की तारांबळ उडते. तशी ती सध्या शेतकऱ्यांची उडाली आहे. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांची काढणी आणि नंतरच्या मशागतीची सगळी कामे शिल्लक असताना अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या आणि काढून मळणीसाठी ठेवलेल्या पिकांचा अक्षरश: चिखल झाला. हजारो हेक्टरवरील पिकांची, फळबागांची नासाडी झाली. शेतीच्या कामात मग्न असलेल्या आणि वादळवारे पाहून झाडांच्या आश्रयाला गेलेल्या कित्येक शेतमजुरांच्या अंगावर विजा कोसळून त्यांचा करुण अंत झाला. शिवाय, किती मुक्या प्राण्यांचे जीव गेले, किती झाडे जमीनदोस्त झाली याची तर मोजदादच नाही.

पारनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आठ एकरवर हरभरा घेतला. पण, काढणीच्या आधीच गारांचा मारा झाला आणि संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले. पीकविमा मंजूर व्हायच्या आधीच बँकेकडून कर्ज वसुलीची नोटीस आली! ही कथा महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची आहे. मृग, आर्द्रा या नक्षत्री पावसामुळे रान आबादान होण्यापूर्वीच या अवकाळीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लावला आहे. ही सगळी धूळधाण पाहून यंदा पावशा नावाचा पक्षीदेखील ‘पेरते व्हा’ची हाक देईल की नाही, शंकाच आहे. अलीकडच्या काळात शेती आणि शेतकरी कायमच अस्मानी आणि सुलतानी संकटाचे  बळी ठरत आहेत. कधी-कधी ऋतूनिहाय चांगला पाऊस पडतो. पेराल ते उगवते. भरपूर पिकते. पण, बाजारात ते कवडीमोल भावात विकावे लागते. शेतीमालाच्या विक्री व्यवस्थापनातील वाढत्या हस्तक्षेपामुळे कष्टाने पिकविलेल्या धान्याचे योग्य मोजमाप होईलच याची शाश्वती नाही. शिवाय, संकटकाळात शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार नावाची व्यवस्था धावून येईलच असेही नाही. निवडणूक काळात केलेल्या घोषणांचा जिथे विसर पडतो, तिथे अवकाळीसारख्या संकटात मदत मिळेलच, याची काय ‘गॅरंटी’? अवकाळीने हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी केली असली तरी अजून नुकसानीचे पंचनामे सुरू झाल्याचे अथवा तसे आदेश निघाल्याचे ऐकिवात नाही. यथावकाश निघतीलही, पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. कारण अवकाळीने केवळ रब्बीच नव्हे तर येत्या खरीप हंगामावरदेखील पाणी फेरले आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर खरिपाची पेरणी कशी होणार? केवळ  शाश्वत आणि हवामानपूरक शेती करा, एवढा उपदेश करून भागणार नाही. गरजेप्रसंगी मदतीचा हात पुढे करावा लागेल. कारण आता दावलगावच्या शेतकऱ्यांची स्पर्धा केवळ धारणीच्या  शेतकऱ्यांशी नव्हे तर कॅलिफोर्नियातील कॉर्पोरेट फार्मरशी आहे. तिथलाही निसर्ग लहरी आहे. पण, सरकारचे पाठबळ भक्कम असल्याने तिकडच्या शेतकऱ्यांस  असल्या अवकाळीची पर्वा नसते. त्यात  निसर्ग स्वतःची भाषा बदलतो आहे.

ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणीय असमतोल, वाढते प्रदूषण आणि झपाट्याने होत असलेले शहरीकरण यामुळे ऋतूंची घडी विस्कटली आहे. त्यातून आलेले हे ‘अवकाळी’ संकट केवळ कृषी अर्थव्यवस्था आणि कृषक समाजापुरते मर्यादित नसून, एकूणच मानवजातीसाठी ती एक भयसूचक चाहूल मानायला हवी. पूर्वी हवामानाचे चक्र ठरलेले होते. जूनमध्ये पावसाळा, ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस आणि मग थंडी. पण, आता निसर्गच्रकाची दिशा बदलत चालली आहे. एप्रिल-मेमध्ये एकीकडे सूर्य आग ओकत असतानाच अचानक आभाळ भरून येते आणि कुठे गारपीट, तर कुठे वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस पडतो. हवामानातील बदल, जागतिक तापमानवाढ, हवामानचक्रातील अडथळे आणि प्रदूषण आदी कारणे या अवकाळी संकटामागे असली तरी निसर्गात होत असलेला अमर्याद मानवी हस्तक्षेप यास मुख्यत्वे कारणीभूत आहे, यावर जगभरातील तज्ज्ञांचे एकमत आहे.

‘ग्लोबल वाॅर्मिंग’ हा शब्द आता केवळ परिषदा आणि परिसंवादापुरता मर्यादित राहिलेला नाही. तुमच्या-आमच्या जगण्यावरदेखील त्याचे थेट परिणाम जाणवू लागले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर जग बदलण्याचे भलेही दावे केले जात असले तरी निसर्गापुढे सारे काही फिके आहे, हेच खरे. आभाळाला दोष देऊन तरी काय होणार? मूठभरांच्या चंगळवादाने जगाच्या पोशिंद्यावर आणलेल्या या ‘अवकाळी’ संकटावर अजून तरी अक्सीर इलाज सापडलेला नाही.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी