शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

अवकाळीचा कहर; हजारो हेक्टरवरील पिकांची, फळबागांची नासाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 11:19 IST

हजारो हेक्टरवरील पिकांची, फळबागांची नासाडी झाली. शेतीच्या कामात मग्न असलेल्या आणि वादळवारे पाहून झाडांच्या आश्रयाला गेलेल्या कित्येक शेतमजुरांच्या अंगावर विजा कोसळून त्यांचा करुण अंत झाला. शिवाय, किती मुक्या प्राण्यांचे जीव गेले, किती झाडे जमीनदोस्त झाली याची तर मोजदादच नाही.

दरवर्षी मृग नक्षत्राकडे डोळे लावून बसणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यांत यंदा अवकाळी पावसाने पाणी आणले आहे. अवकाळी पाऊस असो की पाहुणा, कोणालाच हवासा नसतो. तो अनाहुतपणे आला की तारांबळ उडते. तशी ती सध्या शेतकऱ्यांची उडाली आहे. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांची काढणी आणि नंतरच्या मशागतीची सगळी कामे शिल्लक असताना अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या आणि काढून मळणीसाठी ठेवलेल्या पिकांचा अक्षरश: चिखल झाला. हजारो हेक्टरवरील पिकांची, फळबागांची नासाडी झाली. शेतीच्या कामात मग्न असलेल्या आणि वादळवारे पाहून झाडांच्या आश्रयाला गेलेल्या कित्येक शेतमजुरांच्या अंगावर विजा कोसळून त्यांचा करुण अंत झाला. शिवाय, किती मुक्या प्राण्यांचे जीव गेले, किती झाडे जमीनदोस्त झाली याची तर मोजदादच नाही.

पारनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आठ एकरवर हरभरा घेतला. पण, काढणीच्या आधीच गारांचा मारा झाला आणि संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले. पीकविमा मंजूर व्हायच्या आधीच बँकेकडून कर्ज वसुलीची नोटीस आली! ही कथा महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची आहे. मृग, आर्द्रा या नक्षत्री पावसामुळे रान आबादान होण्यापूर्वीच या अवकाळीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लावला आहे. ही सगळी धूळधाण पाहून यंदा पावशा नावाचा पक्षीदेखील ‘पेरते व्हा’ची हाक देईल की नाही, शंकाच आहे. अलीकडच्या काळात शेती आणि शेतकरी कायमच अस्मानी आणि सुलतानी संकटाचे  बळी ठरत आहेत. कधी-कधी ऋतूनिहाय चांगला पाऊस पडतो. पेराल ते उगवते. भरपूर पिकते. पण, बाजारात ते कवडीमोल भावात विकावे लागते. शेतीमालाच्या विक्री व्यवस्थापनातील वाढत्या हस्तक्षेपामुळे कष्टाने पिकविलेल्या धान्याचे योग्य मोजमाप होईलच याची शाश्वती नाही. शिवाय, संकटकाळात शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार नावाची व्यवस्था धावून येईलच असेही नाही. निवडणूक काळात केलेल्या घोषणांचा जिथे विसर पडतो, तिथे अवकाळीसारख्या संकटात मदत मिळेलच, याची काय ‘गॅरंटी’? अवकाळीने हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी केली असली तरी अजून नुकसानीचे पंचनामे सुरू झाल्याचे अथवा तसे आदेश निघाल्याचे ऐकिवात नाही. यथावकाश निघतीलही, पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. कारण अवकाळीने केवळ रब्बीच नव्हे तर येत्या खरीप हंगामावरदेखील पाणी फेरले आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर खरिपाची पेरणी कशी होणार? केवळ  शाश्वत आणि हवामानपूरक शेती करा, एवढा उपदेश करून भागणार नाही. गरजेप्रसंगी मदतीचा हात पुढे करावा लागेल. कारण आता दावलगावच्या शेतकऱ्यांची स्पर्धा केवळ धारणीच्या  शेतकऱ्यांशी नव्हे तर कॅलिफोर्नियातील कॉर्पोरेट फार्मरशी आहे. तिथलाही निसर्ग लहरी आहे. पण, सरकारचे पाठबळ भक्कम असल्याने तिकडच्या शेतकऱ्यांस  असल्या अवकाळीची पर्वा नसते. त्यात  निसर्ग स्वतःची भाषा बदलतो आहे.

ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणीय असमतोल, वाढते प्रदूषण आणि झपाट्याने होत असलेले शहरीकरण यामुळे ऋतूंची घडी विस्कटली आहे. त्यातून आलेले हे ‘अवकाळी’ संकट केवळ कृषी अर्थव्यवस्था आणि कृषक समाजापुरते मर्यादित नसून, एकूणच मानवजातीसाठी ती एक भयसूचक चाहूल मानायला हवी. पूर्वी हवामानाचे चक्र ठरलेले होते. जूनमध्ये पावसाळा, ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस आणि मग थंडी. पण, आता निसर्गच्रकाची दिशा बदलत चालली आहे. एप्रिल-मेमध्ये एकीकडे सूर्य आग ओकत असतानाच अचानक आभाळ भरून येते आणि कुठे गारपीट, तर कुठे वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस पडतो. हवामानातील बदल, जागतिक तापमानवाढ, हवामानचक्रातील अडथळे आणि प्रदूषण आदी कारणे या अवकाळी संकटामागे असली तरी निसर्गात होत असलेला अमर्याद मानवी हस्तक्षेप यास मुख्यत्वे कारणीभूत आहे, यावर जगभरातील तज्ज्ञांचे एकमत आहे.

‘ग्लोबल वाॅर्मिंग’ हा शब्द आता केवळ परिषदा आणि परिसंवादापुरता मर्यादित राहिलेला नाही. तुमच्या-आमच्या जगण्यावरदेखील त्याचे थेट परिणाम जाणवू लागले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर जग बदलण्याचे भलेही दावे केले जात असले तरी निसर्गापुढे सारे काही फिके आहे, हेच खरे. आभाळाला दोष देऊन तरी काय होणार? मूठभरांच्या चंगळवादाने जगाच्या पोशिंद्यावर आणलेल्या या ‘अवकाळी’ संकटावर अजून तरी अक्सीर इलाज सापडलेला नाही.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी