शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
2
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
3
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
4
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
5
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
6
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
7
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
8
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
9
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
10
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
11
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
12
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
13
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
14
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
15
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
16
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
17
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
18
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
19
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
20
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो

अभूतपूर्व जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 1:34 AM

मुंबईच्या ऐतिहासिक गवालीया टँक म्हणजे आजच्या आॅगस्ट क्रांती मैदानात ९ आॅगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महाअधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देणारा ‘चले जाव, छोडो भारत’ ठराव झाला.

- उल्हास पवारमुंबईच्या ऐतिहासिक गवालीया टँक म्हणजे आजच्या आॅगस्ट क्रांती मैदानात ९ आॅगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महाअधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देणारा ‘चले जाव, छोडो भारत’ ठराव झाला आणि संपूर्ण भारत देश इंग्रजी सत्तेविरुद्ध पेटून उठला. या घटनेला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली. एक सामान्य अशक्त प्रकृतीचा, परंतु सशक्त मनाचे महात्मा गांधी ‘करो या मरो’चा नारा देतात आणि लक्षावधी लोक कशाची तमा न बाळगता, सत्याग्रहात सक्रिय सामील होतात, ही जगातील अभूतपूर्व घटना.या आंदोलनात ४0 लाखांपेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली. शेवटी जागा पुरल्या नाहीत, म्हणून अटक करणे ब्रिटिशांनी थांबविले. ती त्यांची अवस्था झाली. इंग्रज हादरून गेले आणि स्वराज्याची पहाट जवळ आली. इतिहासाची ही पाने चाळताना मन आणि ऊरही भरून येतो. अक्षरश: हजारो माणसांचे बलिदान झाले. असंख्य लोक भूमिगत झाले. गावागावांत क्रांतीची मशाल फिरू लागली. इन्कलाब जिंदाबाद, आझाद हिंद जिंदाबाद, राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय, भारत माता की जय या घोषणांनी भारत दुमदुमून गेला. हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई, दलित आदी सर्व जातींचे धर्माचे आपली सर्व मतभेद विसरून, एका तिरंगा झेंडा खाली एका दिलाने उभे राहिले आणि सत्याग्रहाच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने कुठलीही हिंसक घटना न होता झालेले जगातील एकमेव आंदोलन केले गेले.अर्थात, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली १८८५ पासून देशातील अभूतपूर्व ऐक्याचे दर्शन अनेक घटनांमधून भारताने पाहिले आहे. विशेषत: लोकमान्य टिळक, डॉ. गोपालकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, फिरोजशा मेहता, लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल आणि १९१५ला राष्ट्रपिता महात्मा गांधी आफ्रिकेतून आले आणि स्वातंत्र्य आंदोलनाची चळवळ अधिक प्रभावी होत गेली. पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. त्या संघर्षातील टप्पा म्हणजे ९ आॅगस्ट १९४२ अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात झालेला ‘चले जाव’ प्रस्ताव. या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता, अधिवेशनाच्या पूर्व तयारीला सेवाग्राम वर्धा या ठिकाणी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीत या ठरावाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी म. गांधींनी मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद या तिघांवर जबाबदारी सोपविली. तिघांनाही आपापल्या परीने प्रस्ताव तयार केले. वर्किंग कमिटीत सादर केले. विशेष म्हणजे, या तिघांनी आपल्यापेक्षा दुसºयाने प्रस्ताव किती चांगला आहे ते सांगितले आणि तिघांच्याही प्रस्तावातून मुद्दे एकत्र करून, ८ आॅगस्ट १९४२ गवाली टँकवर मध्यरात्री १२ वाजल्यानंतर हा प्रस्ताव प्रचंड जयघोषामध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. रात्री १२ नंतर बराच वेळ चर्चा झाली. त्यामुळे ९ आॅगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो.लोकशाही, अहिंसा आणि सत्याग्रह या तीन शब्दांचा क्रियाशील अर्थ सर्व दुनियेने पाहिला. त्यागाची परिसीमा म्हणजे काय, याचे दर्शन जगाला झाले. त्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण करीत असताना, त्या क्रांती मैदानाच्या भूमीला वंदन करीत असताना, आज आम्ही कुठे आहोत? लोकशाही, समता, बंधू भाव, सर्वधर्म समभाव, सहिष्णुता, ऐक्य, देशाचे सार्वभौमत्व, अखंडत्व या शब्दांचे अर्थ, आशय याची बूज राखली जाते का? कायदा व सुव्यवस्था आबाधित आहे काय? या शंका मनाला वेदना देतात. या हुतात्म्यांना वंदन करताना आमची मान लाजेने झुकावी, अशा अनेक दुर्दैवी घटना देशात घडत आहेत. आपण शपथ घेतली पाहिजे की, ज्या स्वातंत्र्यासाठी, ज्या स्वराज्यासाठी, सुराज्यासाठी आपण त्याग केला, त्या मूल्यांसाठी आम्ही कटिबद्ध राहू. देशातील असे एकही गाव शिल्लक नव्हते, जिथे हे आंदोलन पोहोचले नाही. असा हा ऐतिहासिक क्रांती दिन. (लेखक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.)