शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नेते आणि पोलिसांचे वर्तन विपरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:34 IST

दुर्दैवाने सध्याचे नेते आणि पोलीस अधिकाºयांना आपापल्या मूळ भूमिकेचाच विसर पडल्याचे जातीय दंगली आणि त्यानंतर होणा-या कारवाईकडे पाहताना दिसून येते. इतिहासातील घटना पाहिल्या तर त्या काळात महापुरुषांनी धर्मभेद आणि जातीभेद केला नव्हता असेच दिसून येते.

-  सुधाकर सुराडकरदुर्दैवाने सध्याचे नेते आणि पोलीस अधिकाºयांना आपापल्या मूळ भूमिकेचाच विसर पडल्याचे जातीय दंगली आणि त्यानंतर होणा-या कारवाईकडे पाहताना दिसून येते. इतिहासातील घटना पाहिल्या तर त्या काळात महापुरुषांनी धर्मभेद आणि जातीभेद केला नव्हता असेच दिसून येते. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खरी शिकवण त्यांच्या अनुयायी म्हणविणाºयांना समजलीच नाही, असे स्पष्ट करणाºया घटना घडताहेत. शिवाजी महाराजांचे कार्य उत्तुंग होते. स्वराज्य उभारणीत त्यांच्यासोबत सर्वच जातीधर्मांचे लोक होते. तर त्यांना त्रास देणाºयांमध्ये काही मराठे सरदारही होते. स्वराज्यावर चाल करून येणाºया अफजल खानासोबत काही हिंदूंचाही समावेश होता. म्हणजे तेव्हा जाती आणि धर्मभेद नव्हता, असेच दिसून येते. शिवाजी महाराज अत्याचारी मोघलांविरोधात होते. त्याबरोबर जातीय दंगलीत सहभागी होणाºयांना आंबेडकरवादी म्हणताच येणार नाही.सध्या गरज आहे ती समस्त तरुणवर्गाला योग्य दिशा देण्याची. त्यात मोठी जबाबदारी आहे ती त्या त्या समाजाचे नेते आणि पोलीस अधिकाºयांचीही. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर काही तरुण मला भेटायला आले. म्हणाले, दंगलीनंतर पोलीस आमच्यावर अत्याचार करताहेत. मी त्यांना समजावून सांगितले, तुम्ही पोलिसांना संधी दिलीत. आता बहुतांशी पोलीस दीनदुबळ्यांविरुद्ध असतात, हे वास्तव आहे. डॉ. बाबासाहेबांचे नाव घेत हिंसाचार करणे चुकीचे आहे. कारण घटनेचे पालन करा, सरकारी मालमत्तेचे नुकसान करू नका असेच त्यांची विचारधारा सांगते. मग तुमचे वर्तन त्याविरोधात नाही का? निषेध जरूर व्यक्त करा, पण तो सनदशीर मार्गाने. माझे हे म्हणणे त्यांना पटले.कधी पोलीस प्रकरण अंगावर शेकेपर्यंत कारवाईच करीत नाहीत. अंगावर शेकले की मग अतिरेकी कारवाई करायची, असे प्रकार घडतात. घरात शिरून मारहाण करणे, अटक केलेल्यांवर चुकीची कलमे लावणे, असे उपद्व्याप पोलीस करतात; आणि मग त्यातून वातावरण आणखीनच बिघडत जाते. याला कारणीभूत नेतेमंडळीही आहेत. योग्य वेळी योग्य भूमिका घ्यायची नाही. सोयीचीच भूमिका घ्यायची, असे राज्यकर्त्यांकडून घडते. देशहित जपायचे तर कायद्याचेच राज्य पाहिजे. ‘जो कायदा तोडतो, त्याच्यावर कडक कारवाई’ हे सूत्र ठेवले तर समाजात योग्य संदेश पसरतो. पोलिसांच्या बाबतीत तर आता इतकी वाईट परिस्थिती आहे की, राज्यकर्त्यांना काय वाटू शकते हे गृहीत धरूनच त्याला पूरक अशी कारवाई उतावीळपणे केली जाते. वास्तविक कधीकधी राज्यकर्त्यांना ते अभिप्रेतही नसते. पण पोलिसांनी तशी कारवाई केल्याने राज्यकर्त्यांबाबतही गैरसमज पसरत जातात.जातीय दंगलीतील आरोपींवर कारवाई करतानाही त्यांना त्यांच्या कृत्यांचे दूरगामी दुष्परिणाम समजावून दिले, कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली तर आरोपी पुढील काळात तशा कृत्यांपासून परावृत्त होतात आणि पोलिसांबाबत त्यांच्या मनात आकस राहत नाही, हे मी स्वत: पोलिसी सेवेत अनुभवले आहे.आपल्या स्वार्थासाठी समाजात द्वेष पसरविणाºयांना मुळापासून उखडून काढण्यासाठी राज्यकर्त्यांनी तशी ठोस भूमिका घेणे आणि त्यासाठी पोलिसांना कारवाई करण्यासाठी स्वातंत्र्य देणे महत्त्वाचे आहे. समाजाला दिशा देण्याची जबाबदारी असलेले नेते, त्यांच्या आदेशावरून कार्यवाही करणारे उच्चपदस्थ पोलीस आणि अंमलबजावणी करणारे निम्नस्तरातील पोलीस अशा उतरंडीने आपापल्या भूमिका चोखपणे बजावल्या तर निश्चितच समाजात सौहार्द आणि सलोख्याचे वातावरण निर्माण होईल.(लेखक हे निवृत्त पोलीस महानिरीक्षक आहेत.)

टॅग्स :Policeपोलिस