शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

समान नागरी कायदा: बोलणे फार आणि कृती शून्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 08:05 IST

काहीही कृती न करता, मांडणीत सातत्य न ठेवता केवळ विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यासाठी भाजप समान नागरी कायद्याचे शस्त्र उगारून दाखवतो आहे.

पवन वर्माराजकीय विषयाचे विश्लेषक

काहीही कृती न करता, मांडणीत सातत्य न ठेवता केवळ विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यासाठी भाजप समान नागरी कायद्याचे शस्त्र उगारून दाखवतो आहे.

समान नागरी कायदा आणण्याबाबत सरकार खरोखर गंभीर आहे, की राजकीय लाभासाठी भाजपने चालवलेली ती पोपटपंची आहे? देशात समान नागरी कायदा आला तर त्याचे स्वागतच होईल; परंतु घटनेतील विविध तरतुदींत सुसंगती आणण्यासह अनेक गंभीर मुद्दे त्यात गुंतलेले आहेत. घटनेच्या ४४ व्या कलमात म्हटले आहे, 'संपूर्ण देशात समान नागरी कायदा आणण्यासाठी सरकार प्रयत्न करील.' ही तरतूद मार्गदर्शक तत्त्वांचा भाग असून त्यातील सदतिसाव्या कलमानुसार ही तत्त्वे कोणत्याही न्यायालयाकडून अंमलबजावणी करण्यायोग्य किंवा बंधनकारक नाहीत. केवळ देशाचा कारभार हाकण्यासाठी मूलभूत तत्त्व म्हणून त्याचे स्थान आहे.

मूलभूत तत्त्वांचा भाग असलेल्या कलम २५ नुसार विवेक स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे. तसेच कोणत्याही धर्माचे आचरण, प्रसार करण्याचीही मुभा हे कलम देते. कलम २६ ब नुसार सर्व धर्मांना त्यांच्या त्यांच्या धार्मिक गोष्टी सांभाळण्याची मुभा देण्यात आली आहे. लोकांना धर्माचरण, प्रचार, प्रसार करण्याचे जे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे त्याच्याशी सुसंगत अशा तरतुदी समान नागरी कायद्यात कशा करता येतील, याचे गंभीर होतील, हे उघड आहे. उत्तर भाजपने कधीही दिलेले नाही.

२०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी हा विषय पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट केला होता. परंतु केंद्रात गेली आठ वर्षे सत्ता असूनही हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणती पावले टाकली गेली? एखादा कच्चा मसुदा तयार करून चर्चा विनिमय होण्यासाठी सरकारने तो देशापुढे ठेवला, असेही झालेले नाही.

धर्माचरणाच्या बाबतीत सध्या अनेक कायदे दिसतात. हिंदू विवाह कायदा, भारतीय खिश्चन विवाह कायदा, भारतीय घटस्फोट कायदा, पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा त्याचबरोबर शरिया ही काही उदाहरणे!'

समान नागरी कायदा आणला तर विवाह, घटस्फोट, पोटगी, वारसा, दत्तक विधान या सर्व बाबतींत मुस्लीम, ख्रिश्चन पारशी आणि हिंदू (बौद्ध, शीख आणि जैन यांच्यासह) यांच्याशी निगडित अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवावे लागतील आणि त्यासाठी विद्यमान कायदे मोडीत काढावे लागतील. त्याचे परिणाम गंभीर होतील, हे उघड आहे.

भारतीय विधि आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बी. एस. चौहान यांनी संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांना ऑक्टोबर २०१६ मध्ये एक पत्र लिहिले होते. त्यावेळी मी या पक्षाबरोबर काम करीत होतो. नितीश कुमार यांनी पत्राला दिलेल्या उत्तरात म्हटले होते, 'विविध धार्मिक गट विशेषता अल्पसंख्याकांशी पुरेशी चर्चा न त्या दिशेने काहीही कृती न करता, मांडणीत सातत्य न करता, त्यांची संमती न घेता समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न समाजात संघर्ष उत्पन्न करील, आणि घटनेने दिलेल्या धर्म स्वातंत्र्याच्या हक्काची ती पायमल्ली ठरेल!'    

हे आजही तितकेच खरे आहे. केंद्राकडून प्रस्तावित असलेल्या या कायद्यात नेमके काय असेल याचा तपशील देणे गरजेचे आहे जेणेकरून या विषयाशी संबंध असलेल्यांना आपले म्हणणे मांडता येईल. अशा चर्चा विनिमयाची काही प्रक्रिया भाजपने गांभीर्याने सुरू केली आहे काय? या देशाच्या बहुधार्मिक रचनेत ती आवश्यक आहे. नोव्हेंबर २०१९ आणि मार्च २०२० मध्ये समान नागरी कायद्याबाबत विधेयक प्रस्तावित करण्यात आले. परंतु ते संसदेत कधीही आणले गेले नाही. हे असे कसे चालेल? समान नागरी कायद्याबाबतच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेची हाताळणी अत्यंत संवेदनशीलतेने करावी लागेल. सध्या मात्र ठेवता केवळ विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यासाठी भाजप त्याचा शस्त्र म्हणून वापर करीत आहे. यातून समान नागरी कायद्याचे मूल्य कमी होईल आणि एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गरजेच्या सुधारणेत राजकारण घुसेल.

टॅग्स :Indiaभारत