शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

समान नागरी कायदा: बोलणे फार आणि कृती शून्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 08:05 IST

काहीही कृती न करता, मांडणीत सातत्य न ठेवता केवळ विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यासाठी भाजप समान नागरी कायद्याचे शस्त्र उगारून दाखवतो आहे.

पवन वर्माराजकीय विषयाचे विश्लेषक

काहीही कृती न करता, मांडणीत सातत्य न ठेवता केवळ विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यासाठी भाजप समान नागरी कायद्याचे शस्त्र उगारून दाखवतो आहे.

समान नागरी कायदा आणण्याबाबत सरकार खरोखर गंभीर आहे, की राजकीय लाभासाठी भाजपने चालवलेली ती पोपटपंची आहे? देशात समान नागरी कायदा आला तर त्याचे स्वागतच होईल; परंतु घटनेतील विविध तरतुदींत सुसंगती आणण्यासह अनेक गंभीर मुद्दे त्यात गुंतलेले आहेत. घटनेच्या ४४ व्या कलमात म्हटले आहे, 'संपूर्ण देशात समान नागरी कायदा आणण्यासाठी सरकार प्रयत्न करील.' ही तरतूद मार्गदर्शक तत्त्वांचा भाग असून त्यातील सदतिसाव्या कलमानुसार ही तत्त्वे कोणत्याही न्यायालयाकडून अंमलबजावणी करण्यायोग्य किंवा बंधनकारक नाहीत. केवळ देशाचा कारभार हाकण्यासाठी मूलभूत तत्त्व म्हणून त्याचे स्थान आहे.

मूलभूत तत्त्वांचा भाग असलेल्या कलम २५ नुसार विवेक स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे. तसेच कोणत्याही धर्माचे आचरण, प्रसार करण्याचीही मुभा हे कलम देते. कलम २६ ब नुसार सर्व धर्मांना त्यांच्या त्यांच्या धार्मिक गोष्टी सांभाळण्याची मुभा देण्यात आली आहे. लोकांना धर्माचरण, प्रचार, प्रसार करण्याचे जे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे त्याच्याशी सुसंगत अशा तरतुदी समान नागरी कायद्यात कशा करता येतील, याचे गंभीर होतील, हे उघड आहे. उत्तर भाजपने कधीही दिलेले नाही.

२०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी हा विषय पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट केला होता. परंतु केंद्रात गेली आठ वर्षे सत्ता असूनही हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणती पावले टाकली गेली? एखादा कच्चा मसुदा तयार करून चर्चा विनिमय होण्यासाठी सरकारने तो देशापुढे ठेवला, असेही झालेले नाही.

धर्माचरणाच्या बाबतीत सध्या अनेक कायदे दिसतात. हिंदू विवाह कायदा, भारतीय खिश्चन विवाह कायदा, भारतीय घटस्फोट कायदा, पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा त्याचबरोबर शरिया ही काही उदाहरणे!'

समान नागरी कायदा आणला तर विवाह, घटस्फोट, पोटगी, वारसा, दत्तक विधान या सर्व बाबतींत मुस्लीम, ख्रिश्चन पारशी आणि हिंदू (बौद्ध, शीख आणि जैन यांच्यासह) यांच्याशी निगडित अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवावे लागतील आणि त्यासाठी विद्यमान कायदे मोडीत काढावे लागतील. त्याचे परिणाम गंभीर होतील, हे उघड आहे.

भारतीय विधि आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बी. एस. चौहान यांनी संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांना ऑक्टोबर २०१६ मध्ये एक पत्र लिहिले होते. त्यावेळी मी या पक्षाबरोबर काम करीत होतो. नितीश कुमार यांनी पत्राला दिलेल्या उत्तरात म्हटले होते, 'विविध धार्मिक गट विशेषता अल्पसंख्याकांशी पुरेशी चर्चा न त्या दिशेने काहीही कृती न करता, मांडणीत सातत्य न करता, त्यांची संमती न घेता समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न समाजात संघर्ष उत्पन्न करील, आणि घटनेने दिलेल्या धर्म स्वातंत्र्याच्या हक्काची ती पायमल्ली ठरेल!'    

हे आजही तितकेच खरे आहे. केंद्राकडून प्रस्तावित असलेल्या या कायद्यात नेमके काय असेल याचा तपशील देणे गरजेचे आहे जेणेकरून या विषयाशी संबंध असलेल्यांना आपले म्हणणे मांडता येईल. अशा चर्चा विनिमयाची काही प्रक्रिया भाजपने गांभीर्याने सुरू केली आहे काय? या देशाच्या बहुधार्मिक रचनेत ती आवश्यक आहे. नोव्हेंबर २०१९ आणि मार्च २०२० मध्ये समान नागरी कायद्याबाबत विधेयक प्रस्तावित करण्यात आले. परंतु ते संसदेत कधीही आणले गेले नाही. हे असे कसे चालेल? समान नागरी कायद्याबाबतच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेची हाताळणी अत्यंत संवेदनशीलतेने करावी लागेल. सध्या मात्र ठेवता केवळ विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यासाठी भाजप त्याचा शस्त्र म्हणून वापर करीत आहे. यातून समान नागरी कायद्याचे मूल्य कमी होईल आणि एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गरजेच्या सुधारणेत राजकारण घुसेल.

टॅग्स :Indiaभारत