शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पराधीन आहे जगती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:49 IST

महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाºया या देशात अजूनही असंख्य लोकांना किती लाचार, उपेक्षित आणि गरिबीचे जीणे जगावे लागते याचा कटू अनुभव दररोज कुठे ना कुठे येत असतो.

महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाºया या देशात अजूनही असंख्य लोकांना किती लाचार, उपेक्षित आणि गरिबीचे जीणे जगावे लागते याचा कटू अनुभव दररोज कुठे ना कुठे येत असतो. आपण चंद्रापर्यंत तर भरारी घेतली पण येथे राहणाºया नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचू शकलो नाही. त्यांच्या समस्या जाणू अथवा सोडवू शकलो नाही. त्यांना अजूनही मुख्य प्रवाहात आणू शकलो नाही. येथील एक खूप मोठा आदिवासी वर्ग स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतरही उपासमारी, अनारोग्य, अंधश्रद्धा आणि अशिक्षितपणाच्या अंधाºया खाईतून अद्यापही बाहेर आलेला नाही आणि अशा लोकांना मदतीचा हात देणारेही येथे क्वचितच भेटतात. त्यामुळेच मग ओडिशात एका दाना मांझीला आपल्या पत्नीचा मृतदेह रुग्णवाहिका न मिळाल्याने १२ किमी. खांद्यावर वाहून न्यावा लागतो. तर उत्तर प्रदेशात एक आजारी मुलगा वेळेत उपचार न झाल्याने आपल्या वडिलांच्या खांद्यावरच प्राण सोडतो. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी, मन अस्वस्थ करणारी घटना गेल्या आठवड्यात घडली. अमरावतीच्या मेळघाटातील दुर्गम भागातून ५५ वर्षांचा एक आदिवासी रुग्ण चांगल्या उपचाराच्या आशेने नागपुरात आला होता. मेडिकलमध्ये दाखलही झाला. परंतु दुसºया दिवशी पत्नी अचानक दिसेनासी झाल्याने प्रचंड भांबावला आणि तडक परतीच्या प्रवासाला निघाला. गाठीशी पैसे नाही. काय करणार? उपचारादरम्यान छातीतील रक्त काढण्यासाठी पोटात लावलेल्या नळीसह तब्बल ६५ किमी पायी चालत गेला. नुसत्या विचारानेच कुणाच्याही अंगावर काटा यावा. त्याने यामागील जे कारण सांगितले ते आणखी धक्कादायक आणि दुर्गम भागात राहणाºया आदिवासींच्या मनात असलेला अविश्वास दर्शविणारे तर आहेच. शिवाय त्यांच्यावर अजूनही अंधश्रद्धेचा किती पगडा आहे, हे सुद्धा अधोरेखित करणारे आहे. डॉक्टर आपल्या शरीरातील रक्त काढून विकतील आणि आपल्याला मरण येईल या भीतीने आपण नागपुरातून पळ काढल्याचे त्याचे म्हणणे आहे. बहुतांश आदिवासी अजूनही रोगांवरील उपचारासाठी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी भूमकाकडेच (मांत्रिक) जाणे पसंत करतात. त्यांचा डॉक्टरांवर अजूनही विश्वास बसलेला नाही, हे या व्यवस्थेचे अपयशच म्हणावे लागेल. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृृष्टीने त्यांना योग्य शिक्षण, आरोग्य सेवा प्रदान करण्याकरिता शासनातर्फे कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जातात. परंतु त्या या आदिवासींपर्यंत कितपत पोहोचतात, त्यांना याचा किती लाभ होतो, याबद्दलही आता शंका वाटते. परंतु शासनाने हे समजून घेतले पाहिजे की जंगलातील हा आदिवासी शहरात निर्भयपणे राहू शकेल तेव्हाच हा देश महासत्ता बनेल.