शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पराधीन आहे जगती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:49 IST

महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाºया या देशात अजूनही असंख्य लोकांना किती लाचार, उपेक्षित आणि गरिबीचे जीणे जगावे लागते याचा कटू अनुभव दररोज कुठे ना कुठे येत असतो.

महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाºया या देशात अजूनही असंख्य लोकांना किती लाचार, उपेक्षित आणि गरिबीचे जीणे जगावे लागते याचा कटू अनुभव दररोज कुठे ना कुठे येत असतो. आपण चंद्रापर्यंत तर भरारी घेतली पण येथे राहणाºया नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचू शकलो नाही. त्यांच्या समस्या जाणू अथवा सोडवू शकलो नाही. त्यांना अजूनही मुख्य प्रवाहात आणू शकलो नाही. येथील एक खूप मोठा आदिवासी वर्ग स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतरही उपासमारी, अनारोग्य, अंधश्रद्धा आणि अशिक्षितपणाच्या अंधाºया खाईतून अद्यापही बाहेर आलेला नाही आणि अशा लोकांना मदतीचा हात देणारेही येथे क्वचितच भेटतात. त्यामुळेच मग ओडिशात एका दाना मांझीला आपल्या पत्नीचा मृतदेह रुग्णवाहिका न मिळाल्याने १२ किमी. खांद्यावर वाहून न्यावा लागतो. तर उत्तर प्रदेशात एक आजारी मुलगा वेळेत उपचार न झाल्याने आपल्या वडिलांच्या खांद्यावरच प्राण सोडतो. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी, मन अस्वस्थ करणारी घटना गेल्या आठवड्यात घडली. अमरावतीच्या मेळघाटातील दुर्गम भागातून ५५ वर्षांचा एक आदिवासी रुग्ण चांगल्या उपचाराच्या आशेने नागपुरात आला होता. मेडिकलमध्ये दाखलही झाला. परंतु दुसºया दिवशी पत्नी अचानक दिसेनासी झाल्याने प्रचंड भांबावला आणि तडक परतीच्या प्रवासाला निघाला. गाठीशी पैसे नाही. काय करणार? उपचारादरम्यान छातीतील रक्त काढण्यासाठी पोटात लावलेल्या नळीसह तब्बल ६५ किमी पायी चालत गेला. नुसत्या विचारानेच कुणाच्याही अंगावर काटा यावा. त्याने यामागील जे कारण सांगितले ते आणखी धक्कादायक आणि दुर्गम भागात राहणाºया आदिवासींच्या मनात असलेला अविश्वास दर्शविणारे तर आहेच. शिवाय त्यांच्यावर अजूनही अंधश्रद्धेचा किती पगडा आहे, हे सुद्धा अधोरेखित करणारे आहे. डॉक्टर आपल्या शरीरातील रक्त काढून विकतील आणि आपल्याला मरण येईल या भीतीने आपण नागपुरातून पळ काढल्याचे त्याचे म्हणणे आहे. बहुतांश आदिवासी अजूनही रोगांवरील उपचारासाठी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी भूमकाकडेच (मांत्रिक) जाणे पसंत करतात. त्यांचा डॉक्टरांवर अजूनही विश्वास बसलेला नाही, हे या व्यवस्थेचे अपयशच म्हणावे लागेल. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृृष्टीने त्यांना योग्य शिक्षण, आरोग्य सेवा प्रदान करण्याकरिता शासनातर्फे कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जातात. परंतु त्या या आदिवासींपर्यंत कितपत पोहोचतात, त्यांना याचा किती लाभ होतो, याबद्दलही आता शंका वाटते. परंतु शासनाने हे समजून घेतले पाहिजे की जंगलातील हा आदिवासी शहरात निर्भयपणे राहू शकेल तेव्हाच हा देश महासत्ता बनेल.