शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पराधीन आहे जगती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:49 IST

महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाºया या देशात अजूनही असंख्य लोकांना किती लाचार, उपेक्षित आणि गरिबीचे जीणे जगावे लागते याचा कटू अनुभव दररोज कुठे ना कुठे येत असतो.

महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाºया या देशात अजूनही असंख्य लोकांना किती लाचार, उपेक्षित आणि गरिबीचे जीणे जगावे लागते याचा कटू अनुभव दररोज कुठे ना कुठे येत असतो. आपण चंद्रापर्यंत तर भरारी घेतली पण येथे राहणाºया नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचू शकलो नाही. त्यांच्या समस्या जाणू अथवा सोडवू शकलो नाही. त्यांना अजूनही मुख्य प्रवाहात आणू शकलो नाही. येथील एक खूप मोठा आदिवासी वर्ग स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतरही उपासमारी, अनारोग्य, अंधश्रद्धा आणि अशिक्षितपणाच्या अंधाºया खाईतून अद्यापही बाहेर आलेला नाही आणि अशा लोकांना मदतीचा हात देणारेही येथे क्वचितच भेटतात. त्यामुळेच मग ओडिशात एका दाना मांझीला आपल्या पत्नीचा मृतदेह रुग्णवाहिका न मिळाल्याने १२ किमी. खांद्यावर वाहून न्यावा लागतो. तर उत्तर प्रदेशात एक आजारी मुलगा वेळेत उपचार न झाल्याने आपल्या वडिलांच्या खांद्यावरच प्राण सोडतो. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी, मन अस्वस्थ करणारी घटना गेल्या आठवड्यात घडली. अमरावतीच्या मेळघाटातील दुर्गम भागातून ५५ वर्षांचा एक आदिवासी रुग्ण चांगल्या उपचाराच्या आशेने नागपुरात आला होता. मेडिकलमध्ये दाखलही झाला. परंतु दुसºया दिवशी पत्नी अचानक दिसेनासी झाल्याने प्रचंड भांबावला आणि तडक परतीच्या प्रवासाला निघाला. गाठीशी पैसे नाही. काय करणार? उपचारादरम्यान छातीतील रक्त काढण्यासाठी पोटात लावलेल्या नळीसह तब्बल ६५ किमी पायी चालत गेला. नुसत्या विचारानेच कुणाच्याही अंगावर काटा यावा. त्याने यामागील जे कारण सांगितले ते आणखी धक्कादायक आणि दुर्गम भागात राहणाºया आदिवासींच्या मनात असलेला अविश्वास दर्शविणारे तर आहेच. शिवाय त्यांच्यावर अजूनही अंधश्रद्धेचा किती पगडा आहे, हे सुद्धा अधोरेखित करणारे आहे. डॉक्टर आपल्या शरीरातील रक्त काढून विकतील आणि आपल्याला मरण येईल या भीतीने आपण नागपुरातून पळ काढल्याचे त्याचे म्हणणे आहे. बहुतांश आदिवासी अजूनही रोगांवरील उपचारासाठी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी भूमकाकडेच (मांत्रिक) जाणे पसंत करतात. त्यांचा डॉक्टरांवर अजूनही विश्वास बसलेला नाही, हे या व्यवस्थेचे अपयशच म्हणावे लागेल. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृृष्टीने त्यांना योग्य शिक्षण, आरोग्य सेवा प्रदान करण्याकरिता शासनातर्फे कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जातात. परंतु त्या या आदिवासींपर्यंत कितपत पोहोचतात, त्यांना याचा किती लाभ होतो, याबद्दलही आता शंका वाटते. परंतु शासनाने हे समजून घेतले पाहिजे की जंगलातील हा आदिवासी शहरात निर्भयपणे राहू शकेल तेव्हाच हा देश महासत्ता बनेल.