शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
3
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
4
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
5
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
6
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
7
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
8
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
9
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
11
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
12
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
13
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
14
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
15
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
16
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
17
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
18
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
19
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
20
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार

अनियंत्रित दहशतवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:38 IST

लक्षभेदी हल्ल्यानंतर दहशतवादी तसेच त्यांच्या आश्रयदात्यांवर वचक बसेल आणि जम्मू-काश्मिरात शांततेचा मार्ग प्रशस्त होईल, असे जे चित्र निर्माण करण्यात आले होते ते किती आभासी होते

लक्षभेदी हल्ल्यानंतर दहशतवादी तसेच त्यांच्या आश्रयदात्यांवर वचक बसेल आणि जम्मू-काश्मिरात शांततेचा मार्ग प्रशस्त होईल, असे जे चित्र निर्माण करण्यात आले होते ते किती आभासी होते हे त्यानंतरच्या काळात खो-यात वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर अधोरेखित झाले आहे. पाकिस्तानातून दहशतवाद्यांची वाढती घुसखोरी, बुरहान वाणीसारखे स्थानिक दहशतवादी, त्यांच्या पाठीशी उभे राहणारे तेथील सामान्यजन, हुरियतच्या काही फुटीरवाद्यांकडून सातत्याने सुरू असलेल्या गुप्त कारवाया आणि या सर्वांवर नियंत्रण आणताना सुरक्षा दलाची होत असलेली दमछाक ही संपूर्ण परिस्थितीच अतिशय भयावह आणि राज्याला आणीबाणीच्या दिशेने नेणारी आहे. दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाला लक्ष्य करून हे हल्ले केले जात असून यामध्ये शहीद जवानांची वाढती संख्या हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. काश्मीर खोºयात गेल्यावर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये ६८ जवान शहीद झाले होते. यावर्षी पहिल्या तीन महिन्यातच ही संख्या १३ वर पोहोचली होती. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे पोलीस वसाहतीवर दहशतवाद्यांनी केलेल्या ताज्या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार २०१६ साली १५ लष्करी तळ आणि आस्थापनांना दहशतवाद्यांनी आपले लक्ष्य केले होते. मागील दोन वर्षात सीमेवर घुसखोरीचे प्रमाणही वाढले आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार सत्तेत असताना जम्मू-काश्मिरातील जनजीवन सामान्य होऊ शकलेले नाही हे तेथील भाजपा-पीडीपी सरकारचे फार मोठे अपयश आणि त्यांना निवडून देणाºया लोकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. असे असले तरी लष्कराने मात्र राज्यातील दहशतवादावर नियंत्रणाचे आटोकाट प्रयत्न चालविले आहेत. विशेषत: आॅपरेशन आॅल आऊट सुरू झाल्यापासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या मोहिमेअंतर्गत २५८ दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली असून गेल्या १३ महिन्यात विविध दहशतवादी संघटनांच्या ५ म्होरक्यांसह ११९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यशही मिळाले आहे. परंतु या संघर्षात आपल्या जवानांना आणखी किती वर्ष असे बलिदान द्यावे लागणार आहे? काश्मीरचा प्रश्न हा राजकीय असल्याचे वेळोवेळी सांगितले जाते. मग तो सोडविण्यासाठी नेमके आणि ठोस प्रयत्न का होत नाहीत? शासनाने यामागील वास्तव आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पावले उचलायला हवीत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला