शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

अनियंत्रित दहशतवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:38 IST

लक्षभेदी हल्ल्यानंतर दहशतवादी तसेच त्यांच्या आश्रयदात्यांवर वचक बसेल आणि जम्मू-काश्मिरात शांततेचा मार्ग प्रशस्त होईल, असे जे चित्र निर्माण करण्यात आले होते ते किती आभासी होते

लक्षभेदी हल्ल्यानंतर दहशतवादी तसेच त्यांच्या आश्रयदात्यांवर वचक बसेल आणि जम्मू-काश्मिरात शांततेचा मार्ग प्रशस्त होईल, असे जे चित्र निर्माण करण्यात आले होते ते किती आभासी होते हे त्यानंतरच्या काळात खो-यात वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर अधोरेखित झाले आहे. पाकिस्तानातून दहशतवाद्यांची वाढती घुसखोरी, बुरहान वाणीसारखे स्थानिक दहशतवादी, त्यांच्या पाठीशी उभे राहणारे तेथील सामान्यजन, हुरियतच्या काही फुटीरवाद्यांकडून सातत्याने सुरू असलेल्या गुप्त कारवाया आणि या सर्वांवर नियंत्रण आणताना सुरक्षा दलाची होत असलेली दमछाक ही संपूर्ण परिस्थितीच अतिशय भयावह आणि राज्याला आणीबाणीच्या दिशेने नेणारी आहे. दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाला लक्ष्य करून हे हल्ले केले जात असून यामध्ये शहीद जवानांची वाढती संख्या हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. काश्मीर खोºयात गेल्यावर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये ६८ जवान शहीद झाले होते. यावर्षी पहिल्या तीन महिन्यातच ही संख्या १३ वर पोहोचली होती. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे पोलीस वसाहतीवर दहशतवाद्यांनी केलेल्या ताज्या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार २०१६ साली १५ लष्करी तळ आणि आस्थापनांना दहशतवाद्यांनी आपले लक्ष्य केले होते. मागील दोन वर्षात सीमेवर घुसखोरीचे प्रमाणही वाढले आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार सत्तेत असताना जम्मू-काश्मिरातील जनजीवन सामान्य होऊ शकलेले नाही हे तेथील भाजपा-पीडीपी सरकारचे फार मोठे अपयश आणि त्यांना निवडून देणाºया लोकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. असे असले तरी लष्कराने मात्र राज्यातील दहशतवादावर नियंत्रणाचे आटोकाट प्रयत्न चालविले आहेत. विशेषत: आॅपरेशन आॅल आऊट सुरू झाल्यापासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या मोहिमेअंतर्गत २५८ दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली असून गेल्या १३ महिन्यात विविध दहशतवादी संघटनांच्या ५ म्होरक्यांसह ११९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यशही मिळाले आहे. परंतु या संघर्षात आपल्या जवानांना आणखी किती वर्ष असे बलिदान द्यावे लागणार आहे? काश्मीरचा प्रश्न हा राजकीय असल्याचे वेळोवेळी सांगितले जाते. मग तो सोडविण्यासाठी नेमके आणि ठोस प्रयत्न का होत नाहीत? शासनाने यामागील वास्तव आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पावले उचलायला हवीत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला