शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘इनकमींग’पायी सेनेत अस्वस्थता

By admin | Updated: April 2, 2016 03:51 IST

‘भाजपा’ला शह देण्याच्या नादात शिवसेनेतील भरतीप्रक्रियेने वेग घेतला असला तरी, त्यातून उफाळून येणारी पक्षांतर्गत नाराजीच आता त्या पक्षासाठी डोकेदुखी ठरू पाहाते आहे.

- किरण अग्रवाल

‘भाजपा’ला शह देण्याच्या नादात शिवसेनेतील भरतीप्रक्रियेने वेग घेतला असला तरी, त्यातून उफाळून येणारी पक्षांतर्गत नाराजीच आता त्या पक्षासाठी डोकेदुखी ठरू पाहाते आहे.

शिवसेनेतील भरतीप्रक्रिया दिवसेंदिवस गतिमान होत असून, त्यामुळे त्या पक्षाचे बळ वाढत असल्याचा समज होणे स्वाभाविक आहे; परंतु एकीकडे ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधणीचे सोहळे पार पडत असताना दुसरीकडे पक्ष नेत्याचे पुतळे जाळून या वाढत्या ‘इनकमिंग’बद्दलचा रोषही व्यक्त होत असल्याने तो शमवण्याचीच कसरत करणे या पक्षासाठी प्राथम्याचे ठरले आहे.आणखी वर्षभरावर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवांगतुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले दरवाजे उघडे ठेवले असले तरी, शिवसेनेने त्यात अंमळ अधिकचीच आघाडी घेतली आहे. पक्ष विस्तार करून महापालिकेवर भगवा फडकवायचाच, असा निर्धार तर त्यामागे आहेच; शिवाय भाजपाला धडा शिकवण्याची ईर्षाही त्यामागे आहे. कारण, आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपला क्रमांक एकचा शत्रू मानणाऱ्या शिवसेनेला विद्यमान अवस्थेत भाजपा हीच प्रमुख विरोधक वाटू लागली आहे. नेहमी शिवसेनेच्या सोबतीने लढणाऱ्या भाजपाने गेल्या निवडणुकीत स्वबळ अजमावत, होत्या तितक्या सर्व जागा राखल्या. त्यानंतर ‘मनसे’शी हातमिळवणी करीत भाजपा पहिल्या अडीच वर्षाच्या काळात महापालिकेतील सत्तेतही सहभागी राहिली. तेव्हापासूनच भाजपा-शिवसेनेतील वितुष्ट मोठ्या प्रमाणात वाढीस लागले. त्यात केंद्र व राज्यातील सत्तेत सोबत राहूनही त्यांच्याकडील सूर जुळू न शकल्याचीही भर पडत गेली. परिणामी सरकारमधील भाजपाचे अपयश उजागर करून देण्याकरिता शिवसेनेतर्फे मोर्चा काढून त्यांच्याबद्दलची जनमानसातील नकारात्मकता वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. इतकेच नव्हे तर आतापर्यंत अस्तित्वहीन राहिलेल्या व स्वपक्षीय राजकारणात अडगळीत पडलेल्या शिवसेनेतील उत्तर महाराष्ट्रप्रमुख महिला नेत्याने स्वतंत्र मराठवाडा व विदर्भाच्या मुद्द्यावरून नाशकातील भाजपाचा महिला मेळावा उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याचीही घटना घडली. या दोन्ही पक्षांतील संघर्ष किती टोकाला गेला आहे, हेच यावरून लक्षात यावे. शिवसेनेने चालविलेल्या भरतीप्रक्रियेला-देखील या संघर्षाचीच किनार आहे. विशेष म्हणजे, आवड-निवडीची वा संबंधितांच्या प्रतिमेची कसलीही फिकीर न बाळगता शिवसेना-भाजपात आपापले बळ वाढवायचे प्रयत्न सुरू आहेत. यातही मध्यंतरी स्वाभिमान संघटनेचे रम्मी राजपूत आदि लोक भाजपात घेतले गेले, तद्नंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले सुनील बागुल व्हाया राष्ट्रवादी, भाजपात आले तसेच प्रामुख्याने भाजपाविरोधात लढून पराभूत झालेले वसंत गितेदेखील भाजपावासी झाले. त्यामुळे त्या पक्षातील निष्ठावंतांनाही ही ‘भरती’ पचनी न पडल्याचेच दिसून आले. शिवसेनेतही तेच होत आहे. ‘मनसे’चा कळस कापून आणल्याच्या अविर्भावात माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ व अन्य काही जणांना शिवबंधन बांधले गेल्यावर त्याची प्रतिक्रिया पक्षात उमटली व अखेर निष्ठावंत वा जुन्या शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही याची जाहीरपणे खात्री द्यावी लागली. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीतील मातब्बर नगरसेवक विनायक खैरे व ‘मनसे’तील नगरसेविका रत्नमाला राणे यांच्यासह विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोडून गेलेल्या डी.जी. सूर्यवंशी यांना शिवसेनेत घेतले गेले. यातील खैरेंमुळे जुन्या नाशकात पक्षाची ताकद वाढण्याचे अंदाज बांधले जात असले तरी, सूर्यवंशी यांच्या स्वगृही परतण्याने सिडकोत शिवसेनेच्या संपर्कप्रमुखाचा प्रतीकात्मक पुतळा जाळून नाराजी दर्शविली गेली आहे. सर्वात पुढे राहण्याच्या प्रयत्नाला नख लावणाराच हा प्रकार म्हटला पाहिजे. तेव्हा, ‘इनकमिंग’मुळे शिवसेनेचे बळ वाढणे अपेक्षित असताना जुन्या-निष्ठावंतांची संधी हिरावली जाण्याच्या भीतीतून नाराजी उफाळून येणार असेल तर काय मिळवले या भरतीतून, असा प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहू नये !