शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकार चेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:22 IST

ज्या क्षेत्राचा अभ्यास नाही, ज्यावर आपला अधिकार नाही आणि ज्या विषयीचे आपले ज्ञान ऐकीव कथांवर आधारले आहे त्या विषयावर आपण बोलू नये हे समजायला विशेष ज्ञान वा बुद्धी लागत नाही.

ज्या क्षेत्राचा अभ्यास नाही, ज्यावर आपला अधिकार नाही आणि ज्या विषयीचे आपले ज्ञान ऐकीव कथांवर आधारले आहे त्या विषयावर आपण बोलू नये हे समजायला विशेष ज्ञान वा बुद्धी लागत नाही. मात्र राजकारणात प्रवेश करून सत्तेवर आलेल्या माणसांचे याविषयीचे तारतम्य धूसर होते आणि मग ती कोणत्याही विषयाला आपल्या अकलेचे तारे तोडू लागते. जगाने व त्यातील विज्ञानाने मान्य केलेला चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा आहे आणि तो आपल्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात यावा हे मानवसंसाधन विभागाचे राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी औरंगाबादमध्ये केलेले वक्तव्य अशा अनाधिकार चेष्टेत समाविष्ट होणारे आहे. वर ‘मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे’ हे सांगून त्यांनी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांचाही अपमान करून टाकला आहे. डार्विनचा सिद्धांत केवळ जगन्मान्यच नाही तर त्याने ज्या धर्मश्रद्धा मोडीत काढल्या त्या श्रद्धांचे मक्तेदारही आता तो मान्य करायला सिद्ध झाले आहेत. डान ब्राऊन या अमेरिकेन कादंबरीकाराने नुकत्याच लिहिलेल्या ‘ओरिजीन’ या कादंबरीत जीवाच्या जन्माची कथा वैज्ञानिक भाषेत पण अत्यंत कलात्मक स्वरूपात लिहून या वैज्ञानिक सत्याला कलाक्षेत्राची असलेली मान्यताही जाहीर केली आहे. भूगोल, पदार्थविज्ञान किंवा समाजशास्त्र ही जशी विज्ञानाची क्षेत्रे आहेत तसे मानववंश शास्त्रही आता औषधी विज्ञानाच्या विकासामुळे शास्त्र म्हणून मान्यता पावले आहे. ‘ते शास्त्र खोटे आहे कारण आमच्या आईवडिलांनी, आजी-आजोबांनी किंवा पूर्वजांनी असे काही आम्हाला सांगितले नाही’ असे यासंदर्भात सत्यपाल सिंग म्हणत असतील तर ‘विज्ञानामुळे पुढे आलेल्या न्यूटनपासून आईन्स्टाईनपर्यंतच्या सर्व वैज्ञानिकांनी सिद्ध केलेली प्रमेयेही आपल्या पूर्वजांनी कधी सांगितली नव्हती हे त्यांना समजावून सांगावे लागेल. आजोबा आणि आजी यांनी सांगितलेल्या शिळोप्याच्या गप्पांच्या आधारे वैज्ञानिक सत्य नाकारणारा इसम आपला मानवसंसाधन मंत्री असतो हीच मुळात आपली खरी व्यथा आहे. कधी काळी नागपुरात पोलीस कमिश्नरच्या जागेवर असताना संघाशी संधान जुळविल्याने सत्यपालांना पुढे भाजपाचे तिकीट मिळाले. मात्र पोलिसांना विज्ञानाच्या क्षेत्रातही आपली दंडुकेशाही चालविण्याचा अधिकार प्राप्त होतो अशा भ्रमात राहणाºयांचे भरारीज्ञान कुठवर जाते हे कोणी सांगावे? पुरुषांनी हेल्मेट घालायचे मात्र स्त्रियांनी मोटारसायकलींवरुन जाताना आपला चेहरा रुमालाने झाकायचा नाही असा चमत्कारिक आग्रह धरणाºया या पोलीस अधिकाºयाचा विज्ञानविषयक अधिकार मर्यादित असणार हे उघड आहे. तरीही असे बोलण्याचे व डार्विनला चूक ठरविण्याचे साहस त्याच्याकडून होत असेल तर ती त्याला राजकारणाने दिलेली देणगी आहे असे म्हटले पाहिजे. सत्यपालसिंगांच्या या वक्तव्याला विरोध करणारे पत्रक देशातील शंभर प्रमुख वैज्ञानिकांनी तात्काळ काढले ही बाब येथे नोंदविण्याजोगी व महत्त्वाची आहे. सत्यपालसिंग मानवसंसाधन मंत्री असल्याने त्यांचा शिक्षणखात्याशी संबंध आहे. एखादेवेळी ते आपले डार्विनविषयीचे तर्कट शिक्षण व्यवस्थेत आणण्याचा पोलिसी आग्रह धरणारच नाहीत असे नाही. त्यामुळे त्या खात्याचे प्रमुख मंत्री प्रकाश जावडेकर यांनीच आता याविषयी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ज्या खात्याचे मंत्रिपद कधीकाळी स्मृती इराणीसारख्या पदवीशून्य बाईने भूषविले त्या खात्यात काहीही घडणे अशक्य नाही. धर्माने दिलेल्या अंधश्रद्धादेखील खºया असल्याचे सांगण्याचे व त्या आधारे विज्ञानानेच आपल्या शिकवणीत दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे हे सांगण्याचे प्रकार इतिहासात अनेकदा घडले. आपल्याकडेही रामाच्या काळातील विमाने खरी होती किंवा महाभारतातील अग्निबाण म्हणजेच अण्वस्त्र होय हे सांगण्याचे बावळट प्रकार प्रत्यक्ष जागतिक पातळीवर झालेल्या विज्ञान परिषदेतही आपल्या देशी विद्वानांनी याआधी केले आहेत. सत्यपालसिंग ही त्याच प्रकाराची पुनरावृत्ती आहे. जाता जाता एक गोष्टी आणखीही सत्यपालजींनी डार्विनला खोटे ठरवून आजी-आजोबांना खरे ठरविले म्हणून त्यांच्या पाठीशी आपल्या स्वदेशी वारकºयांचे जत्थे आता जमू नयेत एवढेच येथे सुचवायचे.

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगBJPभाजपा