शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

अनधिकार चेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:22 IST

ज्या क्षेत्राचा अभ्यास नाही, ज्यावर आपला अधिकार नाही आणि ज्या विषयीचे आपले ज्ञान ऐकीव कथांवर आधारले आहे त्या विषयावर आपण बोलू नये हे समजायला विशेष ज्ञान वा बुद्धी लागत नाही.

ज्या क्षेत्राचा अभ्यास नाही, ज्यावर आपला अधिकार नाही आणि ज्या विषयीचे आपले ज्ञान ऐकीव कथांवर आधारले आहे त्या विषयावर आपण बोलू नये हे समजायला विशेष ज्ञान वा बुद्धी लागत नाही. मात्र राजकारणात प्रवेश करून सत्तेवर आलेल्या माणसांचे याविषयीचे तारतम्य धूसर होते आणि मग ती कोणत्याही विषयाला आपल्या अकलेचे तारे तोडू लागते. जगाने व त्यातील विज्ञानाने मान्य केलेला चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा आहे आणि तो आपल्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात यावा हे मानवसंसाधन विभागाचे राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी औरंगाबादमध्ये केलेले वक्तव्य अशा अनाधिकार चेष्टेत समाविष्ट होणारे आहे. वर ‘मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे’ हे सांगून त्यांनी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांचाही अपमान करून टाकला आहे. डार्विनचा सिद्धांत केवळ जगन्मान्यच नाही तर त्याने ज्या धर्मश्रद्धा मोडीत काढल्या त्या श्रद्धांचे मक्तेदारही आता तो मान्य करायला सिद्ध झाले आहेत. डान ब्राऊन या अमेरिकेन कादंबरीकाराने नुकत्याच लिहिलेल्या ‘ओरिजीन’ या कादंबरीत जीवाच्या जन्माची कथा वैज्ञानिक भाषेत पण अत्यंत कलात्मक स्वरूपात लिहून या वैज्ञानिक सत्याला कलाक्षेत्राची असलेली मान्यताही जाहीर केली आहे. भूगोल, पदार्थविज्ञान किंवा समाजशास्त्र ही जशी विज्ञानाची क्षेत्रे आहेत तसे मानववंश शास्त्रही आता औषधी विज्ञानाच्या विकासामुळे शास्त्र म्हणून मान्यता पावले आहे. ‘ते शास्त्र खोटे आहे कारण आमच्या आईवडिलांनी, आजी-आजोबांनी किंवा पूर्वजांनी असे काही आम्हाला सांगितले नाही’ असे यासंदर्भात सत्यपाल सिंग म्हणत असतील तर ‘विज्ञानामुळे पुढे आलेल्या न्यूटनपासून आईन्स्टाईनपर्यंतच्या सर्व वैज्ञानिकांनी सिद्ध केलेली प्रमेयेही आपल्या पूर्वजांनी कधी सांगितली नव्हती हे त्यांना समजावून सांगावे लागेल. आजोबा आणि आजी यांनी सांगितलेल्या शिळोप्याच्या गप्पांच्या आधारे वैज्ञानिक सत्य नाकारणारा इसम आपला मानवसंसाधन मंत्री असतो हीच मुळात आपली खरी व्यथा आहे. कधी काळी नागपुरात पोलीस कमिश्नरच्या जागेवर असताना संघाशी संधान जुळविल्याने सत्यपालांना पुढे भाजपाचे तिकीट मिळाले. मात्र पोलिसांना विज्ञानाच्या क्षेत्रातही आपली दंडुकेशाही चालविण्याचा अधिकार प्राप्त होतो अशा भ्रमात राहणाºयांचे भरारीज्ञान कुठवर जाते हे कोणी सांगावे? पुरुषांनी हेल्मेट घालायचे मात्र स्त्रियांनी मोटारसायकलींवरुन जाताना आपला चेहरा रुमालाने झाकायचा नाही असा चमत्कारिक आग्रह धरणाºया या पोलीस अधिकाºयाचा विज्ञानविषयक अधिकार मर्यादित असणार हे उघड आहे. तरीही असे बोलण्याचे व डार्विनला चूक ठरविण्याचे साहस त्याच्याकडून होत असेल तर ती त्याला राजकारणाने दिलेली देणगी आहे असे म्हटले पाहिजे. सत्यपालसिंगांच्या या वक्तव्याला विरोध करणारे पत्रक देशातील शंभर प्रमुख वैज्ञानिकांनी तात्काळ काढले ही बाब येथे नोंदविण्याजोगी व महत्त्वाची आहे. सत्यपालसिंग मानवसंसाधन मंत्री असल्याने त्यांचा शिक्षणखात्याशी संबंध आहे. एखादेवेळी ते आपले डार्विनविषयीचे तर्कट शिक्षण व्यवस्थेत आणण्याचा पोलिसी आग्रह धरणारच नाहीत असे नाही. त्यामुळे त्या खात्याचे प्रमुख मंत्री प्रकाश जावडेकर यांनीच आता याविषयी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ज्या खात्याचे मंत्रिपद कधीकाळी स्मृती इराणीसारख्या पदवीशून्य बाईने भूषविले त्या खात्यात काहीही घडणे अशक्य नाही. धर्माने दिलेल्या अंधश्रद्धादेखील खºया असल्याचे सांगण्याचे व त्या आधारे विज्ञानानेच आपल्या शिकवणीत दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे हे सांगण्याचे प्रकार इतिहासात अनेकदा घडले. आपल्याकडेही रामाच्या काळातील विमाने खरी होती किंवा महाभारतातील अग्निबाण म्हणजेच अण्वस्त्र होय हे सांगण्याचे बावळट प्रकार प्रत्यक्ष जागतिक पातळीवर झालेल्या विज्ञान परिषदेतही आपल्या देशी विद्वानांनी याआधी केले आहेत. सत्यपालसिंग ही त्याच प्रकाराची पुनरावृत्ती आहे. जाता जाता एक गोष्टी आणखीही सत्यपालजींनी डार्विनला खोटे ठरवून आजी-आजोबांना खरे ठरविले म्हणून त्यांच्या पाठीशी आपल्या स्वदेशी वारकºयांचे जत्थे आता जमू नयेत एवढेच येथे सुचवायचे.

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगBJPभाजपा