शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

एक अनुत्तरित ‘अभिजात’ प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:21 AM

यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होत आहे. तारीखही जवळ आलेली...कालच महामंडळाच्या अध्यक्षांचं पत्र मिळालं... मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्या; अन्यथा सरकारच्या विरोधात ठराव आणू, अशी धमकीच त्यांनी दिली आहे.

- नंदकिशोर पाटीलयंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होत आहे. तारीखही जवळ आलेली...कालच महामंडळाच्या अध्यक्षांचं पत्र मिळालं... मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्या; अन्यथा सरकारच्या विरोधात ठराव आणू, अशी धमकीच त्यांनी दिली आहे...काही करून हा प्रश्न एकदाचा मार्गी लावला पाहिजे. गरज पडली तर दिल्लीत तळ ठोकू, पण संमेलनापूर्वी हे प्रकरण निस्तारून टाकले पाहिजे. बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांना जे जमलं, ते २१ व्या शतकात आपणांस जमू नये? छे!छे!! हे तर खूपच लाजिरवाणं आहे. विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळायला नको. हा ‘अभिजात’ प्रश्न आपण सोडवू शकलो नाही, तर विरोधक म्हणतील, फडणवीसांना शिवारातलं काही कळत नाहीच, पण साहित्यातलंही कळू नये? शिवाय, ते दादरकर आणि बांद्रेकर (अरे व्वा, छान टोपणनावं सुचली!) टपूनच बसलेत. कळ लावायला त्यांना मराठीचा हा मुद्दा पुरेसा आहे. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आपण जसा नकळत डबाबंद करून टाकला, तसा अभिजात दर्जाचा मुद्दा गायब करता येणार नाही. विचारवंतांची ती मेणबत्ती ब्रिगेड जागी होऊन पुन्हा पुरस्कार वापसी सुरू होईल. तसे झाले तर मोदीजी रागावतील. मागच्या दिल्लीवारीत आपण हा विषय अमितजींपुढे काढला होता. ते तर म्हणाले, ‘मार्इंड युवर लँग्वेज!’अनेकदा असं वाटतं की, हा विषय पंतप्रधानांच्या कानावर घालून बघू या. पण अमितजींचे ते शब्द आठवले की, तोंड उघडण्याचे धाडस होत नाही. खरं म्हणजे, भाषा व्यवहार मंत्र्यांनी यात लक्ष घालून पाठपुरावा करायला हवा. पण प्रत्येक गोष्टीचा ते ‘विनोद’ करून टाकतात! आधीच शिक्षणाची पुरती शाळा झालेली. किमान मराठीचं तरी हसू व्हावयास नको. परवाच्या कॅबिनेटमध्ये हा विषय आणला. पण चंदूदादांनी तिकडे जाऊन कानडीचे गोडवे गायले! तोंड उघडायला जागा उरली नाही. परवा एका शाळेत ते ‘टिमक्याची चोळी बाई...’ हे गीत गाऊन आले म्हणे!! एकेक निस्तारता निस्तारता इकडे माझ्या घशाला कोरड पडली आहे अन् दादांना गाणी सुचताहेत! बरं गायचंच होतं तर किमानज्ञानेश्वरांच्या शब्दात‘माझा मराठाचि बोलू कौतुके।परि अमृताते पैजा जिंके ।हे तरी गायला हवे. त्यावर दादांचं म्हणणं असं की, ‘मराठाचि’ की ‘मराठीचि’ यावरून विद्वानांमध्ये मतभेद आहेत. जर ज्ञानेश्वरीवर आपलं एकमत नसेल, तर मग मराठीला अभिजात दर्जा कसा मिळणार? असो.बारामतीकरही कविता करतात, ही बातमी वाचून मी अभिनंदनासाठी पवारसाहेबांना फोन लावला. तर ते म्हणाले, ‘मराठीसाठी तुम्ही दिल्लीला शिष्टमंडळ पाठवणार असाल तर मी नेतृत्व करायला तयार आहे. पण एका अटीवर.’ मी विचारलं, ‘कसली अट?’ तर ते म्हणाले, शिष्टमंडळात पाडगावकर, करंदीकर, जवळकर, या आडनावाच्या साहित्यिकांसोबत महानोर, नेमाडे, बोराडे, कºहाडे, मोरे, सावंत आदी देशीवादी साहित्यिकांचाही समावेश करा. उगीच अभिजन-बहुजन वाद नको. मला प्रश्न पडला. मग विदर्भातील एलकुंचवारांचं काय करायचं? त्यांची नाटकं तर बहुजनी वास्तव मांडणाºया अभिजनी कलाकृती आहेत नं भाऊ!!