शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लेख: सामाजिक उतरंडीच्या खालच्या आणि वरच्या लोकांमधली तेढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 07:24 IST

UGC: १३ जानेवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ‘उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेच्या प्रसारासाठी नियम, २०२६’ अधिसूचित केले. या नियमांचा  उद्देश सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये भेदभाव दूर करणे आणि सर्वांना समान संधी सुनिश्चित करणे हा आहे. 

डॉ. नीरज हातेकरनिवृत्त प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ

१३ जानेवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ‘उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेच्या प्रसारासाठी नियम, २०२६’ अधिसूचित केले. या नियमांचा उद्देश सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये भेदभाव दूर करणे आणि सर्वांना समान संधी सुनिश्चित करणे हा आहे.

देशातील उच्च शिक्षण संस्थांमधून येणाऱ्या भेदभावाच्या तक्रारीचे प्रमाण वाढत आहे. २०१२ साली यूजीसीने शैक्षणिक संस्थांच्या कॅम्पसवर भेदभाव टाळण्यासाठी एक परिपत्रक  काढले होते. त्या परिपत्रकातील तरतुदी बंधनकारक नव्हत्या तर सल्ला या स्वरूपाच्या  होत्या. परंतु जातीय भेदभावाच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. २०१९-२० मध्ये १७८ तक्रारी होत्या, त्या २०२३-२४ मध्ये  ३७८वर पोहोचल्या आहेत. याचा अर्थ प्रकरणे तर वाढत आहेत; पण दलित-आदिवासी समूहामध्ये आपल्या हक्काविषयीची वाढती जागरूकतासुद्धा आहे. पूर्वी अन्याय झाला तरी निमूटपणे सहन केला जाई. पण आता परिस्थिती बदलत आहे. अधिक जागरूकता, राजकीय संघटन यातून दलित-मागास समूहातील विद्यार्थी अन्यायाचा विरोध करतात. तक्रारी दाखल करतात. तरीसुद्धा रोहित वेमुला, पायल तडवी अशी प्रकरणे होतातच. 

आपला समाज प्रथमतेने जातीय आहे. आरक्षणातून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहण्याची सवर्ण समूहांची दृष्टी अजूनही ‘लाभार्थी’ अशीच आहे. याउलट सवर्ण समाजांतून आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेला प्रवेश ‘मेरिट’वर मिळाला आहे, अशी ठाम भावना असते. वास्तविक मेरिट घेऊन कोणीच जन्मत नाही. जातीवर नाही, तर व्यक्तीला  कोणत्या संधी मिळतात यावर त्या व्यक्तीच ‘मेरिट’ ठरते. 

घरातील वातावरण, आर्थिक परिस्थिती,  उपलब्ध असलेले सांस्कृतिक, सामाजिक भांडवल यावर यश अवलंबून असते. पण उतरंडीच्या वर असलेल्या लोकांना वंचित समूहांच्या तुलनेत संघर्ष कमी करायला लागल्यामुळे हे जातीय वास्तव लक्षात येत नाही. मग वंचित समूहातील विद्यार्थ्यांना घालून-पाडून बोलणे, अपमानित  करणे, जातीवरून डिवचणे हे प्रकार सर्रास होतात. आपली जागा यांनी लाटली असा गैरसमज सवर्ण समुदायात असेपर्यंत हा भेदभाव राहणार. सवर्ण सहकाऱ्यांकडून मागासवर्गीय शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांची संभावना अजूनही ‘ते लोक’ अशीच  करण्यात येते. याला अपवाद असतील; पण मुख्य प्रवाह भेदभावाचा आहे. 

या पार्श्वभूमीवर ठोस नियमावली  आवश्यक आहे. कालबद्ध चौकशी, कडक कारवाई करणारी पारदर्शक यंत्रणा निर्माण करण्याचा  यूजीसीचा प्रयत्न आहे. सवर्ण विद्यार्थ्यांवर खोट्या केस होतील, खोटे आरोप करणाऱ्या व्यक्तींना या कायद्यात कोणतीही शिक्षा नाही ही भीती पूर्णपणे निराधार नसली तरी तेवढ्यासाठी  हा कायदा रद्द करणे किंवा सौम्य करणे चुकीचे होईल. मुळात हा कायदाच मागासवर्गीय विद्यार्थ्यांबाबत भेदभाव होतो म्हणून आणला गेला आहे. मूळ भेदभाव नसता तर कायद्याची गरजच भासली नसती. स्त्रियांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांचा हेतुपुरस्सर गैरउपयोग  होतोच की ! पण स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण पाहता कडक कायदे आवश्यकच आहेत. गैरवापर होतो म्हणून ते सौम्य करणे किंवा रद्द करणे योग्य नाही.  तसेच इथेही.

अर्थात या कायद्यातसुद्धा एक कच्चा दुवा आलाच आहे. मुळात राजकारण तिथे होते आहे. अन्याय, भेदभाव प्रामुख्याने दलित आणि आदिवासी समूहांवर होतो. कित्येक वेळा तो इतर मागासवर्गीय समुदायाकडूनसुद्धा होतो. पण या कायद्यात दलित आणि आदिवासी समुदायांच्या बरोबर इतर मागासवर्गीयांनासुद्धा संरक्षण देण्यात आले आहे. इतर मागासवर्गीयांना भेदभावापासून संरक्षण नको असे म्हणायचे नाही; पण त्यांच्याबाबत होणारा भेदभाव आणि दलित व आदिवासी समूहांबाबत होणारा भेदभाव यात दर्जात्मक फरक आहे. कायद्यात याबाबत पुरेशी संवेदनशीलता दिसत नाही. म्हणून एकीकडे दलित-आदिवासींबरोबर इतर मागासवर्गीयांची मोट बांधली जाते आहे, तर दुसरीकडे सवर्ण समूहांमध्ये आपल्याला एकटे पडले जात असल्याची भावना बळावते आहे. खरी तेढ यात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Caste divide: Upper and lower classes tension in society explained.

Web Summary : UGC's new rules aim to eliminate discrimination in higher education. Caste-based complaints are rising, highlighting increased awareness. Merit is linked to opportunity, not birth. The law addresses bias against marginalized groups, but lacks sensitivity regarding OBCs, fueling societal tension.
टॅग्स :Educationशिक्षण