शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

उद्धव यांची ‘राम’धून; पण पुलाखालून पाणी गेलं वाहून!

By सुधीर महाजन | Updated: October 24, 2018 13:24 IST

आजवरच्या सर्व सभांच्या व्यासपीठांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरी असायच्या. आता त्यात श्रीरामाच्या मूर्तीची भर पडली आहे.

- सुधीर महाजन 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘रामायणा’च्या पहिल्या ‘कांडा’चा समारोप औरंगाबादेत झाला. त्यांच्या अयोध्या यात्रेचा हा परिणाम असावा. आजवरच्या सर्व सभांच्या व्यासपीठांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरी असायच्या. आता त्यात श्रीरामाच्या मूर्तीची भर पडली आहे. दसऱ्या मेळाव्यानंतर सीमोल्लंघनाला निघालेल्या ठाकरे यांनी भाजपच्या मतदारसंघातच मुलुखगिरी केली. जळगाव, शिर्डी, लातूर, बीड अशी रपेट मारून ते औरंगाबादला पोहोचले. त्यांच्या या सगळ्याच सभांचा सूर हा भाजपविरोधी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, छगन भुजबळ, अजित पवार यांच्यावर शरसंधान साधत त्यांनी सत्तेत राहूनही खऱ्या विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे ठणकावून सांगितले.

ठाकरेंचा हा भाजप विरोध आजचा नाही. किंबहुना घरात सासूचा अमल संपुष्टात आला की, तिचा पावलोपावली तिळपापड होतो याचे दर्शन गेल्या चार वर्षांत युतीच्या संसारात महाराष्ट्रात झाले. हाच ‘राग’ उद्धव यांनी पुढे या सर्व सभांमध्ये आळवला. निवडणुकीच्या तयारीसाठी मुलुखगिरीला निघालेल्या ठाकरेंनी भाजपचेच मतदारसंघ निवडले. शिर्डी, जळगाव, लातूर, बीड, असा हा दौरा होता आणि या ठिकाणी शिवसेना मजबूत करणे, जाळे घट्ट करणे हा उद्देश होता; पण गेल्या चार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मराठवाड्यातील बीड, लातूरचा दौरा झाला, आता जालना, नांदेड, हिंगोलीला प्रस्तावित आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे, लातुरात सुनील गायकवाड, तर जालन्यात रावसाहेब दानवे हे भाजपचे खासदार आहेत. शिवसेनेचे मराठवाड्यात ३ खासदार. औरंगाबाद, परभणी आणि उस्मानाबाद. भाजपचेही तीन, लातूर, बीड, जालना, असे संख्याबळ, तर विधानसभेत भाजपचे १६ आणि सेनेचे १५ आमदार आहेत. म्हणजे दोन्ही पक्षांचे बलाबल समानच म्हणावे लागेल.

गेल्या चार वर्षांत भाजपची सत्ता असलेल्या मतदारसंघामध्ये सेनेचे काम नाही. संघटनात्मक बांधणी नाही. आता निवडणुकीची तयारी करताना ही बांधणी हाती घेतली; पण भाजप तयारीत फार पुढे निघून गेला आहे. औरंगाबादला गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. सेनेचा हा बालेकिल्ला समजला जातो. २६०० गटप्रमुख मेळाव्यात अपेक्षित होते. प्रत्येकाच्या हाती मेळाव्याची निमंत्रणपत्रिका पडेल अशी व्यवस्थाही केली होती. भाषणात त्यांनी गटप्रमुखांना हात वर करण्याचे आवाहन केले. त्यावेळी दीड-दोनशे हात वर झाले. ही त्यांच्या बालेकिल्ल्याची अवस्था. मेळाव्याला गर्दी होती; पण ती पदाधिकाऱ्यांची. त्यामुळे हा गटप्रमुखांऐवजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावरून पक्ष संघटना बांधणीची अवस्था दिसते.

औरंगाबादेत तर कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधवांनी पक्ष स्थापन करून वेगळी चूल मांडत खा. चंद्र्रकांत खैरे यांना पराभूत करण्याचा चंग बांधला. येथेही सेना-भाजपची गट्टी फू आहे. महानगरपालिकेत दोघेही एकत्र असले तरी भाजप आता वेगळ्या वाटेने निघाला आहे. ‘शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी ते वेळप्रसंगी असंगाशी संग करू शकतात. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपचे नगरसेवक सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. आता हे राजीनामे महापालिका सचिवाकडे देतात की पक्षप्रमुखांकडे, यावरून त्यांच्या नाराजीचे गांभीर्य दिसेल; पण महापालिकेत पदोपदी सेनेला अडथळा निर्माण करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीत.

मराठवाड्यातील सर्वच सभांमधून ठाकरेंनी रामाचा आधार घेत भाजपवर टीका केली आणि राममंदिर आम्हीच बांधणार, असेही सांगितले. शरद पवार म्हणतात, मोदी पंतप्रधान होणार नाहीत तर मग राममंदिर कोण बांधणार, असा युक्तिवादही केला. एकूण रामाचा आधार घेत भाजपवर शरसंधान साधले. उद्धवांची ‘राम’धून हाच यापुढचा निवडणुकीचा कार्यक्रम असेल, असे सध्या तरी दिसते. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMarathwadaमराठवाडा