शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

उद्धव ठाकरेंचे अस्तित्व पणाला!

By यदू जोशी | Updated: March 31, 2024 15:08 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या महामुकाबल्याला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील दिग्गज नेते मैदान-ए- जंगसाठी सज्ज झाले आहेत. या दिग्गजांचे कालचे, आजचे राजकारण आणि या निवडणुकीवर अवलंबून असलेले त्यांचे राजकीय भवितव्य यावर एकेकाचा घेतलेला वेध आजपासून...

- यदु जोशी वडिलांनी जन्माला घातलेल्या पक्षाची जबाबदारी मुलावर की पुतण्यावर, अशी परीक्षेची घडी आली तेव्हा मुलालाच वारसा मिळाला, भावाने वेगळा पक्ष थाटला. संदर्भ अर्थातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अन् उद्धव ठाकरे-राज ठाकरेंचा आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेना सोडली; पण शिवसेना संपली नाही. पक्षाला सर्वांत मोठा धक्का बसला तो जून २०२२ मध्ये. जेव्हा एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार घेऊन बाहेर पडले. मग १३ खासदार, अनेक आजी- माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी त्यांना सोडून गेले. कोणतेही सत्तापद घेणार नाही, हा बाळासाहेबांनी केलेला पण तोडत मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे या बंडानंतर पायउतार झाले, काँग्रेसवर हयातभर टीका करणाऱ्या बाळासाहेबांचा पुत्र काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेला, तेव्हा टीका झाली होतीच, हिंदुत्वाला मूठमाती दिल्याचाही आरोप झाला. मात्र, २५ वर्षे शिवसेना युतीत सडल्याचे सांगत ठाकरेंनी काँग्रेस, शरद पवार यांना जवळ केले.

आता राजकीय आयुष्याच्या एका निर्णायक टप्प्यावर उद्धव ठाकरे उभे आहेत. मातोश्री, सेना भवन, भगवा, जयभवानी जयशिवाजी हे ब्रँड सोडून शिवसेनेतून कोणी बाहेर पडण्याची हिंमत दाखवेल, असे कोणाला वाटले नव्हते अन् समजा तसे घडलेच, तर चार- सहा आमदारांपलीकडे कोणी जाणार नाही, हा बेसावधपणा ठाकरेंना नडला. आज त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा, त्यांच्या स्वतःच्या नेतृत्वाचा आणि एकूणच ठाकरेंच्या राजकीय भवितव्याचा कधी नव्हे एवढा कस लागत आहे. लोकसभा निवडणूक ही राज्य पिंजून काढण्यास त्यांनी कधीच सुरुवात केली आहे. शिंदेंच्या बंडाच्या काही दिवस आधी ठाकरे रुग्णालयात होते. हृदयाचा त्रास त्यांना आहेच, स्टेंट टाकलेले आहेत. मात्र, आज तब्येतीच्या मर्यादा धुडकावत ते जिवाचे रान करत फिरत आहेत. दिल्लीतील महाशक्ती आणि राज्यातील तीन पक्षांची मजबूत महायुती यांना एकाचवेळी आव्हान देत ठाकरे निघाले आहेत. शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची, या प्रश्नाचे उत्तरही ते देणार आहेत. भाजपला त्यांनी अक्षरशः अंगावर घेतले आहे. भलेभले महाशक्तीसमोर गुडघे टेकत असताना ठाकरे मात्र भिडले आहेत.

लोकसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. आज त्यांच्यासोबत पक्षाचे केवळ पाच खासदार आहेत. जेमतेम १४ आमदार आहेत. गेल्यावेळचा मित्र भाजप या वेळचा सर्वांत मोठा विरोधक आहे. राजकारणाचे अनेक संदर्भ बदलले आहेत. शिवसैनिकांची ताकद, सहानुभूती हे फॅक्टर ठाकरेंना कितपत तारतील, हे निकालात दिसेलच. बाळासाहेब हे सामान्य शिवसैनिकांपासून नेत्यांनाही सांभाळून घेत, प्रेम देत, लोक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत. साहजिकच याबाबत उद्धव यांची बाळासाहेबांशी तुलना होते, तेव्हा त्यांना कमी गुण दिले जातात. मात्र, सत्ता आणि आपली माणसे सोडून गेल्यानंतर त्यांनी नक्कीच आत्मचिंतन केले असेल, उणिवांवर मात करत मुलगा आदित्य यांना सोबत घेत आणि स्व. मीनाताईंची कमतरता शिवसैनिकांना भासून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या रश्मी ठाकरेंच्या सोबतीने उद्धव यांनी लोकसभेसाठीचा रथ बाहेर काढला आहे. एका नव्या लढाईसाठी मातोश्री सज्ज झाली आहे. विजयाला गवसणी घालून ते मातोश्रीवर परततील, की त्यांच्या विजयरथाची चाके चिखलात उगवणारे कमळ अडवेल याचा फैसला आता जवळ आला आहे.

विजयाची गुढी! २०१४ ची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेकडून बराच काळ उमेदवार जाहीर झाला नव्हता. अचानक एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर झाले. शिवसेनेतून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आनंद परांजपे हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या बरोबरीने मनसेचे राजू पाटीलही मैदानात होते. निवडणुकीच्या तोडावर गुढीपाडव्याची नववर्ष स्वागत यात्रा होती. त्या दिवशी तिन्ही उमेदवार एकत्र येणार असे चित्र होते. डोंबिवली काबीज करायची तर स्वागत यात्रेत हजेरी लावलीच पाहिजे, डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात गुढी उभारण्यासाठी भल्या पहाटे तिन्ही उमेदवार तेथे पोहोचले होते. डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवीद चव्हाणही उपस्थित होते. स्वागत यात्रेनिमित्त तिन्ही उमेदवारांच्या हस्ते गुढी उभारली गेली. हा दुर्मीळ राजकीय योग जुळून आला होता. यंदा तसेच सौहार्दाचे दर्शन घडते की नाही त्याकडे साऱ्याऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४