शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'सत्तातुराणां न भयं...' सत्तेची लागलेली चटक सहसा सुटत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 05:54 IST

गेली चार-साडेचार वर्षे सत्तेत एकत्र राहूनही विरोधकांहून अधिक त्वेषाने परस्परांवर तुटून पडणाऱ्या भाजपा-शिवसेना नेत्यांनी पुन्हा दिलजमाईची घोषणा केली आहे

गेली चार-साडेचार वर्षे सत्तेत एकत्र राहूनही विरोधकांहून अधिक त्वेषाने परस्परांवर तुटून पडणाऱ्या भाजपा-शिवसेना नेत्यांनी पुन्हा दिलजमाईची घोषणा केली आहे. रितसर घटस्फोट न घेता एकाच छताखाली, परंतु विभक्त राहणाºया जोडप्यांसारखा या दोघांचा संसार आजवर सुरू होता. एकाच चुलीवर स्वयंपाक असल्याने, रोजच भांड्याला भांडे लागायचे, कुरबुरी व्हायच्या, धडा शिकविण्याची भाषा केली जायची. त्यामुळे ऐकणाºयांना, बघणाºयांना वाटायचे की, आता कोणत्याही क्षणी ते काडीमोड घेऊन मोकळे होतील, पण एकदा लागलेली सत्तेची चटक सहसा सुटत नाही. फक्त त्यासाठी मानापमान सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. सेना-भाजपाच्या नेत्यांनी नेमके हेच केले. पाच वर्षे भांडायचे आणि निवडणूक आली की, गळ्यात गळे घालून मिरवायचे.

राजकारणातील अशा संधीसाधू युती, आघाड्यांची आता जनतेला चांगलीच सवय झाली आहे. त्यामुळे सेना-भाजपाचे पुन्हा जुळले, यात नवल नाही. कारण कुणी-कितीही गर्जना वगैरे केली, तरी आता कुणाच्याच बाहूत स्वबळावर लढण्याची ताकत उरलेली नाही. त्यामुळे ही दिलजमाई आज ना उद्या होणारच होती. तसाही या दोन्ही पक्षांचा ‘डीएनए’ सारखाच आहे. शिवसेनेकडे कसल्याच प्रकारचे धोरण नाही, तर भाजपाकडील धुरीण पक्के धोरणी आहेत. सावजाला टप्प्यात गाठून कसे टिपायचे, यात ते एव्हाना चांगलेच पारंगत झाले आहेत. ज्या नितीशकुमारांनी मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा फेकला होता, ज्या मुलायमसिंहांनी भाजपाच्या जातीयवादावर रान उठविले होते, तेच आज मोदीगान करत सुटले आहेत. हा काळाचा महिमा नव्हे, तर सत्तेच्या अंबारीत बसलेल्या माहुताच्या हातातील अंकुशाचा परिणाम आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा युतीची माळ गळ्यात घालून घेतल्याबद्दल त्यांना उगीच दूषण देण्यात काही अर्थ नाही. तसाही युती करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय तरी काय होता? ‘स्वबळावर लढू’ हे भाषणापुरते ठीक, पण प्रत्यक्ष लढाईसाठी तेवढे बळ तरी स्वत:कडे असले तर पाहिजे ना ! एक पाय सत्तेत आणि दुसरा विरोधात, अशा एकटांगी कसरतीने सेनेचाच पाय खोलात रुतत चालला होता. सेनेचे सरदार सत्तेत आणि सेनापतींसह मावळे विरोधात, अशी ही सर्कस किती दिवस चालणार होती? लोकांची घडीभर करमणूक व्हायची, पण तेही एव्हाना कंटाळले होते. सेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याने, राजकीय लढतीचे चित्र बदलून जाईल, असे अनुमान काढण्याची उगीच घाई नको. मतदार समंजस असतात. अशा ऐनवेळच्या युत्या-आघाड्यांचा त्यांच्यावर काही फरक पडत नसतो आणि तसेही राजकारणात दोन अधिक दोन, चार होतातच असे नाही. तसे झाले असते, तर भारतीय राजकारणाचे चित्र कधीच बदलले असते. प्रश्न एवढाच की, युतीचा समझोता करण्यापूर्वी जे मुद्दे शिवसेनेने उपस्थित केले होते, त्या मुद्द्यांचे काय? अयोध्येत राममंदिर, शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी आणि नाणार प्रकल्प, या मागण्यांपैकी फक्त कोकणात होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाबाबत पुनर्विचार करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांना दिला आहे. मात्र, हा प्रकल्प आता अशा टप्प्यावर आहे की, तो रद्द करणे कोणालाही शक्य नाही. फार फार तर नाणारऐवजी कोकणातच दुसरी जागा शोधली जाईल. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ फारच थोड्या शेतकºयांना झाल्याची ओरड शिवसेनेने सातत्याने केली असली, तरी सरसकट कर्जमाफीला भाजपाचा असलेला विरोध जगजाहीर आहे. शिवाय, राममंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने सरकारचे हात बांधलेले आहेत. उरतो फक्त पाकिस्तानला धडा शिकविण्याचा प्रश्न, पण शत्रूराष्टÑाला धडा शिकविण्यासाठी कोणत्याही सरकारला शिवसेनेची नव्हे, तर सेनेची (लष्कर) गरज असते. त्यामुळे राष्टÑीय हितासाठी आम्ही ही युती केली, अशी कितीही मखलाशी कुणी केली, तरी ताकाला जाऊन भांडे लपविण्याचाच हा प्रकार आहे. शिवसेनेला जितकी युतीची गरज होती, तितकीच ती भाजपालाही होती. चार राज्यांत झालेल्या पराभवामुळे सेनेच्या नाकदुºया काढण्याखेरीस भाजपाकडे पर्याय नव्हता. शेवटी काय, तर ‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’!शिवसेना-भाजपा नेत्यांनी स्वबळाच्या कितीही गमजा मारल्या, तरी सध्याचे राजकीय वर्तमान प्रतिकूल असल्याने एकत्र येण्याखेरीस गत्यंतर नव्हते. चंद्राबाबूंनी सोडलेली साथ, नवीनबाबूंचे मौन, यूपीत झालेली बहेनजी-भतिजा आघाडी आणि ममतांचा एल्गार, अशा स्थितीत शिवसेनेचा आधार घेण्याशिवाय भाजपाकडे पर्याय नव्हता.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस