शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत २३ वर्षांनी फडकला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 03:20 IST

महाराष्ट्राचा आणि मूळचा मुंबईकर असलेल्या सुनीत जाधवने, अपेक्षेप्रमाणे वर्चस्व राखत नुकत्याच पुण्यात झालेल्या ५१ व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत, ‘मिस्टर एशिया’ (आशिया श्री) किताब पटकावला.

- चेतन पाठारे । आयबीबीएफ (सरचिटणीस)महाराष्ट्राचा आणि मूळचा मुंबईकर असलेल्या सुनीत जाधवने, अपेक्षेप्रमाणे वर्चस्व राखत नुकत्याच पुण्यात झालेल्या ५१ व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत, ‘मिस्टर एशिया’ (आशिया श्री) किताब पटकावला. त्याचबरोबर भारतीय संघानेही शानदार कामगिरी करताना सांघिक जेतेपद पटकावत विक्रमी कामगिरी केली. विक्रमी कामगिरी यासाठी कारण, तब्बल २३ वर्षांनी भारताने या स्पर्धेत बाजी मारली. त्यामुळेच सुनीतने मिळवलेले जेतेपद भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे.इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन (आयबीबीएफ)ला भारतीय सरकारकडून मान्यता आहे. आज या खेळात केलेल्या अनेक बदलांमुळे शरीरसौष्ठवकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, गेली कित्येक वर्षे भारतीय संघ विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होत आहे; पण आॅलिम्पिक खेळ नसल्याने भारतीय सरकारकडून अद्याप या खेळाला किंवा संघटनेला आर्थिक मदत मिळत नाही. २०१४ साली भारताने जागतिक स्पर्धेचे यजमानपद भूषविले. त्यानंतर आता ५२ व्या आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषविताना भारताने तब्बल २३ वर्षांनी सांघिक जेतेपद पटकावले.प्रेमचंद डोग्रा यांनी २३ वर्षांपूर्वी आशियाई जेतेपद पटकावले आणि त्यानंतर भारताने पुण्यात झालेल्या स्पर्धेत जेतेपद पटकावले. त्यात वैयक्तिक पुरस्कार महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने पटकावला, ही सर्वात अभिमानाची गोष्ट. सुनीतने खूप चांगली कामगिरी केली. याआधीही अनेक जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचा पताका फडकलेला आहे. महेंद्र चव्हाण गेल्या वर्षी, तर नितीन म्हात्रेही दोन वर्षांपूर्वी वर्ल्ड चॅम्पियन ठरला होता.शरीरसौष्ठवपटूंसाठी काम करणारी ‘आयबीबीएफ’ भारतातील मान्यताप्राप्त एकमेव संस्था आहे. याआधी कोणत्याही स्पर्धेत खेळाडूंच्या आहारावर व त्यांच्या निवासव्यवस्थेवर कोणीच लक्ष दिले नव्हते; परंतु आयबीबीएफने या सर्व अडचणी दूर केल्या. याआधी खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था एखाद्या धर्मशाळेत व्हायची. शिवाय, त्यांचे जेवणही अगदी साधेपणाचे डाळ-भात असे असायचे. या सर्व गोष्टी आता बदलल्या. जर अधिकाऱ्यांना वातानुकूलित किंवा थ्री स्टार सेवा मिळते, तर खेळाडूंनाही अशी व्यवस्था अवश्य मिळाली पाहिजे, हा दृष्टिकोन ‘आयबीबीएफ’ने यशस्वी केला आहे. खेळाडूंना योग्य सुविधा मिळणे, ही या खेळाची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खेळाडूंना आवश्यक असलेला पोषक आहार उपलब्ध होत असून शरीरसौष्ठवचा दर्जा उंचावलेला आहे.महाराष्ट्राच्या विचार करता आज राज्यात हा खेळ खूप रुजला आहे. प्रत्येक जिल्ह्यात मान्यताप्राप्त संघटना असून, त्याद्वारे तळागाळातून प्रतिभावान खेळाडू पुढे येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची गणना अव्वल संघामध्ये होते व यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा भरणा अधिक आहे. देशातील सर्वोत्तम संघ म्हणून महाराष्ट्र आघाडीवर आहे. असे असले तरी एक खंत आहे की, केंद्र सरकारकडून मान्यता असूनही अद्याप राज्य सरकारकडून आयबीबीएफकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करावेत. इतर राज्य आपापल्या खेळाडूंची दखल घेत असताना महाराष्ट्रातील उदासीनताही दूर व्हावी, हीच अपेक्षा आहे.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठव