शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘सी-प्लेन’चा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 03:54 IST

मुंबईत सी-प्लेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मुंबईतील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानावे लागेल. या निर्णयाने मुंबईतील वाहतुकीवर पडणारा ताण काही प्रमाणात का होईना, सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे़

मुंबईत सी-प्लेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मुंबईतील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानावे लागेल. या निर्णयाने मुंबईतील वाहतुकीवर पडणारा ताण काही प्रमाणात का होईना, सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे़ त्यामुळे या निर्णयाचे स्वागतच करायला हवे़ सी-प्लेनचा प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात असेल का, हा प्रश्न सध्या अनुत्तरित असला तरी नौकायनमंत्री नितीन गडकरी यांनी मात्र तो सर्वसामान्यांना परवडणारा असेल, असे वक्तव्य केलेले आहे. या माणसाचा आतापर्यंतचा प्रामाणिकपणा पाहता, सी-प्लेनची वाहतूक खिशाला मोठी कात्री लावणारी नसावी, अशी आशा करायला नक्कीच वाव आहे. समुद्रातून वाहतूक वाढवण्याकडे केंद्र सरकारचे सुरू असलेले प्रयत्न स्तुत्यच आहेत. सरकार आखत असलेल्या योजना अमलात येण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे़ मुंबईतील वाहतूक समस्या गेल्या काही दशकांपासून अत्यंत भीषण बनलेली आहे. वाहतूक नियोजनाचे प्रयत्न आता गांभीर्याने न झाल्यास हे भविष्यासाठी अत्यंत घातक ठरणार आहे. मुंबईतील लोकल सेवेवर क्षमतेपेक्षा अधिक ताण गेल्या अनेक वर्षांपासून येत आहे. लाखो मुंबईकर दररोज लोकलमधून कोंबल्यासारखा प्रवास करतात. बस, टॅक्सी या सेवाही मुंबईकरांना वाहून ेनेण्यात कमी पडतात. वाहतुकीवरील पर्यायासाठी मेट्रोचे जाळे विणण्याचे काम मुंबईत हाती घेतलेले आहे. सध्या केवळ घाटकोपर-वर्सोवा मार्गावर मेट्रो कार्यान्वित आहे़ मेट्रोचे सर्व टप्पे पूर्ण होण्यासाठी अजून किमान एक दशकाचा कालावधी लागू शकतो. संपूर्ण जाळे विणले गेल्याखेरीज मेट्रोचा पूर्ण लाभ मुंबईकरांना घेता येणार नाही. एलिव्हेटेड रेल्वेचे काम अद्याप कागदावरच आहे. मोनोचा पहिला टप्पा जवळपास नापास म्हणावा, असाच आहे. मोनोच्या दुसºया टप्प्यानंतर तेथील वाहतूक काही प्रमाणात का होईना वाढेल. हे सर्व प्रकल्प भविष्यात वाहतूककोंडी फोडतीलही, पण तूर्तास मुंबईकरांना सहनशीलता बाळगावी लागणार आहे. वाहतुकीचे नवीन पर्याय देताना अधिकाधिक मुंबईकर त्याकडे आकर्षित होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ते परवडणारेही असावे. मुंबईत सर्वसामान्याला परवडेल, सुरक्षित वाटेल, असा पर्याय देणे आवश्यक आहे़ सी-प्लेन हा मर्यादित लोकांसाठी नक्कीच चांगला पर्याय आहे. मात्र त्याबरोबरच नवी मुंबई, ठाणे येथील खाडीचा तसेच मुंबईतील पश्चिम उपनगरांचा व्यापक स्वरूपात जलवाहतुकीसाठी वापर करून घेतल्यास ते नागरिकांसाठी नक्कीच समाधान देणारे ठरेल, यात शंका नाही.

टॅग्स :AirportविमानतळMumbaiमुंबईIndiaभारत