शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

‘सी-प्लेन’चा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 03:54 IST

मुंबईत सी-प्लेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मुंबईतील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानावे लागेल. या निर्णयाने मुंबईतील वाहतुकीवर पडणारा ताण काही प्रमाणात का होईना, सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे़

मुंबईत सी-प्लेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मुंबईतील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानावे लागेल. या निर्णयाने मुंबईतील वाहतुकीवर पडणारा ताण काही प्रमाणात का होईना, सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे़ त्यामुळे या निर्णयाचे स्वागतच करायला हवे़ सी-प्लेनचा प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात असेल का, हा प्रश्न सध्या अनुत्तरित असला तरी नौकायनमंत्री नितीन गडकरी यांनी मात्र तो सर्वसामान्यांना परवडणारा असेल, असे वक्तव्य केलेले आहे. या माणसाचा आतापर्यंतचा प्रामाणिकपणा पाहता, सी-प्लेनची वाहतूक खिशाला मोठी कात्री लावणारी नसावी, अशी आशा करायला नक्कीच वाव आहे. समुद्रातून वाहतूक वाढवण्याकडे केंद्र सरकारचे सुरू असलेले प्रयत्न स्तुत्यच आहेत. सरकार आखत असलेल्या योजना अमलात येण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे़ मुंबईतील वाहतूक समस्या गेल्या काही दशकांपासून अत्यंत भीषण बनलेली आहे. वाहतूक नियोजनाचे प्रयत्न आता गांभीर्याने न झाल्यास हे भविष्यासाठी अत्यंत घातक ठरणार आहे. मुंबईतील लोकल सेवेवर क्षमतेपेक्षा अधिक ताण गेल्या अनेक वर्षांपासून येत आहे. लाखो मुंबईकर दररोज लोकलमधून कोंबल्यासारखा प्रवास करतात. बस, टॅक्सी या सेवाही मुंबईकरांना वाहून ेनेण्यात कमी पडतात. वाहतुकीवरील पर्यायासाठी मेट्रोचे जाळे विणण्याचे काम मुंबईत हाती घेतलेले आहे. सध्या केवळ घाटकोपर-वर्सोवा मार्गावर मेट्रो कार्यान्वित आहे़ मेट्रोचे सर्व टप्पे पूर्ण होण्यासाठी अजून किमान एक दशकाचा कालावधी लागू शकतो. संपूर्ण जाळे विणले गेल्याखेरीज मेट्रोचा पूर्ण लाभ मुंबईकरांना घेता येणार नाही. एलिव्हेटेड रेल्वेचे काम अद्याप कागदावरच आहे. मोनोचा पहिला टप्पा जवळपास नापास म्हणावा, असाच आहे. मोनोच्या दुसºया टप्प्यानंतर तेथील वाहतूक काही प्रमाणात का होईना वाढेल. हे सर्व प्रकल्प भविष्यात वाहतूककोंडी फोडतीलही, पण तूर्तास मुंबईकरांना सहनशीलता बाळगावी लागणार आहे. वाहतुकीचे नवीन पर्याय देताना अधिकाधिक मुंबईकर त्याकडे आकर्षित होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ते परवडणारेही असावे. मुंबईत सर्वसामान्याला परवडेल, सुरक्षित वाटेल, असा पर्याय देणे आवश्यक आहे़ सी-प्लेन हा मर्यादित लोकांसाठी नक्कीच चांगला पर्याय आहे. मात्र त्याबरोबरच नवी मुंबई, ठाणे येथील खाडीचा तसेच मुंबईतील पश्चिम उपनगरांचा व्यापक स्वरूपात जलवाहतुकीसाठी वापर करून घेतल्यास ते नागरिकांसाठी नक्कीच समाधान देणारे ठरेल, यात शंका नाही.

टॅग्स :AirportविमानतळMumbaiमुंबईIndiaभारत