शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘सी-प्लेन’चा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 03:54 IST

मुंबईत सी-प्लेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मुंबईतील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानावे लागेल. या निर्णयाने मुंबईतील वाहतुकीवर पडणारा ताण काही प्रमाणात का होईना, सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे़

मुंबईत सी-प्लेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मुंबईतील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानावे लागेल. या निर्णयाने मुंबईतील वाहतुकीवर पडणारा ताण काही प्रमाणात का होईना, सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे़ त्यामुळे या निर्णयाचे स्वागतच करायला हवे़ सी-प्लेनचा प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात असेल का, हा प्रश्न सध्या अनुत्तरित असला तरी नौकायनमंत्री नितीन गडकरी यांनी मात्र तो सर्वसामान्यांना परवडणारा असेल, असे वक्तव्य केलेले आहे. या माणसाचा आतापर्यंतचा प्रामाणिकपणा पाहता, सी-प्लेनची वाहतूक खिशाला मोठी कात्री लावणारी नसावी, अशी आशा करायला नक्कीच वाव आहे. समुद्रातून वाहतूक वाढवण्याकडे केंद्र सरकारचे सुरू असलेले प्रयत्न स्तुत्यच आहेत. सरकार आखत असलेल्या योजना अमलात येण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे़ मुंबईतील वाहतूक समस्या गेल्या काही दशकांपासून अत्यंत भीषण बनलेली आहे. वाहतूक नियोजनाचे प्रयत्न आता गांभीर्याने न झाल्यास हे भविष्यासाठी अत्यंत घातक ठरणार आहे. मुंबईतील लोकल सेवेवर क्षमतेपेक्षा अधिक ताण गेल्या अनेक वर्षांपासून येत आहे. लाखो मुंबईकर दररोज लोकलमधून कोंबल्यासारखा प्रवास करतात. बस, टॅक्सी या सेवाही मुंबईकरांना वाहून ेनेण्यात कमी पडतात. वाहतुकीवरील पर्यायासाठी मेट्रोचे जाळे विणण्याचे काम मुंबईत हाती घेतलेले आहे. सध्या केवळ घाटकोपर-वर्सोवा मार्गावर मेट्रो कार्यान्वित आहे़ मेट्रोचे सर्व टप्पे पूर्ण होण्यासाठी अजून किमान एक दशकाचा कालावधी लागू शकतो. संपूर्ण जाळे विणले गेल्याखेरीज मेट्रोचा पूर्ण लाभ मुंबईकरांना घेता येणार नाही. एलिव्हेटेड रेल्वेचे काम अद्याप कागदावरच आहे. मोनोचा पहिला टप्पा जवळपास नापास म्हणावा, असाच आहे. मोनोच्या दुसºया टप्प्यानंतर तेथील वाहतूक काही प्रमाणात का होईना वाढेल. हे सर्व प्रकल्प भविष्यात वाहतूककोंडी फोडतीलही, पण तूर्तास मुंबईकरांना सहनशीलता बाळगावी लागणार आहे. वाहतुकीचे नवीन पर्याय देताना अधिकाधिक मुंबईकर त्याकडे आकर्षित होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ते परवडणारेही असावे. मुंबईत सर्वसामान्याला परवडेल, सुरक्षित वाटेल, असा पर्याय देणे आवश्यक आहे़ सी-प्लेन हा मर्यादित लोकांसाठी नक्कीच चांगला पर्याय आहे. मात्र त्याबरोबरच नवी मुंबई, ठाणे येथील खाडीचा तसेच मुंबईतील पश्चिम उपनगरांचा व्यापक स्वरूपात जलवाहतुकीसाठी वापर करून घेतल्यास ते नागरिकांसाठी नक्कीच समाधान देणारे ठरेल, यात शंका नाही.

टॅग्स :AirportविमानतळMumbaiमुंबईIndiaभारत