शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अनुशेषाचे कवित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:20 PM

आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमाती कल्याण समितीचा क्षेत्रिय पाहणी दौरा नुकताच झाला. एकूण 15 आमदारांच्या समितीने तीन दिवस जिल्ह्यात थांबून विविध बैठकांसह जिल्ह्यातील 42 ठिकाणी कामांची पाहणी केली. या समितीच्या दौ:यानिमित्ताने जिल्ह्यातील प्रशासन आठवडाभर तणावाखाली होते. नव्हे तर कामाच्या ठिकाणी सर्वच कर्मचारी व अधिकारी चोखपणे आपले कर्तव्य ...

आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमाती कल्याण समितीचा क्षेत्रिय पाहणी दौरा नुकताच झाला. एकूण 15 आमदारांच्या समितीने तीन दिवस जिल्ह्यात थांबून विविध बैठकांसह जिल्ह्यातील 42 ठिकाणी कामांची पाहणी केली. या समितीच्या दौ:यानिमित्ताने जिल्ह्यातील प्रशासन आठवडाभर तणावाखाली होते. नव्हे तर कामाच्या ठिकाणी सर्वच कर्मचारी व अधिकारी चोखपणे आपले कर्तव्य  बजावताना दिसून आल्याने ग्रामीण आदिवासी जनतेला आठवडाभर जणू प्रशासन जवळ आल्याचा अनुभव आला. त्यानिमित्ताने शासकीय इमारतींमध्ये रंगरंगोटी व स्वच्छताही झाली. समितीने भेटी दिलेल्या काही कामांच्या ठिकाणी प्रशासन सतर्क राहूनही त्रुटी दिसून आल्याने त्याबाबत संबंधितांवर कारवाईचे आदेश देतांना चांगल्या कामाची पाठ थोपटून ही समिती रवाना झाली. विशेषत: जिल्ह्यात रिक्त पदांचा मोठा अनुषेश असल्याने समितीने नाराजी व्यक्त केली. आदिवासी क्षेत्रातील कामांची पाहणी करून त्याचे मूल्यमापन करावे व त्या भागातील विकासासाठी काय आवश्यक आहे किंवा कुठल्या त्रुटी आहेत त्याबाबतचा अहवाल ही समिती विधी मंडळाला सादर करीत असते. विधीमंडळाने या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी असा सर्व साधारण त्या मागचा उद्देश असतो. मात्र दुदैवाची बाब म्हणजे समितीच्या दौ:यानंतर त्याबाबतचा अहवालावर फारशी अंमलबजावणी होत नाही असा आजवरचा अनुभव आहे. कारण नंदुरबार जिल्ह्यातील रिक्त पदांचा अनुषेश हा जिल्हा निर्मितीपासून आहे. या जिल्ह्याची निर्मिती होवून 21 वर्षे झालीत. जिल्ह्याची निर्मिती झाली त्या वेळी मुळ अर्थात धुळे जिल्ह्यातील एक तृतीयांश कर्मचारी वर्ग करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात त्याही पेक्षा कमी कर्मचारी मिळाले. त्यामुळे अपू:या कर्मचारी वर्गातच या जिल्ह्याचा गाडा सुरू आहे. त्याचा परिणाम विकासाच्या गतीवर झाला आहे. आजच्या स्थितीत जवळपास मंजूर पदांपेक्षा सर्व विभागात दोन हजार पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यातच आदिवासी विकास विभागातील ही संख्या मोठी आहे. आश्रमशाळांवर त्याचा मोठा परिणाम जाणवत असल्याने आदिवासी विद्यार्थी दरवर्षी शिक्षक मिळावेत यासाठी प्रकल्प कार्यालयावर 20 ते 50 किलोमीटरची पायपीट करून मोर्चा काढत असतात. पण त्यांना अद्याप शिक्षक मिळालेले नाहीत. आरोग्याची अवस्था यापेक्षा चांगली नाही. कृषी तथा ग्रामपातळीवर काम करणारी यंत्रणा पुरेशी नाही. अशा स्थितीत नुकतीच जिल्ह्यात आलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित करून त्याकडे लक्ष वेधले आहे. ही समिती या संदर्भात विधी मंडळाकडे अहवाल सादर करणार आहेच आता विधी मंडळाने त्याचे गांभीर्य घेवून किमान या वेळी तरी जिल्ह्यातील रिक्त पदांचे अनुषेश भरण्याची प्रक्रिया सुरू करेल, अशी आदिवासींची अपेक्षा आहे.