शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

मृत्यूनंतरही यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 15:30 IST

जळगावसारख्या प्रगत, सुसंस्कृत असा शहरामध्ये लागोपाठ दोन घटना अशा घडल्या की, मृतदेहाची विटंबना झाली. प्रशासनातील माणूस किती असंवेदनशील असावा, याची या घटना म्हणजे ठसठशीत उदाहरणे आहेत.

मिलिंद कुलकर्णीभारतीय व्यक्तीच्या जीवनात अध्यात्माला मोठे महत्त्व आहे. जन्म-मृत्यूचा फेरा, मनुष्यजन्म अशा संकल्पना पुराण कथांमधून त्याच्यावर बालपणापासून बिंबलेल्या असतात. जीवनाची साधी सोपी व्याख्या त्याने केलेली असते. जगणे सुखकर व्हावे आणि मरण यातनामुक्त असावे. पण तसे घडतेच असे नाही. जगताना मरणयातना अनुभवण्याची वेळ अनेकांवर येते. वेगवेगळी कारणे त्यामागे असतात. त्यातूनच हे जीवन नकोसे व्हायला लागते. आत्महत्या, प्रायोपवेशन, इच्छामरण असे मार्ग चोखाळले जातात. कथा-कादंबऱ्या, नाटके, चित्रपटाच्या माध्यमांतून या विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो.परंतु, मृत्यूनंतरही यातना पाठ सोडत नसतील, तर यापेक्षा वेदनादानी असे काही नाही. दुर्देवाने जळगावसारख्या प्रगत, सुसंस्कृत असा शहरामध्ये लागोपाठ दोन घटना अशा घडल्या की, मृतदेहाची विटंबना झाली. प्रशासनातील माणूस किती असंवेदनशील असावा, याची या घटना म्हणजे ठसठशीत उदाहरणे आहेत.गेल्या आठवड्यात स्मशानभूमीतील लाकडे संपल्याने मृतदेहाला अग्निडाग देण्यासाठी दोन तास ताटकळत रहावे लागले. जीवलग हरपल्याचे दु:ख उरी बाळगणाºया नागरिकांना त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीसुध्दा साहित्याची जमवाजमव करण्यासाठी ऐनवेळी धावाधाव करावी लागली. काय मनस्थिती असेल त्या लोकांची? या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ माजली. महापालिका प्रशासन हादरले. एकमेकांकडे बोटे दाखवून जबाबदारी ढकलण्याचा हास्यास्पद प्रकार झाला. सामान्य माणसाच्या साध्या अपेक्षा असतात, त्याही पूर्ण होत नसतील, तर त्याने काय करावे? स्मशानभूमीत लाकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असायला हवीत, याची जबाबदारी महापालिकेने कोणत्या तरी कर्मचाºयावर सोपविलेली असणार. हा कर्मचारी त्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडतोय किंवा नाही, याची खबरदारी घेण्यासाठी कुणीतरी वरिष्ठ कर्मचारी, अधिकारी नियुक्त असणारच. नागरिकांच्या करातून त्यांना नियमित व वेळेवर पगार दिला जात असतो. मग आयुष्याच्या शेवटच्या प्रवासासाठीही त्या माणसाला यातना का भोगाव्या लागतात? याची उत्तरे कोण देणार? परदेश प्रवासानंतर तेथील भौतिक सुविधांचे, शिस्तीचे कौतुक करणारी आम्ही माणसे तिथले गुण काही अंगी बाणवत नाही, हेच खरे.काल घडलेला दुसरा प्रसंगदेखील तसाच वेदनादायी. ममुराबाद रस्त्यावरील स्मशानभूमीत जाण्यासाठी नागरिकांनी लोकसहभागातून एक लोखंडी पूल उभारला होता. अंत्ययात्रा सुरु असताना हा पूल नाल्यात कोसळला. मृतदेहासह १२ लोक पडले. मृतदेहाची विटंबना आणि जीवलगाचा अंतिम प्रवासदेखील आपण सुखकर करु शकलो नाही, हा नातलगांच्या उरी आयुष्यभर बोचणारा सल...बथ्थड प्रशासनाला तर कधी उमगणार नाही. प्रशासकीय यंत्रणेने चौकशीचे आदेश दिले खरे, पण त्यासोबत युक्तीवादाचे डोस दिले गेलेच. लोखंडी पुलाला भक्कम आधार नव्हता, या पुलाच्या जवळ महापालिकेने पक्का पूल बांधला असतानाही लोक याच पुलाचा वापर करतात...किती ही सामान्य माणसाची चेष्टा म्हणावी. स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने लोकांनी वर्गणी जमवून हा लोखंडी पूल बांधला. कारण ज्यांची जबाबदारी होती, त्यांनी हात वर केले असल्याने लोकांवर ही वेळ आली, हे वास्तव कसे लपणार? नंतर तुम्ही पक्का पूल बांधला, मग तरी हा पूल नागरिक का वापरतात, हे समजून घेतले काय? तो तकलादू असता तर लोकांना जीव धोक्यात घालायची हौस आहे काय? या प्रश्नांकडे सोयीस्कर कानाडोळा केला जातो.प्रत्येक व्यक्तीला मरण आहे, ते कुणाला चुकलेले नाही. मग सामान्य माणूस असो की, मोठा राजकीय नेता. मृत्यू अटळ आहे. आणि मृत्यूनंतर सोबत तो काहीही घेऊन जात नसतो. हे सगळे आम्ही अध्यात्मातून, व्यवहारातून शिकत असलो तरी वर्तनातून ते प्रतिबिंबीत होत नाही. ‘टाळूवरचे लोणी खाणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ महापालिकेच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत नुकताच दिसून आला. पाच वर्षांपूर्वी रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्ट या स्वयंसेवी संस्थेने महापालिकेला शवदाहिनी उभारुन देण्याचा प्रस्ताव दिला होता. सगळा खर्च रोटरी क्लब करणार होती, त्यानंतर देखभाल आणि दुरुस्ती महापालिकेला करायची होती. परंतु, पाच वर्षात काहीही झाले नाही. आता महापालिकेने नव्याने ठराव करुन शवदाहिनीसाठी निधीची तरतूद करण्यात केली. रोटरी क्लबच्या पदाधिकाºयांनी महापालिका प्रशासनाला जुन्या प्रस्तावाची आठवण करुन दिली असता ते चकीत झाले. घरातल्याच गोष्टी घरातल्या व्यक्ती सोयीस्कर विसरुन जात असतील, तर हा शुध्द विसरभोळेपणा म्हणायचा का? का आणखी काही, हे तुम्हीच ठरवा.

 

 

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगाव