शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 15:30 IST

जळगावसारख्या प्रगत, सुसंस्कृत असा शहरामध्ये लागोपाठ दोन घटना अशा घडल्या की, मृतदेहाची विटंबना झाली. प्रशासनातील माणूस किती असंवेदनशील असावा, याची या घटना म्हणजे ठसठशीत उदाहरणे आहेत.

मिलिंद कुलकर्णीभारतीय व्यक्तीच्या जीवनात अध्यात्माला मोठे महत्त्व आहे. जन्म-मृत्यूचा फेरा, मनुष्यजन्म अशा संकल्पना पुराण कथांमधून त्याच्यावर बालपणापासून बिंबलेल्या असतात. जीवनाची साधी सोपी व्याख्या त्याने केलेली असते. जगणे सुखकर व्हावे आणि मरण यातनामुक्त असावे. पण तसे घडतेच असे नाही. जगताना मरणयातना अनुभवण्याची वेळ अनेकांवर येते. वेगवेगळी कारणे त्यामागे असतात. त्यातूनच हे जीवन नकोसे व्हायला लागते. आत्महत्या, प्रायोपवेशन, इच्छामरण असे मार्ग चोखाळले जातात. कथा-कादंबऱ्या, नाटके, चित्रपटाच्या माध्यमांतून या विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो.परंतु, मृत्यूनंतरही यातना पाठ सोडत नसतील, तर यापेक्षा वेदनादानी असे काही नाही. दुर्देवाने जळगावसारख्या प्रगत, सुसंस्कृत असा शहरामध्ये लागोपाठ दोन घटना अशा घडल्या की, मृतदेहाची विटंबना झाली. प्रशासनातील माणूस किती असंवेदनशील असावा, याची या घटना म्हणजे ठसठशीत उदाहरणे आहेत.गेल्या आठवड्यात स्मशानभूमीतील लाकडे संपल्याने मृतदेहाला अग्निडाग देण्यासाठी दोन तास ताटकळत रहावे लागले. जीवलग हरपल्याचे दु:ख उरी बाळगणाºया नागरिकांना त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीसुध्दा साहित्याची जमवाजमव करण्यासाठी ऐनवेळी धावाधाव करावी लागली. काय मनस्थिती असेल त्या लोकांची? या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ माजली. महापालिका प्रशासन हादरले. एकमेकांकडे बोटे दाखवून जबाबदारी ढकलण्याचा हास्यास्पद प्रकार झाला. सामान्य माणसाच्या साध्या अपेक्षा असतात, त्याही पूर्ण होत नसतील, तर त्याने काय करावे? स्मशानभूमीत लाकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असायला हवीत, याची जबाबदारी महापालिकेने कोणत्या तरी कर्मचाºयावर सोपविलेली असणार. हा कर्मचारी त्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडतोय किंवा नाही, याची खबरदारी घेण्यासाठी कुणीतरी वरिष्ठ कर्मचारी, अधिकारी नियुक्त असणारच. नागरिकांच्या करातून त्यांना नियमित व वेळेवर पगार दिला जात असतो. मग आयुष्याच्या शेवटच्या प्रवासासाठीही त्या माणसाला यातना का भोगाव्या लागतात? याची उत्तरे कोण देणार? परदेश प्रवासानंतर तेथील भौतिक सुविधांचे, शिस्तीचे कौतुक करणारी आम्ही माणसे तिथले गुण काही अंगी बाणवत नाही, हेच खरे.काल घडलेला दुसरा प्रसंगदेखील तसाच वेदनादायी. ममुराबाद रस्त्यावरील स्मशानभूमीत जाण्यासाठी नागरिकांनी लोकसहभागातून एक लोखंडी पूल उभारला होता. अंत्ययात्रा सुरु असताना हा पूल नाल्यात कोसळला. मृतदेहासह १२ लोक पडले. मृतदेहाची विटंबना आणि जीवलगाचा अंतिम प्रवासदेखील आपण सुखकर करु शकलो नाही, हा नातलगांच्या उरी आयुष्यभर बोचणारा सल...बथ्थड प्रशासनाला तर कधी उमगणार नाही. प्रशासकीय यंत्रणेने चौकशीचे आदेश दिले खरे, पण त्यासोबत युक्तीवादाचे डोस दिले गेलेच. लोखंडी पुलाला भक्कम आधार नव्हता, या पुलाच्या जवळ महापालिकेने पक्का पूल बांधला असतानाही लोक याच पुलाचा वापर करतात...किती ही सामान्य माणसाची चेष्टा म्हणावी. स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने लोकांनी वर्गणी जमवून हा लोखंडी पूल बांधला. कारण ज्यांची जबाबदारी होती, त्यांनी हात वर केले असल्याने लोकांवर ही वेळ आली, हे वास्तव कसे लपणार? नंतर तुम्ही पक्का पूल बांधला, मग तरी हा पूल नागरिक का वापरतात, हे समजून घेतले काय? तो तकलादू असता तर लोकांना जीव धोक्यात घालायची हौस आहे काय? या प्रश्नांकडे सोयीस्कर कानाडोळा केला जातो.प्रत्येक व्यक्तीला मरण आहे, ते कुणाला चुकलेले नाही. मग सामान्य माणूस असो की, मोठा राजकीय नेता. मृत्यू अटळ आहे. आणि मृत्यूनंतर सोबत तो काहीही घेऊन जात नसतो. हे सगळे आम्ही अध्यात्मातून, व्यवहारातून शिकत असलो तरी वर्तनातून ते प्रतिबिंबीत होत नाही. ‘टाळूवरचे लोणी खाणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ महापालिकेच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत नुकताच दिसून आला. पाच वर्षांपूर्वी रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्ट या स्वयंसेवी संस्थेने महापालिकेला शवदाहिनी उभारुन देण्याचा प्रस्ताव दिला होता. सगळा खर्च रोटरी क्लब करणार होती, त्यानंतर देखभाल आणि दुरुस्ती महापालिकेला करायची होती. परंतु, पाच वर्षात काहीही झाले नाही. आता महापालिकेने नव्याने ठराव करुन शवदाहिनीसाठी निधीची तरतूद करण्यात केली. रोटरी क्लबच्या पदाधिकाºयांनी महापालिका प्रशासनाला जुन्या प्रस्तावाची आठवण करुन दिली असता ते चकीत झाले. घरातल्याच गोष्टी घरातल्या व्यक्ती सोयीस्कर विसरुन जात असतील, तर हा शुध्द विसरभोळेपणा म्हणायचा का? का आणखी काही, हे तुम्हीच ठरवा.

 

 

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगाव