शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

आजचा अग्रलेख: शिवसेनेतील बंडाळी, पेल्यातील वादळ ठरणार की सत्तापालट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 10:20 IST

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याचे चित्र आहे. बंडखोर आमदारांची समजूत काढण्यात ठाकरे यांना यश आले तर हे बंड ‘पेल्यातील वादळ’ ठरेल, नाहीतर राज्यातील सरकारच बदलून टाकेल.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने महाराष्ट्राची वाटचाल राजकीय अस्थिरतेकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक यांच्यानंतर शिवसेनेतील हे आणखी एक मोठे बंड आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षातील निम्याहून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याचे चित्र आहे. बंडखोर आमदारांची समजूत काढण्यात ठाकरे यांना यश आले तर हे बंड ‘पेल्यातील वादळ’ ठरेल, नाहीतर राज्यातील सरकारच बदलून टाकेल.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपने बाजी मारल्याने महाविकास आघाडीतील सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले. यानंतर सकाळी-सकाळीच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्याचे वृत्त धडकले अन‌् या राजकीय अस्थिरतेचे वादळ महाराष्ट्रावर घोंघावू लागले आहे. आघाडीतील धुसफूस वेळीच शमवता आली असती तर ही वेळ आली नसती. विजयाचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतात. मात्र, पराभवाला काेणी धनी नसताे, असे म्हटले जाते. महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचे असेच झाले आहे. पंधरा दिवसांत सलग दाेन पराभव पचवावे लागले. त्याची जबाबदारी काेणी घ्यायला तयार नाही आणि काेणी समजूनही सांगायला तयार नाही. परिणामी महाआघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे.

वास्तविक महाराष्ट्रात १९९५ पासून युती किंवा आघाडीच्या सरकारची परंपरा सुरू झाली आहे. त्यापूर्वीच १९९० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली. ती तीन दशके चालली. २०१९ मध्येही युती करूनच विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात आल्या. हिंदुत्व हा आमचा समान धागा आहे, अशी या पक्षांची कायम भूमिका हाेती. मात्र, विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजप १०५ जागा जिंकून प्रथम क्रमांकावर उभा राहिला. शिवसेना केवळ ५५ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तरीही मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने आग्रह धरला आणि युती तुटून महाआघाडी तयार झाली. तेव्हापासून भाजप प्रचंड अस्वस्थ आहे. काेणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये फूट पाडून फुटीर गटासाेबत सत्तेवर येण्याचे प्रयत्न भाजपने केले. काेविड संसर्गाच्या काळातदेखील या राजकारणाचा वणवा पेटला हाेता. याचाच भाग म्हणून केंद्रात सत्तेवर असलेल्या संधीचा लाभ घेत विविध केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नामाेहरम करण्यात आले. सध्यादेखील महाआघाडी सरकारमधील दाेन मंत्री तुरुंगात आहेत. यातून भीतीचे वातावरण तयार करण्याची एकही संधी भाजपने साेडली नाही. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला फाेडाफाेडी करण्याची संधी चालून आली आणि ती या पक्षाने वापरली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काेविडची परिस्थिती मात्र उत्तम हाताळली.

केंद्रातील भाजपला महाराष्ट्र हवा आहे. दक्षिणेत कर्नाटक वगळता भाजपचा विस्तार हाेत नाही. पूर्वेकडील राज्यात आसाम वगळता इतर राज्यांत स्थानिक पक्ष मजबूत आहेत. उत्तरेत विस्ताराची सीमांत रेषा भाजपने गाठली आहे. कमी-अधिक फटका उत्तरेत बसला तर महाराष्ट्राची मदत हवी. शिवाय महाराष्ट्राची आर्थिक ताकद मजबूत आहे. या सर्व संघर्षातून जात असताना तीन पक्षांचा संगम नीट झाला नाही. परिणामी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण उभारले. त्यांच्याबराेबर असलेल्या आमदारांच्या संख्येबाबत उलटसुलट दावे हाेत आहेत. आर्थिकदृष्ट्या देशातील एक नंबरचे राज्य आणि राजकीयदृष्ट्या दुसऱ्या क्रमांकावरच्या राज्यातील या गडबडीने सर्वच राजकीय पक्षांत खळबळ उडाली नसेल तरच नवल!

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक हाेणार आहे. अग्निपथ याेजनेमुळे युवकांमध्ये असंताेष पसरलेला आहे. भाजपमध्ये एकमुखी नेतृत्व असले तरी सर्व काही सुरळीत आहे, असा त्याचा अर्थ नाही. विधानसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदावरून शिंदे यांना काढून टाकण्यात आले आहे. मात्र, महाविकास आघाडीला समर्थन टिकविणे कठीण जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती तोडा आणि भाजपशी युती करून सरकार बनवा,  अशी मागणी केली आहे.  यामागे भाजपच असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र