शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

आजचा अग्रलेख: शिवसेनेतील बंडाळी, पेल्यातील वादळ ठरणार की सत्तापालट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 10:20 IST

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याचे चित्र आहे. बंडखोर आमदारांची समजूत काढण्यात ठाकरे यांना यश आले तर हे बंड ‘पेल्यातील वादळ’ ठरेल, नाहीतर राज्यातील सरकारच बदलून टाकेल.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने महाराष्ट्राची वाटचाल राजकीय अस्थिरतेकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक यांच्यानंतर शिवसेनेतील हे आणखी एक मोठे बंड आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षातील निम्याहून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याचे चित्र आहे. बंडखोर आमदारांची समजूत काढण्यात ठाकरे यांना यश आले तर हे बंड ‘पेल्यातील वादळ’ ठरेल, नाहीतर राज्यातील सरकारच बदलून टाकेल.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपने बाजी मारल्याने महाविकास आघाडीतील सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले. यानंतर सकाळी-सकाळीच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्याचे वृत्त धडकले अन‌् या राजकीय अस्थिरतेचे वादळ महाराष्ट्रावर घोंघावू लागले आहे. आघाडीतील धुसफूस वेळीच शमवता आली असती तर ही वेळ आली नसती. विजयाचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतात. मात्र, पराभवाला काेणी धनी नसताे, असे म्हटले जाते. महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचे असेच झाले आहे. पंधरा दिवसांत सलग दाेन पराभव पचवावे लागले. त्याची जबाबदारी काेणी घ्यायला तयार नाही आणि काेणी समजूनही सांगायला तयार नाही. परिणामी महाआघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे.

वास्तविक महाराष्ट्रात १९९५ पासून युती किंवा आघाडीच्या सरकारची परंपरा सुरू झाली आहे. त्यापूर्वीच १९९० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली. ती तीन दशके चालली. २०१९ मध्येही युती करूनच विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात आल्या. हिंदुत्व हा आमचा समान धागा आहे, अशी या पक्षांची कायम भूमिका हाेती. मात्र, विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजप १०५ जागा जिंकून प्रथम क्रमांकावर उभा राहिला. शिवसेना केवळ ५५ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तरीही मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने आग्रह धरला आणि युती तुटून महाआघाडी तयार झाली. तेव्हापासून भाजप प्रचंड अस्वस्थ आहे. काेणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये फूट पाडून फुटीर गटासाेबत सत्तेवर येण्याचे प्रयत्न भाजपने केले. काेविड संसर्गाच्या काळातदेखील या राजकारणाचा वणवा पेटला हाेता. याचाच भाग म्हणून केंद्रात सत्तेवर असलेल्या संधीचा लाभ घेत विविध केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नामाेहरम करण्यात आले. सध्यादेखील महाआघाडी सरकारमधील दाेन मंत्री तुरुंगात आहेत. यातून भीतीचे वातावरण तयार करण्याची एकही संधी भाजपने साेडली नाही. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला फाेडाफाेडी करण्याची संधी चालून आली आणि ती या पक्षाने वापरली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काेविडची परिस्थिती मात्र उत्तम हाताळली.

केंद्रातील भाजपला महाराष्ट्र हवा आहे. दक्षिणेत कर्नाटक वगळता भाजपचा विस्तार हाेत नाही. पूर्वेकडील राज्यात आसाम वगळता इतर राज्यांत स्थानिक पक्ष मजबूत आहेत. उत्तरेत विस्ताराची सीमांत रेषा भाजपने गाठली आहे. कमी-अधिक फटका उत्तरेत बसला तर महाराष्ट्राची मदत हवी. शिवाय महाराष्ट्राची आर्थिक ताकद मजबूत आहे. या सर्व संघर्षातून जात असताना तीन पक्षांचा संगम नीट झाला नाही. परिणामी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण उभारले. त्यांच्याबराेबर असलेल्या आमदारांच्या संख्येबाबत उलटसुलट दावे हाेत आहेत. आर्थिकदृष्ट्या देशातील एक नंबरचे राज्य आणि राजकीयदृष्ट्या दुसऱ्या क्रमांकावरच्या राज्यातील या गडबडीने सर्वच राजकीय पक्षांत खळबळ उडाली नसेल तरच नवल!

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक हाेणार आहे. अग्निपथ याेजनेमुळे युवकांमध्ये असंताेष पसरलेला आहे. भाजपमध्ये एकमुखी नेतृत्व असले तरी सर्व काही सुरळीत आहे, असा त्याचा अर्थ नाही. विधानसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदावरून शिंदे यांना काढून टाकण्यात आले आहे. मात्र, महाविकास आघाडीला समर्थन टिकविणे कठीण जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती तोडा आणि भाजपशी युती करून सरकार बनवा,  अशी मागणी केली आहे.  यामागे भाजपच असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र