शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: शिवसेनेतील बंडाळी, पेल्यातील वादळ ठरणार की सत्तापालट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 10:20 IST

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याचे चित्र आहे. बंडखोर आमदारांची समजूत काढण्यात ठाकरे यांना यश आले तर हे बंड ‘पेल्यातील वादळ’ ठरेल, नाहीतर राज्यातील सरकारच बदलून टाकेल.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने महाराष्ट्राची वाटचाल राजकीय अस्थिरतेकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक यांच्यानंतर शिवसेनेतील हे आणखी एक मोठे बंड आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षातील निम्याहून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याचे चित्र आहे. बंडखोर आमदारांची समजूत काढण्यात ठाकरे यांना यश आले तर हे बंड ‘पेल्यातील वादळ’ ठरेल, नाहीतर राज्यातील सरकारच बदलून टाकेल.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपने बाजी मारल्याने महाविकास आघाडीतील सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले. यानंतर सकाळी-सकाळीच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्याचे वृत्त धडकले अन‌् या राजकीय अस्थिरतेचे वादळ महाराष्ट्रावर घोंघावू लागले आहे. आघाडीतील धुसफूस वेळीच शमवता आली असती तर ही वेळ आली नसती. विजयाचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतात. मात्र, पराभवाला काेणी धनी नसताे, असे म्हटले जाते. महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचे असेच झाले आहे. पंधरा दिवसांत सलग दाेन पराभव पचवावे लागले. त्याची जबाबदारी काेणी घ्यायला तयार नाही आणि काेणी समजूनही सांगायला तयार नाही. परिणामी महाआघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे.

वास्तविक महाराष्ट्रात १९९५ पासून युती किंवा आघाडीच्या सरकारची परंपरा सुरू झाली आहे. त्यापूर्वीच १९९० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली. ती तीन दशके चालली. २०१९ मध्येही युती करूनच विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात आल्या. हिंदुत्व हा आमचा समान धागा आहे, अशी या पक्षांची कायम भूमिका हाेती. मात्र, विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजप १०५ जागा जिंकून प्रथम क्रमांकावर उभा राहिला. शिवसेना केवळ ५५ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तरीही मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने आग्रह धरला आणि युती तुटून महाआघाडी तयार झाली. तेव्हापासून भाजप प्रचंड अस्वस्थ आहे. काेणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये फूट पाडून फुटीर गटासाेबत सत्तेवर येण्याचे प्रयत्न भाजपने केले. काेविड संसर्गाच्या काळातदेखील या राजकारणाचा वणवा पेटला हाेता. याचाच भाग म्हणून केंद्रात सत्तेवर असलेल्या संधीचा लाभ घेत विविध केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नामाेहरम करण्यात आले. सध्यादेखील महाआघाडी सरकारमधील दाेन मंत्री तुरुंगात आहेत. यातून भीतीचे वातावरण तयार करण्याची एकही संधी भाजपने साेडली नाही. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला फाेडाफाेडी करण्याची संधी चालून आली आणि ती या पक्षाने वापरली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काेविडची परिस्थिती मात्र उत्तम हाताळली.

केंद्रातील भाजपला महाराष्ट्र हवा आहे. दक्षिणेत कर्नाटक वगळता भाजपचा विस्तार हाेत नाही. पूर्वेकडील राज्यात आसाम वगळता इतर राज्यांत स्थानिक पक्ष मजबूत आहेत. उत्तरेत विस्ताराची सीमांत रेषा भाजपने गाठली आहे. कमी-अधिक फटका उत्तरेत बसला तर महाराष्ट्राची मदत हवी. शिवाय महाराष्ट्राची आर्थिक ताकद मजबूत आहे. या सर्व संघर्षातून जात असताना तीन पक्षांचा संगम नीट झाला नाही. परिणामी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण उभारले. त्यांच्याबराेबर असलेल्या आमदारांच्या संख्येबाबत उलटसुलट दावे हाेत आहेत. आर्थिकदृष्ट्या देशातील एक नंबरचे राज्य आणि राजकीयदृष्ट्या दुसऱ्या क्रमांकावरच्या राज्यातील या गडबडीने सर्वच राजकीय पक्षांत खळबळ उडाली नसेल तरच नवल!

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक हाेणार आहे. अग्निपथ याेजनेमुळे युवकांमध्ये असंताेष पसरलेला आहे. भाजपमध्ये एकमुखी नेतृत्व असले तरी सर्व काही सुरळीत आहे, असा त्याचा अर्थ नाही. विधानसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदावरून शिंदे यांना काढून टाकण्यात आले आहे. मात्र, महाविकास आघाडीला समर्थन टिकविणे कठीण जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती तोडा आणि भाजपशी युती करून सरकार बनवा,  अशी मागणी केली आहे.  यामागे भाजपच असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र