शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

आजचा अग्रलेख: राजे, आम्हाला माफ करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 07:40 IST

मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राहिलेले खासदार नारायण राणे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते व त्यांच्या मुलांनी राजकोट किल्ला आमच्या इलाख्यात येतो, त्यामुळे बाहेरच्यांना येथे येण्याचा अधिकार नाही, अशी टोळीबाज भूमिका घेतली.

भारताच्या आरमारशक्तीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवरायांचा गाैरव म्हणून आठ महिन्यांपूर्वी तळकोकणातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला त्यांचा पुतळा परवा वादळात उन्मळून पडला. छत्रपती हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य. परिणामी, त्या अपघाताने शिवप्रेमींना प्रचंड वेदना झाल्या. महाराष्ट्र सरकार तसेच नाैसेनेने स्वतंत्रपणे अपघाताची चाैकशी सुरू केली. कल्याणचे शिल्पकार जयदीप आपटे व चबुतरा उभारण्यातील अभियंता चेतन पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तथापि, त्या पुतळ्याचे अनावरण गेल्या डिसेंबरमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यामुळे या अपघाताला राजकारणाची किनार मिळाली आणि गेले चार दिवस त्या आघाडीवर जोरदार हुल्लडबाजी सुरू आहे.

पुतळ्याच्या उभारणीत नैतिक व आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस हे विरोधी पक्ष आक्रमक आहेत. एरव्ही असा मोठा पुतळा घडवायला तीन वर्षे लागत असताना निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी तो घाईघाईने काही महिन्यांमध्ये तयार केला आणि अनावरण करण्यात आले, हा विरोधकांचा आरोप आहे. विरोधकांना त्याच आक्रमकतेने जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता पार्टी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू आहे. दोन्हीकडील बोलघेवडे नेते विद्वत्तेचा उसना आव आणून जे बोलत आहेत, त्यामुळे लोकांमध्ये अधिक संताप आहे. त्याच भागातून निवडून येणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी तर, घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा आणखी भव्य पुतळा उभा केला जाईल, असे वक्तव्य केले. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटताच आपल्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आल्याचा बचाव त्यांनी केला. जिथे हा पुतळा कोसळला तेथे तर हुल्लडबाजीचा कहर झाला. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राहिलेले खासदार नारायण राणे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते व त्यांच्या मुलांनी राजकोट किल्ला आमच्या इलाख्यात येतो, त्यामुळे बाहेरच्यांना येथे येण्याचा अधिकार नाही, अशी टोळीबाज भूमिका घेतली. प्रतिआंदोलनासाठी आपले समर्थक जमवून पोलिसांवर व विरोधी पक्षांच्या नेत्यांवर त्यांनी केलेली दादागिरी मान खाली घालायला लावणारी आहे. एकंदरीत राजकीय राडा पाहता सत्ताधारी व विरोधक, दोन्हीकडील मंडळी आपापल्या राजकारणासाठी तर छत्रपतींचा, त्यांच्याप्रति जनतेतील अपार श्रद्धेचा वापर करीत नाहीत ना, अशी शंका यावी. मुळात पुतळा किंवा स्मारक म्हणजेच महापुरुषांच्या विचारांचा, कृतीचा वारसा हाच मोठा राजकीय गैरसमज आहे. स्वराज्यातील मुलीबाळींच्या अब्रूचे रक्षण हा शिवरायांच्या कारभाराचा संपूर्ण जगाने आदर्श घेतलेला विशेष होता. छत्रपती ते रयतेसाठी मनापासून करायचे. तो दिखावा नव्हता. म्हणूनच मुलीबाळींच्या अब्रूवर हात घालणाऱ्या मातब्बर पाटलाचे हातपाय छाटून त्याचा चाैरंग करण्याचा वस्तुपाठ त्यांनी राज्यकारभारातून घालून दिला.

अलीकडेच बदलापूर, अकोला वगैरे ठिकाणी लहान बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना पाहता महिला संरक्षणाचा तो वारसा पुढे नेण्यासाठी काय कृती केली हे पुतळ्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात न लावण्याचा किंवा मावळ्यांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचा असाच वारसा सार्वजनिक क्षेत्रात असणाऱ्यांनी कृतीने सिद्ध केला तरच त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार मिळतो याचे भान सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही ठेवायला हवे. दुर्दैवाने प्रगत, पुरोगामी, कृतिशील महाराष्ट्रात हे घडताना दिसत नाही. उथळ व बटबटीत राजकारण हे या अवस्थेचे मूळ आहे. हेच राजकारण अशा मुद्द्यांवर ‘राजकारण नको’ म्हणायला भाग पाडते. कारण, अपघात असो की अन्य काही; विरोधक संधी सोडणार नाहीत. जे सत्तेत आहेत तेदेखील विरोधात असताना ती सोडत नव्हते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जे घडले ते मान्य करून उमदेपणाने निषेधाचा, आंदोलनांचा सामना करायला हवा.

बदलापूर येथे कोवळ्या मुलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी किंवा राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नव्हे तर मग कोणत्या विषयांवर राजकारण करायचे, हेदेखील सत्ताधाऱ्यांनी सांगितले तर बरे होईल. अशी भूमिका औचित्याची नाही. कल्पना करा की, विरोधक सत्तेत असते आणि सत्ताधारी विरोधात असते तर त्यांनी काय केले असते? अधिक वेदनादायी हे आहे की, एकमेकांवर टीका करताना कंबरेखाली वार, रस्त्यावरच्या गुंडांसारखी भाषा असे सारे काही छत्रपती शिवरायांच्या नावाने या महाराष्ट्रात सुरू आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज