शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
बाबा 1 कोटी रुपये द्या, तरच...! 12 वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात अजबच मागणी, CJI गवईंनी आईलाच सुनावलं!
4
एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा
5
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
6
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
7
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
8
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
9
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
10
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
11
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
12
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
13
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
14
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
15
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
17
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
18
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
19
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
20
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता

आजचा अग्रलेख: काँग्रेसची विश्रांती आणि निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 06:54 IST

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडेच दुर्लक्ष झाल्याने काँग्रेस पक्षाची  पडझड झाली, हे उशिरा का होईना, पण नेत्यांच्या लक्षात आल्याचे दिसते.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन गुजरातमध्ये अहमदाबादला पार पडले. ज्यांनी पक्षकार्यामध्ये कोणतीही मदत केली नाही, त्यांनी विश्रांती घ्यावी आणि ज्यांना पक्षाची जबाबदारी घ्यायची नाही त्यांनी निवृत्तीच स्वीकारावी, असा इशारा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला तेव्हा के. कामराज यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आणलेल्या योजनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना १९६३ मध्ये के. कामराज यांनी पक्षाच्या बड्या नेत्यांनी सत्तापदे सोडून द्यावीत आणि पक्षकार्याला वाहून घ्यावे, अशी योजना मांडली होती. या ‘कामराज योजने’ला प्रतिसाद म्हणून नेहरूंच्या मंत्रिमंडळातील सहा ज्येष्ठ मंत्र्यांनी आणि सहा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन सत्तेचा त्याग केला आणि पक्षकार्याला वाहून घेतले.

सतत सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षाची भूमिका कशी निभवायची असते हेच विसरून गेलेले आहेत. १९८९च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाला बहुमत मिळविता आलेले नाही. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर सलग तीन लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आदी प्रदेशांत गेली चार दशके काँग्रेस सत्तेपासून दूर आहे. पक्षाकडे निवडणुकांचे गणित साध्य करणारी यंत्रणा किंवा संघटन नसेल तर पक्ष सत्तेवर कसा येणार? मल्लिकार्जुन खरगे यांचा कडक इशारा यासाठीच दिसतो आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार, आचार आणि प्रसार करताना साम-दाम-दंड-भेद अवलंबण्याची नीती आखली आहे. शिवाय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी प्रसंगी तपास यंत्रणांचा वापर केल्याने काँग्रेसच्या नेतेमंडळींमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रदेश पातळीवरील काँग्रेसचे अनेक नेते स्थानिक भाजपशी जुळवून घेतात, अशी तक्रार काँग्रेसच्या या अधिवेशनात समोर आली. त्यामुळेच आता स्पष्ट भूमिका घेण्यावाचून गत्यंतर नाही या भावनेने मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी डावपेचाचा भाग म्हणून हा इशारा दिलेला असावा.

भाजपच्या आक्रमक हिंदुत्ववादी प्रचाराचे आव्हान कसे स्वीकारायचे हा मुद्दा काँग्रेसच्या या अधिवेशनात अधिक चर्चेत राहिला. त्याबाबत मतभेदही समोर आले.  ज्येष्ठ संसद सदस्य शशी थरूर आदींनी भाजपच्या द्वेषमूलक प्रचाराचा सामना प्रति-द्वेषाने नव्हे, रचनात्मक मार्गाने करावा, असा मुद्दा मांडला. थरूर यापूर्वीही हे बोलत होतेच, आता पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावर त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने त्याला एक वेगळे महत्त्व आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या ‘संविधान बचाव’ मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. काँग्रेस पक्ष हिंदूविरोधी असल्याचा प्रचार करण्यात भाजप नेहमी आक्रमक राहिला आहे. अशा प्रचाराला उत्तर देताना भूमिका मवाळ की जहाल असावी याची चर्चा जरूर झाली पाहिजे.  मूलतत्त्ववादी तथा सनातनी विचारांना जवळ करणाऱ्या भाजपच्या राजकारणाचा, त्यांच्या आक्रमक प्रचाराचा मुकाबला कसा करायचा? - याचे उत्तर  देशभरातील काँग्रेसजनांना हवे आहे. भाजपला देशपातळीवर पर्याय देण्याची क्षमता काँग्रेसकडेच आहे, या पक्षाध्यक्ष खरगे यांच्या दाव्याविषयी शंका नाही. तमिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्र या प्रदेशांत काँग्रेसला मित्रपक्षाशिवाय पर्याय नाही. याउलट महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूवगळता भाजप स्वबळावर लढाई करू शकतो. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी स्पष्टपणे सांगून टाकले आहे की, तुम्ही सोबत आला तर घेऊ, न आलात तर बाजूला करू!  पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडेच दुर्लक्ष झाल्याने काँग्रेस पक्षाची  पडझड झाली, हे उशिरा का होईना, पण नेत्यांच्या लक्षात आल्याचे दिसते.

कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्याबरोबरच केंद्रीय नेत्यांना पक्षाला कार्यक्रमही द्यावे लागणार आहेत. संविधान बचाव मोहीम महत्त्वाची असली तरी धार्मिक द्वेषाच्या राजकारणाला पर्यायी विकास नीतीचे उत्तर असू शकते. यासाठी धार्मिक प्रचाराच्या मागे लपलेले चेहरे उघड करणे ही प्रचाराची रणनीती असायला हवी. काँग्रेसने विचार, आचार आणि प्रचाराची गरज आता कुठे ओळखली आहे. त्याचा पाठपुरावा न करणाऱ्यांना विश्रांती देण्याचे किंवा निवृत्त करण्याचे धाडस आता या पक्षाने करावे. ही धाडसाची पावले उचलली, तरच मरगळलेल्या काँग्रेसला पुन्हा उभारी येऊ शकेल.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे