शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

आजचा अग्रलेख : जरांगे शहाणे निघाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 11:36 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीतील माघारीच्या दिवसापर्यंत ताकदीचे मतदारसंघ, उमेदवारांची चाचपणी अशी खलबते सुरू ठेवून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अखेरच्या क्षणी धक्का दिला आणि आंदोलक कार्यकर्ते निवडणूक लढविणार नाहीत, असे जाहीर केले.  त्यांचा हा निर्णय तसा अजिबात अनाकलनीय नाही.

विधानसभा निवडणुकीतील माघारीच्या दिवसापर्यंत ताकदीचे मतदारसंघ, उमेदवारांची चाचपणी अशी खलबते सुरू ठेवून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अखेरच्या क्षणी धक्का दिला आणि आंदोलक कार्यकर्ते निवडणूक लढविणार नाहीत, असे जाहीर केले.  त्यांचा हा निर्णय तसा अजिबात अनाकलनीय नाही. नुसतेच धावत राहण्यापेक्षा कुठे व कधी थांबायचे हे ज्याला कळते तो अंतिमत: जिंकतो. प्रत्यक्ष निवडणुकीपासून दूर राहण्याचा शहाणपणाचा निर्णय घेऊन जरांगे यांनी तेच दाखवून दिले आहे. निवडणुकीत उतरण्याचा आधीचा निर्णय बदलताना जरांगे यांनी दिलेली, एका जातीच्या बळावर निवडणूक जिंकणे सोपे नाही, ही कबुली महत्त्वाची आहे.

अलीकडे हरियाणाच्या निकालात हेच दिसले. भूपिंदरसिंह हुडा यांच्या नेतृत्वात एकजूट जाट समाजाला इतर समाजांची साथ मिळाली नाही. परिणामी, अगदीच अपेक्षित अशा विजयाने काँग्रेसला हुलकावणी दिली. अर्थात, ही जाणीव जरांगे यांना आधी असावीच. म्हणूनच त्यांनी माैलाना सज्जाद मोमानी व राजरत्न आंबेडकर यांना सोबत घेऊन मराठा, मुस्लीम व दलित समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. हा ‘एमएमडी फाॅर्म्युला’ काही मतदारसंघांमध्ये विजयाच्या जवळ नेणारा ठरेल, असे त्यांना वाटले. तथापि, देशाचे राजकारण ‘बायपोलर’ बनत चालले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे ‘एनडीए’ किंवा विरोधकांची ‘इंडिया’ या दोन्ही आघाड्यांपासून दूर राहणाऱ्या पक्षांना मतदार फारसे पसंत करीत नाहीत, हे वारंवार दिसून आले आहे. महाराष्ट्रातील मुख्य लढाई सत्ताधारी महायुती विरुद्ध लोकसभेला चांगले यश मिळालेल्या महाविकास आघाडीत आहे. अशावेळी केवळ आरक्षणाच्या मुद्यावर मतदार जरांगे फॅक्टरला पसंती देतील, याची खात्री नसल्यामुळेच निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला असावा. जरांगे यांच्या या निर्णयाला निवडणुकीच्या इतिहासातील एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजकारण ढवळून काढणारे, प्रस्थापित नेत्यांना धडकी भरविणारे शरद जोशी कधीकाळी ‘निवडणुकीत उतरलो तर जोड्याने मारा’ म्हणाले होते. १९९० च्या निवडणुकीत संघटनेचे अनेक पाईक जनता दलाच्या तिकिटावर विजयी होऊन विधानसभेत पोहोचले. पुढच्या निवडणुकीत स्वत: शरद जोशींनाच निवडणुकीचे आकर्षण वाटले. ते राजकीय पक्षांशी दोन हात करण्यासाठी रणांगणात उतरले. स्वतंत्र भारत पक्ष नावाने त्यांनी सी. राजगोपालाचारी यांच्या स्वतंत्र पार्टीचे पुनरुज्जीवन केले. तथापि, मतदारांनी संघटनेच्या उमेदवारांना धक्का दिला. स्वत: शरद जोशी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघात शिवसेनेचे अशोक शिंदे यांच्याकडून पराभूत झाले. या निवडणुकीने जोशींचे आंदोलन व शेतकरी संघटनेच्या चळवळीला ओहोटी लागली. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर चळवळी उभ्या करणाऱ्या सर्वांसाठी हा दूरगामी परिणामांचा धडा होता. कार्यकर्त्यांच्या घामावर उभ्या राहणाऱ्या चळवळी हे राजकारणच असते खरे; तथापि, निवडणुकीचे राजकारण वेगळे असते. निवडणुका युद्धाप्रमाणे लढल्या जातात आणि त्यात साम-दाम-दंड-भेद या सर्व नीतींचा वापर करावा लागतो. चळवळी चालवणाऱ्यांना राजकीय पुढाऱ्यांच्या रणांगणावर उतरून त्या नीतींचा वापर करणे जमतेच असे नाही. अलीकडच्या काळात तर निवडणूक हा सगळा पैशांचा खेळ बनला आहे. निवडणुकीत पैसा टाका आणि निवडून आल्यावर त्याची वसुली करा, असा हा राजकारणाचा नवा रोकडा प्रकार आहे. त्यामुळेच विचार किंवा पक्षावरील निष्ठा पातळ झाल्या आहेत. चळवळींपुढील ध्येय तर खूप दूरची गोष्ट. हा सगळा विचार करता मनोज जरांगे-पाटील यांनी निवडणुकीत न उतरण्याचा अत्यंत शहाणपणाचा निर्णय घेतला असे म्हणावे लागेल. आता ते भले ‘कोणाला निवडून आणा’ म्हणोत की, ‘कोणाला पाडा’ म्हणोत, मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव दाखविण्याची एक संधी त्यांनी आपल्या हातात राखून ठेवली आहे. कारण, असे समर्थन किंवा विरोध आकड्यांमध्ये मोजता येत नाही. निवडून आला तर आमच्यामुळे आणि पडला तरी आमच्यामुळे असे म्हणण्याची अंगभूत सोय त्यात असते. जरांगे यांच्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे साधारण चित्र महायुती व महाविकास आघाडीत अधिक थेट लढत आणि सोबतच परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे बनले आहे. जरांगे फॅक्टर कोणाला मदत करतो, त्यांचे उमेदवार रिंगणात नसल्याचा फटका कोणाला बसतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४