शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख : जरांगे शहाणे निघाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 11:36 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीतील माघारीच्या दिवसापर्यंत ताकदीचे मतदारसंघ, उमेदवारांची चाचपणी अशी खलबते सुरू ठेवून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अखेरच्या क्षणी धक्का दिला आणि आंदोलक कार्यकर्ते निवडणूक लढविणार नाहीत, असे जाहीर केले.  त्यांचा हा निर्णय तसा अजिबात अनाकलनीय नाही.

विधानसभा निवडणुकीतील माघारीच्या दिवसापर्यंत ताकदीचे मतदारसंघ, उमेदवारांची चाचपणी अशी खलबते सुरू ठेवून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अखेरच्या क्षणी धक्का दिला आणि आंदोलक कार्यकर्ते निवडणूक लढविणार नाहीत, असे जाहीर केले.  त्यांचा हा निर्णय तसा अजिबात अनाकलनीय नाही. नुसतेच धावत राहण्यापेक्षा कुठे व कधी थांबायचे हे ज्याला कळते तो अंतिमत: जिंकतो. प्रत्यक्ष निवडणुकीपासून दूर राहण्याचा शहाणपणाचा निर्णय घेऊन जरांगे यांनी तेच दाखवून दिले आहे. निवडणुकीत उतरण्याचा आधीचा निर्णय बदलताना जरांगे यांनी दिलेली, एका जातीच्या बळावर निवडणूक जिंकणे सोपे नाही, ही कबुली महत्त्वाची आहे.

अलीकडे हरियाणाच्या निकालात हेच दिसले. भूपिंदरसिंह हुडा यांच्या नेतृत्वात एकजूट जाट समाजाला इतर समाजांची साथ मिळाली नाही. परिणामी, अगदीच अपेक्षित अशा विजयाने काँग्रेसला हुलकावणी दिली. अर्थात, ही जाणीव जरांगे यांना आधी असावीच. म्हणूनच त्यांनी माैलाना सज्जाद मोमानी व राजरत्न आंबेडकर यांना सोबत घेऊन मराठा, मुस्लीम व दलित समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. हा ‘एमएमडी फाॅर्म्युला’ काही मतदारसंघांमध्ये विजयाच्या जवळ नेणारा ठरेल, असे त्यांना वाटले. तथापि, देशाचे राजकारण ‘बायपोलर’ बनत चालले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे ‘एनडीए’ किंवा विरोधकांची ‘इंडिया’ या दोन्ही आघाड्यांपासून दूर राहणाऱ्या पक्षांना मतदार फारसे पसंत करीत नाहीत, हे वारंवार दिसून आले आहे. महाराष्ट्रातील मुख्य लढाई सत्ताधारी महायुती विरुद्ध लोकसभेला चांगले यश मिळालेल्या महाविकास आघाडीत आहे. अशावेळी केवळ आरक्षणाच्या मुद्यावर मतदार जरांगे फॅक्टरला पसंती देतील, याची खात्री नसल्यामुळेच निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला असावा. जरांगे यांच्या या निर्णयाला निवडणुकीच्या इतिहासातील एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजकारण ढवळून काढणारे, प्रस्थापित नेत्यांना धडकी भरविणारे शरद जोशी कधीकाळी ‘निवडणुकीत उतरलो तर जोड्याने मारा’ म्हणाले होते. १९९० च्या निवडणुकीत संघटनेचे अनेक पाईक जनता दलाच्या तिकिटावर विजयी होऊन विधानसभेत पोहोचले. पुढच्या निवडणुकीत स्वत: शरद जोशींनाच निवडणुकीचे आकर्षण वाटले. ते राजकीय पक्षांशी दोन हात करण्यासाठी रणांगणात उतरले. स्वतंत्र भारत पक्ष नावाने त्यांनी सी. राजगोपालाचारी यांच्या स्वतंत्र पार्टीचे पुनरुज्जीवन केले. तथापि, मतदारांनी संघटनेच्या उमेदवारांना धक्का दिला. स्वत: शरद जोशी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघात शिवसेनेचे अशोक शिंदे यांच्याकडून पराभूत झाले. या निवडणुकीने जोशींचे आंदोलन व शेतकरी संघटनेच्या चळवळीला ओहोटी लागली. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर चळवळी उभ्या करणाऱ्या सर्वांसाठी हा दूरगामी परिणामांचा धडा होता. कार्यकर्त्यांच्या घामावर उभ्या राहणाऱ्या चळवळी हे राजकारणच असते खरे; तथापि, निवडणुकीचे राजकारण वेगळे असते. निवडणुका युद्धाप्रमाणे लढल्या जातात आणि त्यात साम-दाम-दंड-भेद या सर्व नीतींचा वापर करावा लागतो. चळवळी चालवणाऱ्यांना राजकीय पुढाऱ्यांच्या रणांगणावर उतरून त्या नीतींचा वापर करणे जमतेच असे नाही. अलीकडच्या काळात तर निवडणूक हा सगळा पैशांचा खेळ बनला आहे. निवडणुकीत पैसा टाका आणि निवडून आल्यावर त्याची वसुली करा, असा हा राजकारणाचा नवा रोकडा प्रकार आहे. त्यामुळेच विचार किंवा पक्षावरील निष्ठा पातळ झाल्या आहेत. चळवळींपुढील ध्येय तर खूप दूरची गोष्ट. हा सगळा विचार करता मनोज जरांगे-पाटील यांनी निवडणुकीत न उतरण्याचा अत्यंत शहाणपणाचा निर्णय घेतला असे म्हणावे लागेल. आता ते भले ‘कोणाला निवडून आणा’ म्हणोत की, ‘कोणाला पाडा’ म्हणोत, मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव दाखविण्याची एक संधी त्यांनी आपल्या हातात राखून ठेवली आहे. कारण, असे समर्थन किंवा विरोध आकड्यांमध्ये मोजता येत नाही. निवडून आला तर आमच्यामुळे आणि पडला तरी आमच्यामुळे असे म्हणण्याची अंगभूत सोय त्यात असते. जरांगे यांच्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे साधारण चित्र महायुती व महाविकास आघाडीत अधिक थेट लढत आणि सोबतच परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे बनले आहे. जरांगे फॅक्टर कोणाला मदत करतो, त्यांचे उमेदवार रिंगणात नसल्याचा फटका कोणाला बसतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४