शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे ‘ऑडिट’ करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 05:20 IST

अलीकडे भारतीय माध्यमांवर शंकेचे मळभ दाटले आहे. अशावेळी माध्यमांनी स्वत:च पुढे येऊन चौकशीला सामोरे जायला हवे व आपली प्रतिमा जपायला हवी.

- ॲड. फिरदौस मिर्झा, ज्येष्ठ विधिज्ञ, नागपूर प्रसारमाध्यमे ही नागरिकांचे डोळे व कान, अर्थात लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. प्रामाणिक, तटस्थ, सरळमार्गी प्रसारमाध्यमे लोकशाहीतील संस्थांचे संरक्षण करू शकतात तर अप्रामाणिक, भ्रष्ट आणि विकलेली प्रसारमाध्यमे लोकशाहीसाठी शाप आहेत. अलीकडे भारतीय माध्यमांवर शंकेचे मळभ दाटले असून, आधीसारखी त्यांची विश्वासार्हता राहिलेली नाही. माध्यमांवर एकच बाजू लावून धरण्याचे, खरे वार्तांकन न करण्याचे आरोप होत असून, त्यांना लोकांनी ‘गोदी मीडिया’ यासारखी नावे दिली आहेत. पराकोटीची बाब म्हणजे ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी ‘प्राइम टाइम’ दर्शकांची खोटी आकडेवारी दाखविणाऱ्या एका ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया हाऊस’विरोधात पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला. या माध्यमातून संबंधित ‘मीडिया हाऊस’ने केवळ खासगी आस्थापनाच नव्हे तर सरकारच्याही जाहिराती जास्त दराने मिळविल्या, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

गुजरातमधील एका वर्तमानपत्राविरोधात ‘ईडी’ने केलेली कारवाईदेखील जनतेसाठी धक्कादायकच आहे. संबंधित वर्तमानपत्राने गुजरातीचा खप २३ हजार ५०० अंक तर इंग्रजीचा ६ हजार ३०० असल्याचे घोषित केले होते. प्रत्यक्षात त्यांचा खप अनुक्रमे ३०० ते ६०० व ० ते २९० इतकाच होता. अगोदरच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर संशयाचे ढग दाटलेले असताना, सर्वसामान्य जनता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नसताना अशा प्रकारच्या घोटाळ्यांमुळे प्रामाणिक वृत्तपत्रांच्या प्रतिमांना तडा जाण्याची भीती आहे. मुद्रित प्रसारमाध्यमांचे नियंत्रण १८६७ च्या प्रेस ॲन्ड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्टद्वारे होते. या कायद्यानुसार वर्तमानपत्रांनी स्वत:हून पुरविलेल्या आकडेवारीच्या आधारावर ‘प्रेस रजिस्ट्रार’कडून वर्तमानपत्रांच्या खपाची नोंदणी होते. वर्तमानपत्रांनी पुरविलेल्या माहितीची खातरजमा करण्याची कुठलीही यंत्रणा नाही.
जगाच्या विविध भागात ‘एबीसी’ (ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन) कार्यरत आहेत. भारतात प्रकाशक, जाहिरातदार, जाहिरात एजन्सी सदस्य असलेली एक ‘नॉन प्रॉफिट’ संघटना म्हणून १९४८ मध्ये ‘एबीसी’ची स्थापना झाली. संस्थेचे सदस्य असलेल्या प्रकाशन संस्थांच्या खपाचे आकडे प्रमाणित करणारी ‘ऑडिट’ यंत्रणा ‘एबीसी’ने विकसित केली असून, दर सहा महिन्यांनी खपाचे आकडे ‘एबीसी’कडून घोषित होतात आणि ‘पॅनल’वरील सनदी लेखापालांच्या माध्यमातून त्यांचे ‘ऑडिट’ होते. एकूण मुद्रित माध्यमांच्या खपाच्या आकड्यांबाबत ही संस्था ‘वॉचडॉग’चे काम करते आणि त्यामुळे जाहिरातदारांना विविध प्रकाशनांच्या खपाची खातरजमा करता येते. प्रशासकीय व वाणिज्यविषयक उपक्रमांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी सरकारकडून जाहिरातींचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. सार्वजनिक तिजोरीतून त्यासाठी मोठा निधी खर्च होतो; मात्र कमी खपाच्या वर्तमानपत्रांनी आकडे फुगवून जाहिराती पळविल्या तर जाहिराती प्रकाशित करण्याचा उद्देशच फोल ठरतो. सरकारसोबतच सामान्य जनतेचीदेखील फसवणूक होते. जास्त खप दाखविण्यासाठी वर्तमानपत्रांकडून न्यूजप्रिंट खरेदी करून तोच पेपर नंतर काळ्या बाजारात विकण्याचे गैरप्रकार होत असल्याच्या अफवा नेहमीच ऐकायला मिळतात. इलेक्ट्रॉनिक तसेच मुद्रित प्रसारमाध्यमांविरोधात पोलीस व ‘ईडी’तर्फे गुन्हे दाखल झाल्याने जाहिराती मिळविण्यासाठी विविध वर्तमानपत्रांकडून ‘आरएनआय’ तसेच इतर यंत्रणांना पुरविण्यात येणाऱ्या खपाच्या आकड्यांची चौकशी अनिवार्य आहे. सरकारकडून जाहिरातींवर खर्च करण्यात येणारा पैसा हा करदात्यांचा आहे. त्यामुळे ‘मनी लाँडरिंग’ आणि ‘आयपीसी’च्या विविध कायद्यांतर्गत व दक्षता आयोग, ‘ईडी’, ‘सीबीआय’ आणि राज्य पोलीस यांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत ही बाब येते. एका बाजूला भारतीय प्रसारमाध्यमांची प्रतिमा वेगाने खालावत आहे, तर भ्रष्टाचारविरोधातील लढ्याच्या जागतिक मानांकनातदेखील भारत माघारला आहे. अशावेळी वर्तमानपत्रांनी स्वत:च पुढे येऊन चौकशीला सामोरे जायला व आपल्या क्षेत्राची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्याने मुद्रित माध्यमांना परत जनतेचा विश्वास संपादित करता येई. 

टॅग्स :TRP Scamटीआरपी घोटाळा