शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

तीन दिवस अगोदर अचूक अंदाज देणे शक्य, हवामान खात्याचा अंदाज ठरतो खोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:58 AM

हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरतो. या पावसाळ्यात याचा प्रत्यय वारंवार आला. देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली तर शरद पवार यांनी अंदाज खरा ठरला म्हणून बारामतीची साखर पाठवली.

हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरतो. या पावसाळ्यात याचा प्रत्यय वारंवार आला. देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली तर शरद पवार यांनी अंदाज खरा ठरला म्हणून बारामतीची साखर पाठवली. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव यांची अविनाश थोरात यांनी घेतलेली मुलाखत...यावर्षी तुमचा अंदाज अनेकदा चुकला म्हणून सर्वत्र कठोर टीका होत आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात अत्याधुनिक मॉडेलच्या मदतीनेही तीन दिवसांपेक्षा जास्त काळाच्या हवामानाचा अंदाज करता येणे शक्य नसते. मुंबई महापालिका आणि राज्य शासन यांना पावसाचा इशारा वेळोवेळी दिला जातो. यंदाही तो दिला होता. १९५० ते २०१६ या काळात ५१ वेळा २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. मुंबईच्या दृष्टीने हा पाऊस सामान्यच होता. मुख्य प्रश्न उद्भवला होता तो पाण्याचा निचरा न होण्याच्या घटनांमुळे.यंदाच्या पावसात काहीवेळा हवामान विभागाच्या मॉडेलनुसार जास्त पाऊस दर्शविला होता, परंतु तो अंदाज खरा ठरला नाही. हा मान्सून संपल्यावर याबाबत हवामान विभागाकडून या सगळ्यांचे विश्लेषण केले जाईल.भारतीय हवामान विभागाकडे अचूक अंदाजासाठी पुरेशी यंत्रणा आहे का?अमेरिकेत विकसित झालेले अत्याधुनिक मॉडेल आपण वापरत आहोत. पूर्वी वापरत असलेल्या रडारमुळे केवळ ढगांची माहिती मिळत होती. आता आपण डॉपलर रडार वापरत असून, त्यामुळे ढगांची उंची, हवेचा वेग, दिशा समजणे शक्य होते. याच्या मदतीने आपण तीन तास अगोदर इशारा देऊ शकतो.अत्याधुनिक यंत्रणा असूनही हवामानाचे अंदाज अनेकदा का चुकतात?बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले की पाऊस पडतो. हवामान विभाग १ हजार ते १० हजार किलोमीटरच्या क्षेत्रातून विविध घटकांच्या आधारे माहिती गोळा करतो. यात चूक झाली, तर अंदाज चुकतात.सध्या देशात १,३५० पर्जन्यमापक केंद्रे आणि ७५० स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. त्यांच्याकडून आलेल्या माहितीचे पृथक्करण करून अंदाज वर्तविले जातात. पण कधी कधी ही माहिती अचूक मिळत नाही. त्यामुळे अंदाजही खरे ठरत नाहीत.अशा चुका टाळण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करीत आहात?मान्सून मिशनअंतर्गत ‘क्लायमेट फोरकास्ट सोल्युशन्स’ हे मॉडेल वापरले जात आहे. पुण्यातील उष्णकटिबंधीय हवामान अभ्यास केंद्रात संशोधन केले आहे. या मॉडेलच्या आधारे अचूक अंदाज वर्तविणे शक्य होईल. आपल्याकडे फक्त तालुकापातळीवर केंद्रांमध्ये केवळ पाऊस मोजला जातो.तापमान व आर्द्रता मोजली गेली, तर पूर्वानुमानाची चांगली माहिती उपलब्ध होईल. यामुळे तालुकापातळीवर पावसाचा अंदाज वर्तविणे सोपे जाईल.शरद पवार यांची पाठवलेली साखर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी यावर काय सांगाल?अधिकाºयांनी राजकीय वादात पडू नये. सगळी परिस्थिती, यंत्रणा वरिष्ठांना माहीत आहे. कामाची व अस्तित्वात असलेल्या यंत्रणेची माहिती त्यांना आहे. यापेक्षा मी यावर जास्त बोलणार नाही.