शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींच्या विचारांचे आचरण व्हायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 05:41 IST

महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते.

- टीआरके सौमय्या(व्यवस्थापकीय विश्वस्त, बॉम्बे सर्वोदय मंडळ)महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते. मी १० वर्षांचा असताना गांधीविचारांनी माझ्या मनावर गारुड केले. त्यामुळे मी गांधीजींच्या विचाराप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करु लागलो. सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा या विचारांचा प्रचार, प्रसार करण्याचा व त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही वेळा मला खोटे बोलावे लागते, त्याची खंत आहे. माझे खोटे बोलणे माझ्या स्वार्थासाठी नव्हे तर इतरांसाठीच असते. मात्र माझ्यातील हा दुर्गुणदेखील कमी करण्याचा प्रयत्न मी करत आहे. गांधी जयंती एक दिवस, एक सप्ताह साजरी करण्याऐवजी त्यांचे विचार दररोज आचरणात आणण्याची गरज आहे.माझे वय ८२ वर्षे आहे. मात्र तरुणाई, नवीन पिढी गांधी विचार पुढे नेण्यासाठी पुरेशा प्रमाणात पुढे येण्यास इच्छुक नाही, हे चित्र मनाला अतिशय वेदना देणारे आहे. नव्या पिढीत गांधी विचार रुजवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत़ मात्र हव्या त्या प्रमाणात तरुणाई याकडे वळण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून गांधी विचार प्रसार, प्रचार करण्याचे काम करण्यासाठी कोणी इच्छुक स्वत:हून पुढे येत नाही. नि:स्वार्थ भावनेने हे काम करण्याची गरज आहे. कॉर्पोरेट संस्कृतीप्रमाणे दर महिन्याला गलेलठ्ठ पगार घेऊन हे काम यशस्वी होणार नाही. मात्र सामाजिक कार्याच्या हेतूने नि:स्वार्थ भावनेने गांधी विचार पुढे नेण्यासाठी कोणी तयार होत नाही, हे दुर्दैव आहे. एकीकडे मंडळाच्या खर्चात महागाईमुळे सातत्याने वाढ होत असून दुसरीकडे या कार्यासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये पूर्वीच्या तुलनेत मोठी घट होताना दिसत आहे. ही परिस्थिती चिंताजनक अशीच आहे. देणगीदारांमध्ये मोठी घट झाली आहे.तुरुंगातील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये मतपरिवर्तन व्हावे यासाठी आम्ही कैद्यांपर्यत गांधी विचार पोहोचवून त्यांच्या परीक्षा घेतो. एकाही कैद्याचे खºया अर्थाने मतपरिवर्तन झाले तर ते आमच्यासाठी मोठे यश असते. जास्तीत जास्त जणांपर्यंत गांधी विचार पोहोचवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. वेबसाईटच्या माध्यमातून तरुणाईला याबाबत माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेबसाईटला २०१९ मध्ये सुमारे १५ लाख जणांनी भेट देऊन गांधी विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये भारतासह अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इटली, पाकिस्तान व जगातील १९५ पेक्षा अधिक देशांतील नागरिकांचा समावेश आहे.धर्माऐवजी माणूस म्हणून जगण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. सर्वोदय मंडळात गांधी जाणून घेण्यासाठी देश विदेशातून नागरिक येतात. गांधी विचारांवर आचरण करणारी माणसे कमी कमी होत चालली असली तरी आमचा लोकांच्या विचारशक्तीवर पूर्ण विश्वास असून महात्मा गांधीची हत्या करणाºया नथुराम गोडसे प्रवृत्तींना समाज जवळ करणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. सध्या गावागावांत द्वेषाचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधी विचार किती महत्त्वाचे आहेत याची प्रचीती लोकांना येईल, गांधी विचारांचे महत्त्व लोकांना पुन्हा नक्कीच कळेल. कारण महात्मा गांधींची हत्या झाली असली तरी गांधी विचार कधीच मरणार नाहीत.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत