शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींच्या विचारांचे आचरण व्हायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 05:41 IST

महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते.

- टीआरके सौमय्या(व्यवस्थापकीय विश्वस्त, बॉम्बे सर्वोदय मंडळ)महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते. मी १० वर्षांचा असताना गांधीविचारांनी माझ्या मनावर गारुड केले. त्यामुळे मी गांधीजींच्या विचाराप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करु लागलो. सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा या विचारांचा प्रचार, प्रसार करण्याचा व त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही वेळा मला खोटे बोलावे लागते, त्याची खंत आहे. माझे खोटे बोलणे माझ्या स्वार्थासाठी नव्हे तर इतरांसाठीच असते. मात्र माझ्यातील हा दुर्गुणदेखील कमी करण्याचा प्रयत्न मी करत आहे. गांधी जयंती एक दिवस, एक सप्ताह साजरी करण्याऐवजी त्यांचे विचार दररोज आचरणात आणण्याची गरज आहे.माझे वय ८२ वर्षे आहे. मात्र तरुणाई, नवीन पिढी गांधी विचार पुढे नेण्यासाठी पुरेशा प्रमाणात पुढे येण्यास इच्छुक नाही, हे चित्र मनाला अतिशय वेदना देणारे आहे. नव्या पिढीत गांधी विचार रुजवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत़ मात्र हव्या त्या प्रमाणात तरुणाई याकडे वळण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून गांधी विचार प्रसार, प्रचार करण्याचे काम करण्यासाठी कोणी इच्छुक स्वत:हून पुढे येत नाही. नि:स्वार्थ भावनेने हे काम करण्याची गरज आहे. कॉर्पोरेट संस्कृतीप्रमाणे दर महिन्याला गलेलठ्ठ पगार घेऊन हे काम यशस्वी होणार नाही. मात्र सामाजिक कार्याच्या हेतूने नि:स्वार्थ भावनेने गांधी विचार पुढे नेण्यासाठी कोणी तयार होत नाही, हे दुर्दैव आहे. एकीकडे मंडळाच्या खर्चात महागाईमुळे सातत्याने वाढ होत असून दुसरीकडे या कार्यासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये पूर्वीच्या तुलनेत मोठी घट होताना दिसत आहे. ही परिस्थिती चिंताजनक अशीच आहे. देणगीदारांमध्ये मोठी घट झाली आहे.तुरुंगातील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये मतपरिवर्तन व्हावे यासाठी आम्ही कैद्यांपर्यत गांधी विचार पोहोचवून त्यांच्या परीक्षा घेतो. एकाही कैद्याचे खºया अर्थाने मतपरिवर्तन झाले तर ते आमच्यासाठी मोठे यश असते. जास्तीत जास्त जणांपर्यंत गांधी विचार पोहोचवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. वेबसाईटच्या माध्यमातून तरुणाईला याबाबत माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेबसाईटला २०१९ मध्ये सुमारे १५ लाख जणांनी भेट देऊन गांधी विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये भारतासह अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इटली, पाकिस्तान व जगातील १९५ पेक्षा अधिक देशांतील नागरिकांचा समावेश आहे.धर्माऐवजी माणूस म्हणून जगण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. सर्वोदय मंडळात गांधी जाणून घेण्यासाठी देश विदेशातून नागरिक येतात. गांधी विचारांवर आचरण करणारी माणसे कमी कमी होत चालली असली तरी आमचा लोकांच्या विचारशक्तीवर पूर्ण विश्वास असून महात्मा गांधीची हत्या करणाºया नथुराम गोडसे प्रवृत्तींना समाज जवळ करणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. सध्या गावागावांत द्वेषाचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधी विचार किती महत्त्वाचे आहेत याची प्रचीती लोकांना येईल, गांधी विचारांचे महत्त्व लोकांना पुन्हा नक्कीच कळेल. कारण महात्मा गांधींची हत्या झाली असली तरी गांधी विचार कधीच मरणार नाहीत.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत