शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

कष्टावीण रेवडी ज्यांना मिळे! फुकट योजनांमधील खरा धोका सुप्रीम कोर्टानं देशासमोर ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 07:50 IST

लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. महाराष्ट्रातील कंत्राटदारांची जवळपास एक लाख कोटी रुपयांची बिले थकली आहेत.

सगळेच राजकीय पक्ष आणि बुद्धिवादी मंडळी ‘रेवडी संस्कृती’ म्हणून ज्यांना हिणवतात आणि तरीही आपल्या राजकीय पक्षांना त्यातून यश मिळत असेल तर ज्यांचा मोह सुटत नाही अशा फुकटाच्या याेजनांविषयी बुधवारी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी चिंताजनक आहे. दिल्लीतील बेघरांविषयीची एक याचिका न्या. भूषण गवई व न्या. ऑगस्टीन जाॅर्ज मसीह यांच्यापुढे सुनावणीसाठी आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीसह सर्वच राज्यांकडून बेघरांची संख्या व त्यांना सुविधांची माहिती गेल्या डिसेंबरमध्ये मागवली होती. त्याविषयी सरकारे फारशी गंभीर नसल्याचे पाहून न्या. गवई यांनी मोफत योजनांवर गंभीर टिप्पणी केली. मतांसाठी फुकट खिरापत वाटण्याचे, महिला-युवक अशा समाजघटकांना दरमहा रोख रक्कम देण्याचे दोन ठळक दुष्परिणाम संभवतात. अशा योजनांचा सरकारच्या तिजोरीवर ताण पडतो आणि विकासकामांसाठी, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी, कंत्राटदारांच्या बिलांसाठी पैसा उरत नाही, या पहिल्या दुष्परिणामाची अधूनमधून चर्चा तरी होते.

सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवलेला दुसरा दुष्परिणाम मात्र क्वचितच चर्चेत येतो. तिजोरीवरील ताण भलेही कर्ज काढून कमी करता येईल; परंतु, राजकारणासाठी रोख पैसा किंवा फुकट वस्तू वाटल्या तर लोकांना कष्ट करण्याची गरज उरत नाही. ते ऐतखाऊ बनतात, हा दुष्परिणाम अधिक गंभीर आहे. वरून अशा योजनांना गोरगरिबांच्या कल्याणाचा मुलामा दिला जातो. समाजातील वंचित घटकांबद्दल सहानुभूती बाळगली, त्यांच्या पायातील दारिद्र्याच्या बेड्या काढण्यासाठी प्रयत्न झाले, तर ते चांगलेच आहे. राज्यघटनेतील कल्याणकारी राज्याची संकल्पना तीच आहे; परंतु, अलीकडे ती शब्दश: घेतली जाते. प्रत्येकाच्या हाताला काम, पोटाला अन्न, अंगावर कपडा, डोक्यावर घराचे छत आणि सन्मानाचे जगणे यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी.

शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज-पाणी, रस्ते अशा सोयी-सुविधा निर्माण व्हायला हव्यात. धर्म, जात, लिंग यांच्या आधारे कोणी श्रेष्ठ, कोणी कनिष्ठ ठरणार नाही, अशी समताधिष्ठित व्यवस्था जोडीला असावी, हे सारे म्हणजे कल्याणकारी राज्य. तथापि, आपल्या राजकारणाने मतांसाठी सोयीचा अर्थ काढला आणि ‘रेवडी संस्कृती’ रुजविली. मतदारांना भुलविण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर योजना जाहीर करायच्या आणि एकप्रकारे मते विकत घ्यायची, ही ती नवी संस्कृती. पूर्वी तामिळनाडूसारख्या काही राज्यांमध्ये रोख पैसे किंवा वस्तूंचे वाटप व्हायचे. तेव्हा इतर राज्ये त्याची टिंगलटवाळी करायची. कोरोना महामारीच्या वेळेस कामधंदा ठप्प असल्यामुळे लोकांची उपासमार होऊ लागली म्हणून केंद्र सरकारने गोदामांमध्ये साठविलेले अन्नधान्य गरजूंना मोफत द्यायला सुरुवात केली. त्या योजनेला आकर्षक नावही दिले. त्यातून भरभरून मते मिळतात हे पाहून गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या योजनेला थेट पाच वर्षांची मुदतवाढ दिली गेली.

कर्नाटकमध्ये अशा योजनांमधून राजकीय यश मिळाल्याने प्रमुख विराेधी पक्ष काँग्रेसही या शर्यतीत उतरली. त्यानंतरच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये या मोफत योजनांचीच चर्चा अधिक झाली. महाराष्ट्राची दोन उदाहरणे ताजी आहेत. लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. महाराष्ट्रातील कंत्राटदारांची जवळपास एक लाख कोटी रुपयांची बिले थकली आहेत. मार्च एंडच्या तोंडावर कंत्राटदार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. ते कदाचित न्यायालयातही जातील. लाडक्या बहिणींच्या पात्रतेची छाननी सुरू असून जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या पाच लाखांनी घटली. तरीदेखील चार-पाच महिन्यांत या अपात्र महिलांना दिलेले कोट्यवधी रूपये परत घेतले जाणार नाहीत. या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने अशा फुकट योजनांमधील खरा धोका देशासमोर ठेवला आहे.

जगण्यासाठी जे जे हवे ते असे मोफत मिळाल्याने लोक आळशी बनत आहेत. कष्ट करण्याची गरज उरलेली नाही. कामाची सवय मोडली जात आहे. एकप्रकारे परजिवी वर्ग तयार होत आहे. हा धोका मोठा आहे. राजकीय पक्षांनी यातून बोध घ्यायला हवा खरे; पण ते तसा घेतील याची शाश्वती नाही. त्यांचा जीव मतदारांच्या मतांमध्ये गुंतला आहे. मतांच्या राजकारणापुढे असे सुविचार त्यांच्या किती पचनी पडतील, ही शंकाच आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा