शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

नरेंद्र मोदींच्या सरकारवर उलटलेला तिसरा बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 04:25 IST

योगशास्त्राचा प्रणेता पतंजली हा केवळ धर्मज्ञ नव्हता. तो पाणिनीसारखाच राजनीतिज्ञही होता.

योगशास्त्राचा प्रणेता पतंजली हा केवळ धर्मज्ञ नव्हता. तो पाणिनीसारखाच राजनीतिज्ञही होता. देशात वैदिक धर्माची नव्याने मुहूर्तमेढ करणाऱ्या पुष्यमित्र शुंगराजाचा तो प्रधानमंत्री होता. योगशास्त्राएवढाच त्याचा तत्कालीन राजकारणावरही फार मोठा प्रभाव होता. त्याच्या नावाने प्रथम आपली यौगिक व नंतर औद्योगिक इस्टेट उभी करणा-या आताच्या रामदेवबाबांनीही राजकारण, अर्थकारण आणि थोडेफार धर्मकारण अशा सर्व क्षेत्रांत आपली चांगली पैठ जमविली आहे. त्यांना राजकारण त्यातल्या काळवेळेनुसार चांगले समजते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदी व त्यांचा भारतीय जनता पक्ष यांचा उघड प्रचार केला. त्याआधीचे काही दिवस त्यांनी संघाशीही चांगलेच जुळवून घेतले होते. त्यांच्या या राजकीय मैत्रीचा लाभ त्यांना त्यांच्या उद्योगात मोठ्या प्रमाणावर मिळाला. एकेकाळी नुसतीच योगविद्या शिकवत देशभर हिंडणारा हा बाबा नंतरच्या काळात पंजाबात त्याची औद्योगिक वसाहत उभारून थांबला. त्या वसाहतीत तयार होणारी अप्रमाणित औषधे व सौंदर्य प्रसाधने त्याने देशभर विक्रीला आणली. पतंजली या नावाने देशात सर्वत्र आढळणारी या बाबाची दुकाने आता थेट मोठ्या मॉलच्या आकाराची व तेवढ्या थाटाची झाली आहेत. त्यात येणाºया ग्राहकांचा वर्ग मोठा आहे आणि त्यातून येणाºया उत्पन्नाच्या बळावर या रामदेवबाबाने आता देशातील लहानसहान उद्योग खरेदी करण्याचाही सपाटा लावला आहे. सरकारने त्याला हजारो एकर जमिनी अतिशय वाºयामोलाने दिल्या आणि त्या या बाबाच्या उद्योगांची वाट पाहत तशाच पडित राहिल्या आहेत. ही स्थिती या बाबाचे मोदीप्रेम वाढविणारी आणि त्याची संघाशी असलेली जवळीक आणखी दृढ करणारी आहे. मात्र प्रत्यक्षात रामदेवबाबा मोदींपासून दूर जातानाच आता दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मोदींच्या अर्थकारणावर जाहीर टीका करायला सुरुवात केली आहे. अस्मानाला भिडलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करा, पेट्रोल आणि डिझेलचे भाव जमिनीवर आणा, अन्यथा तुम्हाला येत्या निवडणुकीत यश मिळणार नाही अशी शापवाणी त्यांनी उच्चारायला सुरुवात केली आहे. रामदेवबाबा हा नरेंद्र मोदींच्या सरकारवर उलटलेला तिसºया क्रमांकाचा बाबा आहे. सर्वप्रथम या सरकारविरुद्ध आसारामबापू किंचाळत उठला. आसारामबापूच्या पायांना स्पर्श करणारी व त्यांचा आशीर्वाद घेणारी भाजपाच्या नेत्यांची अनेक छायाचित्रे लोकांच्या आताही स्मरणात आहेत. सध्या हा बापू त्याच्या पापाची फळे भोगत व सरकारच्या नावाने शिव्याशाप देत देशाच्या कुठल्याशा तुरुंगात पडला आहे. श्रीश्री रविशंकर याही सत्पुरुषाने आरंभी मोदी व संघ यांच्या आरत्या गायला सुरुवात केली होती. तशी ती अजूनही थांबली नाही. मात्र तिचा आवाज कमी झाला आहे. या श्रीश्रींनी दिल्लीजवळ यमुनेच्या काठी त्यांच्या भक्तांचा जो मोठा उरुस भरविला तिचे पाणी गढूळ करून टाकले. त्यासाठी श्रीश्रींना पर्यावरणाचे रक्षण करणाºया खात्याने पाच कोटींचा दंड केला. वास्तविक हा दंड श्रीश्रींसाठी फार मोठा नव्हे. त्यांचा कोणताही भक्त त्यांच्यासाठी तेवढी रक्कम सरकारात जमा करू शकला असता. परंतु श्रीश्रींसारख्या सत्पुरुषाला सरकारने दंड ठोठावणे हीच बाब त्याच्या महात्म्याला बाधित करणारी ठरली. तेव्हापासून त्यांचीही मोदीनिष्ठा कमी झाली आहे. रामदेवबाबाचा क्रमांक त्यानंतरचा आहे. रामदेवबाबा राजकारणात आहे, उद्योगात आहे, अर्थकारणात आहे आणि सौंदर्य प्रसाधनातही आले आहेत. असा माणूस मोदींवर आणि त्यांच्या सरकारवर संतापून बोलत असेल तर त्याची कारणे त्याच्या वैचारिक भूमिकेत न शोधता आर्थिक व औद्योगिक हितसंबंधांच्या क्षेत्रातच शोधावी लागतात. जमिनी मिळाल्या, त्या अल्प किमतीत मिळाल्या, बाजार मिळाला आणि देशभरची गिºहाईकीहीमिळाली. एवढे सारे ज्यांच्या राजकारणाच्या कृपेने प्राप्त करता आले त्यांच्याच राजकारणावर बाबाने तोंडसुख घेणे हे त्याचमुळे अचंबित करणारे आहे.रामदेवबाबा राजकारण, उद्योग अर्थकारण आणि सौंदर्य प्रसाधनातही आले आहेत. असा माणूस मोदी आणि सरकारवर संतापून बोलत असेल तर त्याची कारणे आर्थिक व औद्योगिक हितसंबंधांच्या क्षेत्रातच शोधावी लागतात.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा