शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नरेंद्र मोदींच्या सरकारवर उलटलेला तिसरा बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 04:25 IST

योगशास्त्राचा प्रणेता पतंजली हा केवळ धर्मज्ञ नव्हता. तो पाणिनीसारखाच राजनीतिज्ञही होता.

योगशास्त्राचा प्रणेता पतंजली हा केवळ धर्मज्ञ नव्हता. तो पाणिनीसारखाच राजनीतिज्ञही होता. देशात वैदिक धर्माची नव्याने मुहूर्तमेढ करणाऱ्या पुष्यमित्र शुंगराजाचा तो प्रधानमंत्री होता. योगशास्त्राएवढाच त्याचा तत्कालीन राजकारणावरही फार मोठा प्रभाव होता. त्याच्या नावाने प्रथम आपली यौगिक व नंतर औद्योगिक इस्टेट उभी करणा-या आताच्या रामदेवबाबांनीही राजकारण, अर्थकारण आणि थोडेफार धर्मकारण अशा सर्व क्षेत्रांत आपली चांगली पैठ जमविली आहे. त्यांना राजकारण त्यातल्या काळवेळेनुसार चांगले समजते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदी व त्यांचा भारतीय जनता पक्ष यांचा उघड प्रचार केला. त्याआधीचे काही दिवस त्यांनी संघाशीही चांगलेच जुळवून घेतले होते. त्यांच्या या राजकीय मैत्रीचा लाभ त्यांना त्यांच्या उद्योगात मोठ्या प्रमाणावर मिळाला. एकेकाळी नुसतीच योगविद्या शिकवत देशभर हिंडणारा हा बाबा नंतरच्या काळात पंजाबात त्याची औद्योगिक वसाहत उभारून थांबला. त्या वसाहतीत तयार होणारी अप्रमाणित औषधे व सौंदर्य प्रसाधने त्याने देशभर विक्रीला आणली. पतंजली या नावाने देशात सर्वत्र आढळणारी या बाबाची दुकाने आता थेट मोठ्या मॉलच्या आकाराची व तेवढ्या थाटाची झाली आहेत. त्यात येणाºया ग्राहकांचा वर्ग मोठा आहे आणि त्यातून येणाºया उत्पन्नाच्या बळावर या रामदेवबाबाने आता देशातील लहानसहान उद्योग खरेदी करण्याचाही सपाटा लावला आहे. सरकारने त्याला हजारो एकर जमिनी अतिशय वाºयामोलाने दिल्या आणि त्या या बाबाच्या उद्योगांची वाट पाहत तशाच पडित राहिल्या आहेत. ही स्थिती या बाबाचे मोदीप्रेम वाढविणारी आणि त्याची संघाशी असलेली जवळीक आणखी दृढ करणारी आहे. मात्र प्रत्यक्षात रामदेवबाबा मोदींपासून दूर जातानाच आता दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मोदींच्या अर्थकारणावर जाहीर टीका करायला सुरुवात केली आहे. अस्मानाला भिडलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करा, पेट्रोल आणि डिझेलचे भाव जमिनीवर आणा, अन्यथा तुम्हाला येत्या निवडणुकीत यश मिळणार नाही अशी शापवाणी त्यांनी उच्चारायला सुरुवात केली आहे. रामदेवबाबा हा नरेंद्र मोदींच्या सरकारवर उलटलेला तिसºया क्रमांकाचा बाबा आहे. सर्वप्रथम या सरकारविरुद्ध आसारामबापू किंचाळत उठला. आसारामबापूच्या पायांना स्पर्श करणारी व त्यांचा आशीर्वाद घेणारी भाजपाच्या नेत्यांची अनेक छायाचित्रे लोकांच्या आताही स्मरणात आहेत. सध्या हा बापू त्याच्या पापाची फळे भोगत व सरकारच्या नावाने शिव्याशाप देत देशाच्या कुठल्याशा तुरुंगात पडला आहे. श्रीश्री रविशंकर याही सत्पुरुषाने आरंभी मोदी व संघ यांच्या आरत्या गायला सुरुवात केली होती. तशी ती अजूनही थांबली नाही. मात्र तिचा आवाज कमी झाला आहे. या श्रीश्रींनी दिल्लीजवळ यमुनेच्या काठी त्यांच्या भक्तांचा जो मोठा उरुस भरविला तिचे पाणी गढूळ करून टाकले. त्यासाठी श्रीश्रींना पर्यावरणाचे रक्षण करणाºया खात्याने पाच कोटींचा दंड केला. वास्तविक हा दंड श्रीश्रींसाठी फार मोठा नव्हे. त्यांचा कोणताही भक्त त्यांच्यासाठी तेवढी रक्कम सरकारात जमा करू शकला असता. परंतु श्रीश्रींसारख्या सत्पुरुषाला सरकारने दंड ठोठावणे हीच बाब त्याच्या महात्म्याला बाधित करणारी ठरली. तेव्हापासून त्यांचीही मोदीनिष्ठा कमी झाली आहे. रामदेवबाबाचा क्रमांक त्यानंतरचा आहे. रामदेवबाबा राजकारणात आहे, उद्योगात आहे, अर्थकारणात आहे आणि सौंदर्य प्रसाधनातही आले आहेत. असा माणूस मोदींवर आणि त्यांच्या सरकारवर संतापून बोलत असेल तर त्याची कारणे त्याच्या वैचारिक भूमिकेत न शोधता आर्थिक व औद्योगिक हितसंबंधांच्या क्षेत्रातच शोधावी लागतात. जमिनी मिळाल्या, त्या अल्प किमतीत मिळाल्या, बाजार मिळाला आणि देशभरची गिºहाईकीहीमिळाली. एवढे सारे ज्यांच्या राजकारणाच्या कृपेने प्राप्त करता आले त्यांच्याच राजकारणावर बाबाने तोंडसुख घेणे हे त्याचमुळे अचंबित करणारे आहे.रामदेवबाबा राजकारण, उद्योग अर्थकारण आणि सौंदर्य प्रसाधनातही आले आहेत. असा माणूस मोदी आणि सरकारवर संतापून बोलत असेल तर त्याची कारणे आर्थिक व औद्योगिक हितसंबंधांच्या क्षेत्रातच शोधावी लागतात.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा