शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयवादी, वैचारिक दिशा देणारे ‘रावसाहेब’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 18:39 IST

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नांवर अत्यंत वेगळी आणि कालसुसंगत भूमिका घेणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. रावसाहेब कसबे यांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागते.

- प्रा. संतोष पद्माकर पवार, ज्येष्ठ कवी

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्नांवर अत्यंत वेगळी आणि कालसुसंगत भूमिका घेणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. रावसाहेब कसबे यांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागते. गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकाच्या निमित्ताने कसबे यांनी ‘झोत’ या पुस्तकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संपूर्ण चिकित्सा करून संघाचा दांभिकपणा उघड केला. संघाबाबत मोठी खळबळ उडवून दिली. संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा फॅसिस्ट चेहरा समोर आला. गोळवलकरांच्या या पुस्तकातील अनेक मुद्दे अगदी अलीकडे संघाला मागे घ्यावे लागले.ऐंशीच्या दशकात कसबे यांनी आपल्या वाणी आणि लेखणीला आविष्कृत करायला सुरुवात केली. इंदिरा गांधींचे आणीबाणी युग आणि त्यातून संघ आणि समाजवादी लोकांनी एकमेकांशी मैत्री केल्याच्या पार्श्वभूमीवर कसबे यांचे लेखन समाजवाद्यांची एक प्रकारे कानउघाडणी करणारे होते़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर त्यांच्या चळवळीतील नेतृत्वाने तडजोडवादी राजकारण केले. फक्त आंबेडकर म्हणविणारे ‘निळे’ आणि फक्त मार्क्स म्हणणारे ‘डावे’ राजकारण यांच्या वैचारिक संघर्षात कसबे यांनी समन्वयाची भूमिका घेत समतोल साधला. ‘आंबेडकर आणि मार्क्स’ हा ग्रंथ त्यातूनच आल्याचे दिसते. त्यांना मार्क्सवादी ठरविण्याचेदेखील प्रयत्न झाले. सत्यशोधक मार्क्सवादाची भूमिका घेणारे शरद पाटील यांनीदेखील कसबे यांच्या भूमिकेची चिकित्सा केली आहे. ती वाचण्याजोगी आहे.पुरोगामी चळवळीत ताठर भूमिका घेऊन चळवळीचे नुकसान करणाऱ्यांना कसबे हे कायम अडचणीचे ठरले. गांधी-आंबेडकर यांच्या संबंधाबाबत चळवळीच्या कार्यकर्त्यांची अत्यंत कडवट भूमिका असताना कसबे हे तसा विचार कधीही करत नाहीत. उलट गांधीविरोधाने आंबेडकरी चळवळीचे नुकसान झाल्याचे मत मांडतात. आक्रमक मांडणी हा त्यांच्या वक्तृत्वाचा गुणविशेष आहे. त्यांचे लेखन या वक्तृत्वाचे पुढचे उपयोजन आहे. झोत, डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, आंबेडकर आणि मार्क्स, आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार, देशीवाद समाज व साहित्य, धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह, भक्ती आणि धम्म, मानव आणि धर्मचिंतन, हिंदू-मुस्लीम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदूराष्ट्रवाद या सर्व ग्रंथांची निर्मिती आणि त्यांचा कालावधी यांचा खूप निकटचा संबंध असून त्या-त्या काळात उपयुक्त राजकीय, वैचारिक भूमिका घेत त्यांनी या ग्रंथांचे लेखन केले.नाशिकच्या लोस्ली सोनी सेंटरमध्ये एका व्याख्यानातून त्यांचा मे. पुं. रेगे यांच्यासोबत झालेला जाहीर वाद अजून महाराष्ट्र विसरलेला नाही. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या जातीची आडवी रचना पुरस्काराचा कसबे यांनी देशीवादाचा संदर्भ घेऊन मोठा प्रतिवाद केला. त्यांनी आयुष्यभर पुरोगामित्वाचा प्रसार आणि प्रचार केला. मात्र पुरोगामी म्हणवून घेणाºयांनाच कसबे पेलवले नाहीत.महाराष्ट्रात प्रथमच भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले तेव्हा त्यांनी, ‘हे सरकार मराठेतर सवर्णांचे आणि महारेतर दलितांचे’ असल्याचे म्हटले. कसबे हे शिवशक्ती-भीमशक्तीचे पुरस्कर्ते असल्याचा अर्थ त्यातून काढला गेला. मात्र त्यांचे हे आकलन तटस्थ होते. शिवसेनेचे हिंदुत्व हे सरधोपट आहे आणि ते भाजप, विहिंपसारखे त्रिशूळासारखे टोकदार नाही हेही त्यांनी मांडले.चाचपडणाºया काळात धाडसी भूमिका घेणे, आपले खासगी सिद्धान्त मांडत मोठ्या प्रश्नाला भिडणे हे त्यांचे वैशिष्ट्य़ म्हणूनच लाखोंचे मराठा मोर्चे निघत असताना मराठा समाजातील सरंजामी घटक आणि त्यातील उतरंडीवर बोलत ओबीसी घटकांच्या हक्कासाठी कसबे मुलाखती देत होते. असे धाडस दाखविणारे विचारवंत विरळे आहेत. ते सरधोपट कार्यकर्तेगिरी करणारे विचारवंत नाहीत. डोळसपणे बघणे हा त्यांचा बाणा आहे. तत्त्वज्ञान मांडताना स्वजातीला गोंजारण्यात त्यांनी धन्यता मानलेली नाही. बाबरी पाडल्यानंतर मुस्लीम प्रश्नाची मांडणी करून इस्लामच्या परिवर्तनाची गरज त्यांनी प्रतिपादन करीत मुस्लिमांचे प्रबोधन आणि उत्थान यावर भर दिला. हे करताना त्यांनी सावरकरांच्या नवमतवादावर कोरडे ओढले. अनेक छोट्या-मोठ्या संमेलनांत कसबे हे प्रमुख पाहुणे म्हणून गेले. वैचारिक साहित्याप्रमाणेच ललित साहित्याशीही त्यांचा अनुबंध आहे. विखे पाटील साहित्य पुरस्कार निवडीत त्यांनी निवडलेल्या साहित्यकृतींना पुढे साहित्य अकादमी मिळाली. यातूनही त्यांचे आकलन व दूरदृष्टी दिसून येते.

‘झोत’ या ग्रंथाची चाळिशी आणि त्याचे लेखन करणाºया डॉ. रावसाहेब कसबे यांचा अमृतमहोत्सव असा दुहेरी कार्यक्रम आज संगमनेर (जि. अहमदनगर) येथे समाजवादी संमेलनात होत आहे.