शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

...म्हणूनच सत्काराचे त्यांना अप्रूप नाही

By गजानन जानभोर | Published: November 07, 2017 3:54 AM

राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज आश्रमातील ध्यानमंदिराशेजारी एक कुटी आहे. केशवदास रामटेके तिथेच राहतात. साठ वर्षांपूर्वी तुकडोजी महाराज त्यांना इथे घेऊन आले.

राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज आश्रमातील ध्यानमंदिराशेजारी एक कुटी आहे. केशवदास रामटेके तिथेच राहतात. साठ वर्षांपूर्वी तुकडोजी महाराज त्यांना इथे घेऊन आले. केशवदास पुन्हा घरी परतले नाहीत. घरचे म्हणाले, ‘परत चल’. केशवदासांनी सांगितले, ‘‘घरी येऊन तरी काय करु? मला इथेच राहायचे आहे, गुरुदेवांच्या सेवेत’’ राष्टÑसंतांचे अनेक सहकारी, अनुयायी नंतर आसक्तीच्या वाटेने गेले. काहींनी गुरुदेवांच्या नामस्मरणातून शिक्षणसंस्था उभारल्या तर काही राजकारणी झालेत अन् भगव्या टोप्या घालून सभा, संमेलनात मिरवू लागले. गुरुदेवभक्तांची निष्ठा आणि राष्टÑसंतांवरील लोकश्रद्धेचे भांडवल करीत ही मंडळी पुढे गडगंजही झाली. केशवदास मात्र गुरुदेवांजवळच अविचल, अनासक्त राहिले. आश्रमातील सकाळच्या ध्यानात, संध्याकाळच्या प्रार्थनेत केशवदास नित्यनेमाने येतात. किरकोळ बांधा, बेताची उंची आणि एक पाय अधू... आपले अस्तित्व जाणवू न देता एका कोपºयात त्यांचे ध्यान लागलेले... गुरुदेव सेवा मंडळांच्या कार्यक्रमांतही ते मंचावर थांबत नाहीत, मंडपाबाहेर मुलांना पुस्तकं वाटताना दिसतात.केशवदास राष्ट्रसंतांचे सहकारी. महाराजांच्या भाषणाची ते टिपणे काढायचे. त्यातून ३० पुस्तकं प्रसिद्ध झालीत. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव हे त्यांचे गाव. वडील लहानपणीच वारले, आई मजुरीला जायची. लहानग्या केशवदासला दारिद्र्यासोबतच अस्पृश्यतेचे चटकेही बसायचे. आपल्या सारख्याच हाडामासाच्या माणसांना ग्लासात पाणी आणि आपल्याला ओंजळीत का? कुणाच्या घरचे लग्न असेल तर आपण शेवटच्या पंक्तीतच का बसावे? केशवदासला हे प्रश्न अस्वस्थ करायचे. भजनांचा छंद होताच. चवथीत असताना अभंगही लिहिले. ते दाखवण्यासाठी केशवदास मित्राजवळ गेला. मित्र म्हणाला, ‘अभंग महापुरुषांनी लिहायचे. आपण लिहिणे पाप आहे’. दुसºया दिवशी त्याने तुळशीसमोर सर्व अभंग जाळून टाकले. ‘हा विटाळ कशासाठी’? केशवदासचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. अशातच गावालगत तुकडोजी महाराजांचा एक कार्यक्रम होता. केशवदासने महाराजांना गाठले, ‘मला गुरुमंत्र द्या’ महाराज म्हणाले, ‘सर्वांचे कल्याण कर, हाच गुरुमंत्र तुझ्यासाठी’. ग्रामस्वच्छतेचा मंत्र अंगिकारून केशवदास गावपरिसरात काम करू लागला. केशवदासची सातवीनंतर शाळा सुटली आणि मग पुढचे आयुष्य राष्टÑसंतांच्या कार्याकडे कायमचे प्रवाहित झाले.राष्ट्रसंतांच्या स्वप्नातला भारत घडवायचा असेल तर हा देश समजून घ्यावा, असे एक दिवस वाटले आणि केशवदास तडक भारत भ्रमणाला निघाले. १९५८ ते ६० असे दोन वर्ष, पदयात्रेचे अंतर ४,६०० किमी. एक अपंग मुलगा एकटाच फिरतो, साºयांनाच आश्चर्य वाटायचे. पदयात्रेच्या काळात एक मूल्य ते आवर्जून जपायचे, भूक लागली की संबंधितांच्या घरी श्रमदान करून त्यानंतरच माधुकरी मागायची. तरुणांसाठी संस्कार शिबिरे, ग्रामस्वराज्याचे प्रयोग राबवून केशवदासांनी शेकडो गावांना आदर्श केले. ‘ग्रामगीता जीवन विकास परीक्षा’ त्यांनीच सुरू केली. राष्ट्रसंतांनी त्यांना ‘प्राचार्य’ ही उपाधी दिली, ती यासाठीच. संतत्वाच्या असंख्य कसोट्यांवर उत्तीर्ण होऊनही या निष्काम कर्मयोग्याने आपल्यातील सामान्यपण कधी ढळू दिले नाही. हा माणूस कोणत्या मातीतून जन्मास आला, ठाऊक नाही, पण त्याच्या लोकसेवेचा प्रपंच अनासक्त आहे आणि जगणे विशुद्ध आहे. म्हणूनच आश्रमात झालेल्या परवाच्या सत्काराचे त्यांना अप्रूपही वाटत नाही.(gajanan.janbhor@lokmat.com)