शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

...अन् पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही हे धाडसाने जाहीर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 05:02 IST

आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करा अन् पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही, असे धाडसाने जाहीर करा़

- विनायकराव पाटीलआश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करा अन् पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही, असे धाडसाने जाहीर करा. शेतकरी अन्नदाता आहे, त्याच्याकडे मतदाता म्हणून पाहू नका़ खोटी आश्वासने देऊन शेतकºयाला फसवू नका. निवडणुकांमध्ये मतांसाठी खोटी आश्वासने देता व सत्ता आली की अनेक नियम व अटी लावून चुकीचे व अर्धवट निर्णय घेता़ त्याची मोठी प्रसिद्धी करून शेतकऱ्यांवर उपकार केल्यासारखे वागता़ हे सर्व काही एकदा सरकारला ठणकावून सांगितले पाहिजे़ मग कोणीही सत्तेत असो़महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अभूतपूर्व संकटात सापडला आहे़ दुष्काळ, नंतरची अतिवृष्टी़, शेतीमालाला भाव नाही़, बँकांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण आणि लग्न अशा अनेक अडचणींवर मात करून संघर्ष करीत शेतकरी जगत आहे़ दोन वेळा चुकीची कर्जमाफी झाली़ ज्यामध्ये थकबाकीदार शेतकºयांचे कर्ज माफ झाले़ मात्र न मिळणारा पीकविमा, कर्ज न देणाºया राष्ट्रीयीकृत बँका यामुळे शेतकºयांचे जगणे कायम अवघडच राहिले़ या सर्व परिस्थितीला कंटाळून शेतकरी आत्महत्या वाढत राहिल्या़ विदर्भ, मराठवाड्यात गेल्या पाच वर्षांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण तीन पटीने वाढले़ एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे, तर दुसरीकडे राजकीय पक्ष मात्र सत्तासंघर्षात दंग आहेत़सरकारने केलेली कर्जमाफी चुकीची आहे़ कारण सध्याच्या कर्जमाफी योजनेमधून वगळलेला चालू बाकीदार व अपात्र थकबाकीदार ठरलेला एकही शेतकरी मार्चअखेर कर्ज भरणार नाही़ कारण त्याला पुढील कर्जमाफीसाठी थकबाकीदार व्हायचे आहे़ ज्यामुळे बहुतांश लोकांचा कर्ज न भरता थकबाकीदार होण्याकडे कल वाढला आहे़ मराठवाड्यातील दोन जिल्हा बँकांची अंदाजित आकडेवारी पाहिली तर एका जिल्ह्यात कर्जमाफी पात्र शेतकरी १६ हजार आणि फक्त व्याज भरून चालू बाकीदार राहिलेले शेतकरी ५९ हजार आहेत़ अन्य एका जिल्ह्यात कर्जमाफी पात्र शेतकरी २५ हजार तर फक्त व्याज भरून चालू बाकीदार शेतकरी १ लाख ४८ हजार आहेत़ या आकडेवारीवरून असे दिसते, थकबाकीदार शेतकºयांची संख्या कमी आहे़ मात्र व्याज भरून चालू बाकीदार बनलेल्या शेतकºयांची संख्या खूप मोठी आहे़ आता भविष्यात हे चालू बाकीदार शेतकरी पुढील कर्जमाफीच्या आशेने कर्ज न भरता थकबाकीदार होतील.

सर्वच राजकीय पक्षांच्या राज्यकर्त्यांना व सत्तेवर आलेल्या महाआघाडी सरकारला विनंती आहे, त्यांनी संपूर्ण कर्जमाफी करून आश्वासनाप्रमाणे सातबारा कोरा केला पाहिजे़ पुन्हा कर्जमाफी मिळणार नाही हे सांगून कर्जमाफीची चर्चा कायमची बंद केली पाहिजे़ सध्याच्या अर्धवट कर्जमाफीमुळे भविष्यात शेती, शेतकरी आणि बँका अडचणीतच येणार आहेत़ अर्थात ज्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होईल़अर्धवट कर्जमाफीमुळे मागील २० वर्षांपूर्वी मध्यम मुदतीचे कर्ज घेतलेले गरीब शेतकरी कर्जमाफी न मिळाल्याने निराश होतील, शेती करणे सोडून देतील़ राज्य सरकारने २०१५ ते २०१९ या काळात घेतलेल्या फक्त अल्पमुदतीच्या थकबाकीदार शेतकºयांचे दोन लाखांचे कर्ज माफ केल्यामुळे दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतलेले तसेच ज्यांनी केवळ व्याज भरून कर्जखाते चालूबाकी केले आहे़, ते सर्व जण पुन्हा कर्जमाफी होईल म्हणून कर्जभरणा करण्यास तयार नाहीत़ सारख्या सारख्या कर्जमाफीच्या घोषणांमुळे शेतकºयांची कर्ज न भरण्याची मानसिकता वाढत आहे; ज्यामुळे बँकांचा एनपीए वाढत आहे़ त्यामुळे शेतकºयांच्या मागण्या काय आहेत ते समजून घ्या़ ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले व १ एप्रिल २००८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले सर्व पीककर्ज तसेच द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, पपई, केळी, ऊस, कापूस, हळद, आंबा यासाठी घेतलेल्या केवळ विंधन विहिरीसाठीचे कर्ज, पाइपलाइन, इलेक्ट्रिक मोटार व ठिबक सिंचन यासाठी घेतलेले कर्ज याचाही कर्जमाफी योजनेत समावेश व्हावा़
प्रत्येक शेतकºयाला पाच लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी़ सात हेक्टर क्षेत्रापर्यंत कर्जमाफी व्हावी़ अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयाला आश्वासन दिल्याप्रमाणे हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे़ ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या वाढवावी़ सर्वात महत्त्वाचे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतकºयाच्या मालास हमीभाव द्यावा़ तशा प्रकारचा कायदाच अमलात आणावा़ शेतकºयाच्या मुलाने त्याच्या गावात प्रक्रिया उद्योग उभा केल्यास त्याला बँकेकडून कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ असावी़ नियमित पाच वर्र्षे कर्जफेड करणाºयास पाच लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज द्यावे़ हे सर्व शक्य झाले तर वारंवार कर्जमाफीची चर्चा होणार नाही़(सामाजिक कार्यकर्ते)

टॅग्स :Farmerशेतकरी