शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

क्रीडाक्षेत्रामध्ये ‘वर्गभेद’ झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 23:34 IST

आपल्याकडे ‘पुरस्कार’ म्हटले की वाद निर्माण होणार हे ठरलेलेच! मग ‘भारतरत्न’ असो की ‘खेलरत्न’! ते जाहीर होताच कोणा ना कोणावर घोर अन्याय झाल्याचे दृष्टीस पडते.

- रणजीत दळवी(ज्येष्ठ क्रीडा समीक्षक)आपल्याकडे ‘पुरस्कार’ म्हटले की वाद निर्माण होणार हे ठरलेलेच! मग ‘भारतरत्न’ असो की ‘खेलरत्न’! ते जाहीर होताच कोणा ना कोणावर घोर अन्याय झाल्याचे दृष्टीस पडते. या वेळी ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर होताच मल्ल बजरंग पुनियासह किमान चार - सहा खेळाडूंची योग्यता असून आपल्याला डावलले गेल्याची भावना होणे अगदी रास्त! बजरंग पुनिया आणि महिला मल्ल विनेश फोगाट यांना सरकारने ठरविलेल्या निकषांनुसार ‘पुरस्कार’ मिळावयास हवे होते. बरे हे ‘निकष’ २०१४ साली देशाच्या सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयाला अनुसरून होते. सरकारने २००२ साली निकषांना बगल दिल्यानंतर वाद निर्माण झाला व अखेरीस न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. तरीही पुरस्कार निवड समितीला काही अधिकार दिले गेले आणि त्यामुळेच यंदा निकषांनुसार ‘शून्य’ गुण मिळवणारा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची निवड झाली. यानंतर मल्ल बजरंग पुनियाने तातडीने केंद्रीय क्रीडामंत्र्यांची भेट घेतली. राज्यवर्धन राठोड हे देशाचे पहिले क्रीडापटू ज्यांना क्रीडामंत्री केल्याने ‘क्रीडा संस्कृतीहीन’ भारतात क्रीडाक्षेत्राचे काही भले होईल अशी भावना होती. पण बजरंग पुनियाला काही न्याय मिळाला नाही. क्रीडामंत्री झाल्यावर राज्यवर्धन राठोड यांच्यातला क्रीडापटू कोठे गेला, असा प्रश्न पडणे स्वाभाविक होते. ‘पुढल्या वर्षी बघू!’ असे पुढाऱ्याला शोभणारे आश्वासन त्यांनी दिले. त्याचप्रमाणे, ‘प्रथम न्यायालयात जाईन,’ असे बजरंग पुनिया ठामपणे म्हणाला, पण त्याने तसे केले नाही. त्यामुळे दोन वेळा पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या क्रिकेटपटू विराट कोहलीला पुरस्कार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यालासुद्धा पुढल्या वर्षी बघू, असेच आश्वासन दोनवेळा मिळाले होते.या प्रकरणात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, क्रीडाक्षेत्रात ‘वर्गभेद’, ज्याला आपण ‘क्लास डिव्हाईड’ म्हणतो तो प्रकार दिसला. ‘क्रिकेट’ खेळांचा राजा! हा खेळ खेळणारे वरच्या वर्गातले, ‘स्पेशल स्टेटसवाले’ असाच अर्थ त्यातून ध्वनित होतो. काल-परवाच कोठेतरी वाचले की, क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेला अन्य खेळांचे विश्वचषक किंवा आॅलिम्पिक खेळांचा दर्जा देण्यात यावा, क्रिकेटच्या आशिया चषक स्पर्धेला एशियाडचा दर्जा द्यावा असे एका विद्वानाने म्हटले. खरोखरच क्रिकेट हा भूतलावरील सर्वश्रेष्ठ खेळ असे संबोधणाºयांची कीव करावी वाटते!आज जगामध्ये पाच - सहा देश हा खेळ खºया अर्थाने खेळतात व त्यापैकी चार देश तर भारतीय उपखंडातले आहेत; आणि क्रिकेटला सर्वोच्च दर्जा द्या? नीरज चोप्रा, हीमा दास यांनी आत्ताच कोठे देशाला जागतिक स्तरावर एक ओळख मिळवून दिली. सौरभ चौधरी, लक्ष्य शेवरन व विहान शार्दुल ही नुकतीच मिसरूड फुटलेली पोरे एशियाड नेमबाजीमध्ये सुवर्णपदके मिळवत भारतामध्ये क्रीडासंस्कृतीच्या बीजाला अंकुर फुटल्याची जाणीव करून देत आहेत. अशा वेळी मल्ल बजरंग पुनियावर अन्याय होणे उचित आहे? एशियाड स्पर्धेमधील त्याने मिळवलेले दोन पदके, तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक, रौप्यपदक त्याचप्रमाणे, विश्व स्पर्धेतील कांस्यपदक आणि त्याच्या एकूणच पराक्रमाचे काहीच मोल नाही का? खेळाडू म्हणून विराट कोहलीचे कौतुक नक्की व्हावे, पण त्यासाठी अन्य कोणाचा बळी जाऊ नये!

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या