शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

क्रीडाक्षेत्रामध्ये ‘वर्गभेद’ झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 23:34 IST

आपल्याकडे ‘पुरस्कार’ म्हटले की वाद निर्माण होणार हे ठरलेलेच! मग ‘भारतरत्न’ असो की ‘खेलरत्न’! ते जाहीर होताच कोणा ना कोणावर घोर अन्याय झाल्याचे दृष्टीस पडते.

- रणजीत दळवी(ज्येष्ठ क्रीडा समीक्षक)आपल्याकडे ‘पुरस्कार’ म्हटले की वाद निर्माण होणार हे ठरलेलेच! मग ‘भारतरत्न’ असो की ‘खेलरत्न’! ते जाहीर होताच कोणा ना कोणावर घोर अन्याय झाल्याचे दृष्टीस पडते. या वेळी ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर होताच मल्ल बजरंग पुनियासह किमान चार - सहा खेळाडूंची योग्यता असून आपल्याला डावलले गेल्याची भावना होणे अगदी रास्त! बजरंग पुनिया आणि महिला मल्ल विनेश फोगाट यांना सरकारने ठरविलेल्या निकषांनुसार ‘पुरस्कार’ मिळावयास हवे होते. बरे हे ‘निकष’ २०१४ साली देशाच्या सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयाला अनुसरून होते. सरकारने २००२ साली निकषांना बगल दिल्यानंतर वाद निर्माण झाला व अखेरीस न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. तरीही पुरस्कार निवड समितीला काही अधिकार दिले गेले आणि त्यामुळेच यंदा निकषांनुसार ‘शून्य’ गुण मिळवणारा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची निवड झाली. यानंतर मल्ल बजरंग पुनियाने तातडीने केंद्रीय क्रीडामंत्र्यांची भेट घेतली. राज्यवर्धन राठोड हे देशाचे पहिले क्रीडापटू ज्यांना क्रीडामंत्री केल्याने ‘क्रीडा संस्कृतीहीन’ भारतात क्रीडाक्षेत्राचे काही भले होईल अशी भावना होती. पण बजरंग पुनियाला काही न्याय मिळाला नाही. क्रीडामंत्री झाल्यावर राज्यवर्धन राठोड यांच्यातला क्रीडापटू कोठे गेला, असा प्रश्न पडणे स्वाभाविक होते. ‘पुढल्या वर्षी बघू!’ असे पुढाऱ्याला शोभणारे आश्वासन त्यांनी दिले. त्याचप्रमाणे, ‘प्रथम न्यायालयात जाईन,’ असे बजरंग पुनिया ठामपणे म्हणाला, पण त्याने तसे केले नाही. त्यामुळे दोन वेळा पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या क्रिकेटपटू विराट कोहलीला पुरस्कार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यालासुद्धा पुढल्या वर्षी बघू, असेच आश्वासन दोनवेळा मिळाले होते.या प्रकरणात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, क्रीडाक्षेत्रात ‘वर्गभेद’, ज्याला आपण ‘क्लास डिव्हाईड’ म्हणतो तो प्रकार दिसला. ‘क्रिकेट’ खेळांचा राजा! हा खेळ खेळणारे वरच्या वर्गातले, ‘स्पेशल स्टेटसवाले’ असाच अर्थ त्यातून ध्वनित होतो. काल-परवाच कोठेतरी वाचले की, क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेला अन्य खेळांचे विश्वचषक किंवा आॅलिम्पिक खेळांचा दर्जा देण्यात यावा, क्रिकेटच्या आशिया चषक स्पर्धेला एशियाडचा दर्जा द्यावा असे एका विद्वानाने म्हटले. खरोखरच क्रिकेट हा भूतलावरील सर्वश्रेष्ठ खेळ असे संबोधणाºयांची कीव करावी वाटते!आज जगामध्ये पाच - सहा देश हा खेळ खºया अर्थाने खेळतात व त्यापैकी चार देश तर भारतीय उपखंडातले आहेत; आणि क्रिकेटला सर्वोच्च दर्जा द्या? नीरज चोप्रा, हीमा दास यांनी आत्ताच कोठे देशाला जागतिक स्तरावर एक ओळख मिळवून दिली. सौरभ चौधरी, लक्ष्य शेवरन व विहान शार्दुल ही नुकतीच मिसरूड फुटलेली पोरे एशियाड नेमबाजीमध्ये सुवर्णपदके मिळवत भारतामध्ये क्रीडासंस्कृतीच्या बीजाला अंकुर फुटल्याची जाणीव करून देत आहेत. अशा वेळी मल्ल बजरंग पुनियावर अन्याय होणे उचित आहे? एशियाड स्पर्धेमधील त्याने मिळवलेले दोन पदके, तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक, रौप्यपदक त्याचप्रमाणे, विश्व स्पर्धेतील कांस्यपदक आणि त्याच्या एकूणच पराक्रमाचे काहीच मोल नाही का? खेळाडू म्हणून विराट कोहलीचे कौतुक नक्की व्हावे, पण त्यासाठी अन्य कोणाचा बळी जाऊ नये!

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या