शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

वरुणच्या चिमट्यांवर चिंतन हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 3:18 AM

स्पष्टवक्तेपणाचा मूळ गुण त्यांच्यात अजूनही कायम आहे आणि मागील आठवड्यात नागपुरात याचे प्रत्यंतर आले.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी परिचित असलेले भाजप खासदार वरुण गांधी यांनी गेल्या काही काळापासून मौन धारण केले आहे. प्रसारमाध्यमांशीदेखील बोलण्याचे ते बहुतांश वेळा टाळतात. मात्र स्पष्टवक्तेपणाचा मूळ गुण त्यांच्यात अजूनही कायम आहे आणि मागील आठवड्यात नागपुरात याचे प्रत्यंतर आले. सार्वजनिक मंचावरून बोलत असताना वरुण गांधी यांनी स्वपक्षीयांच्या विरोधक द्वेषावरच अप्रत्यक्षपणे चिमटे काढले. अनेकदा विरोधी बाकांवर तज्ज्ञ सदस्य असतात. त्यांचा सन्मान व्हायला हवा, असे स्पष्ट मत त्यांनी नागपुरात एका परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले. सत्तापक्षातच असल्यामुळे वरुण गांधी यांच्या या वक्तव्याला जास्त गंभीरतेने घेतले गेले पाहिजे. मुळात वरुण गांधी यांना असे वाटणे आणि जाहीरपणे त्यावर भाष्य करणे याची आवश्यकता का भासली याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. केवळ बोलण्यासाठी त्यांनी वरील भावना नक्कीच व्यक्त केलेल्या नाही. गेल्या काही काळापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधील संघर्ष जास्तच तापल्याचे दिसून येत आहे. लहानलहान व जनहिताशी काहीही संबंध नसलेल्या अनेक मुद्यांना राजकीय स्वरूप देण्यात येत आहे. यातूनच सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. अनेकदा अतिउत्साहात संयम सुटतो आणि लोकशाहीच्या परंपरांना हरताळ फासत समोरच्याचा अपमान करत शब्दबंबाळ करण्यात येते. याहून पुढे जात काही जण तर आपल्या कृतीनेच सन्मानाची चिरफाड करतात. निवडणुकांच्या काळात तर अशी अनेक उदाहरणे दिसून येतातच. मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी अशीच स्थिती आहे हे देशाचे दुर्दैव आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेचा इतिहास लक्षात घेतला तर विरोधकांप्रती सन्मानाची एक मोठी परंपरा आपल्या देशात राहिलेली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दुर्गेची दिलेली उपमा असो किंवा डावी विचारसरणी असूनदेखील ए.बी.बर्धन यांची तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी खुल्या दिल्याने केलेली स्तुती, अशा अनेक घटना भारतीय राजकारणाच्या इतिहासाने अनुभवल्या आहेत. मात्र आता राजकारण गलिच्छ पातळीवर जात आहे. संसदेतदेखील एकमेकांचा सन्मान करण्याची नेत्यांमधील भावना कमी होत असल्याचे जनतेला ‘लाईव्ह’ दिसून येत आहे. लोकशाहीसाठी ही बाब नक्कीच धोकादायक आहे.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधी