शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

By यदू जोशी | Updated: September 12, 2025 07:26 IST

Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion:व्होटबँकवाल्या काँग्रेसपेक्षा टीआरपीवाल्या भावाला उद्धव यांनी जवळ केले आहे. यात जोखीम तर आहे; पण ती स्वीकारायची असे त्यांनी ठरवलेले दिसते.

-यदु जोशी (सहयोगी संपादक, लोकमत)एकेकाळी फाटाफुटीनंतर एकमेकांचा चेहरा बघण्यासही तयार नसलेले उद्धव आणि राज ठाकरे आता युतीच्या मार्गावर आहेत. दोघांच्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत. परवा शिवतीर्थावर दोघा भावांनी सोबत येण्याची 'ब्ल्यू प्रिंट' नक्कीच केली असेल. मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते. राज यांच्याकडे जेवढा मोठा टीआरपी आहे तेवढी मोठी व्होटबँक नाही. काँग्रेसकडे टीआरपी नसेल, पण व्होटबँक तर आहेच. व्होटबँकवाल्या काँग्रेसपेक्षा टीआरपीवाल्या भावाला उद्धव यांनी जवळ केले आहे. यात जोखीम आहे पण ती स्वीकारायची असे त्यांनी ठरवलेले दिसते.

उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबई महापालिकेत नक्कीच अडकलेला आहे. या महापालिकेवर आपला झेंडा नसेल तर पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल, असे त्यांना वाटत असणार आणि ते खरेदेखील आहे. उद्धव यांच्याकडे असलेल्या 'मराठी व्होटबँके'त आधीच एकनाथ शिंदे यांनी काही प्रमाणात छिद्र केले आहे. ते बुजवता येणे शक्य नाही. 

राज ठाकरे यांनीही छिद्र केले आहे. ते बुजविण्याला संधी आहे आणि त्या दृष्टीनेच उद्धव यांचे प्रयत्न आहेत. मुंबईत सत्ता टिकवली तर त्या भरवशावर राज्यात पाच वर्षे राजकारण करता येईल आणि राज यांच्या सोबतीने आणखी काही ठिकाणी जिंकता आले तर तो बोनस असेल, असा साधारणपणे उद्धव यांचा विचार दिसतो आणि त्यासाठीच ते आपले चुलत बंधू राज यांना सोबत घेऊ पाहत आहेत.

राजकीय अस्तित्वाची लढाई लढत असलेले राज यांनाही दुसरा पर्याय नाही. केवळ राजकीय अपरिहार्यतेतून दोघे एकत्र आले तर त्यांची एकी फार काळ टिकणार नाही; पण दोघांमध्ये भावनिक समेट झाला असेल तर मात्र ते दीर्घकाळ एकत्र राहतील.

मुंबईवरील वर्चस्व कायम टिकवण्यासाठी राज यांचा हात हातात घेऊन उद्धव पुढे गेले तर काही गोष्टी मात्र ते निश्चितच गमावतील. उद्धव हे भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत गेले तेव्हापासून त्यांना दलित-मुस्लीम आणि परंपरेने काँग्रेससोबत असलेल्या मतदारांनी जी साथ दिली आहे ती राज यांना सोबत घेण्याने मिळणार नाही. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेस आणि काँग्रेस विचारांची मते मिळाली होती तेवढ्या प्रमाणात त्यांची मते काँग्रेसला ट्रान्सफर झाली नव्हती. आपली मते उद्धव यांना ट्रान्सफर होतात; पण त्यांची मते पूर्णपणे आपल्याला मिळत नाहीत, याचा तपशीलवार अभ्यास मुंबई आणि राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वाने केला आहे. त्याची आकडेवारीदेखील आहे.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलताना एक भावना जाणवते की उद्धव-राज एकत्र आले तर फार वाईट वाटण्याचे कारण नाही. उलट काँग्रेसला मोठी स्पेस मिळेल. याला त्याला खांद्यावर घेत भार वाहून नेण्यापेक्षा बिनाभाराचे चाललो तर झपझप चालता येईल, असे मानणारा नेत्यांचा वर्ग काँग्रेसमध्ये मोठा आहे. कितीही वाईट परिस्थिती असली तरी बिनभाराची चाल चालावी, असे काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना वाटत आहे. अर्थात, दिल्ली त्यांना अंतिमतः काय सांगते ते महत्त्वाचे.

उद्धव यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत राहावे आणि राज ठाकरे यांची साथही घ्यावी, असेही होऊ शकते. आधी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नंतर नगरपालिका आणि शेवटी महापालिका अशा तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असे जवळपास चित्र आहे. 

अशावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका यामध्ये सध्या आहे तशी महाविकास आघाडी असावी. त्यात काँग्रेस उद्धवसेना आणि शरद पवार गट असेल. महापालिका निवडणुका सर्वात शेवटी म्हणजे पुढच्या वर्षी जानेवारीअखेर होतील अशी शक्यता आहे. त्यावेळी मग उद्धव-राज यांनी एकत्र यावे असा पर्याय खुला असेल. 

उद्धव यांनी आधी महाविकास आघाडीत राहावे आणि नंतर राज यांच्यासोबत जावे असा पर्याय पुढे आला तर तो काँग्रेस आणि शरद पवार यांना मान्य असेल का, हेही महत्त्वाचे. मुंबई महापालिकाकेंद्रित विचार करून उद्धव हे शिवतीर्थावर पोचले आहेत. काँग्रेस 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे.yadu.joshi@lokmat.com

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण