शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

सोशल मीडियाचा सुळसुळाट , मने दुखावतील अथवा भावनांना ठेस पोहोचेल, अशी मते मांडण्याचे परवाने नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 04:02 IST

बरे-वाईट, अनुकूल-प्रतिकूल असे काहीही असो; हरेक बाबतीत प्रत्येकाचेच काहीना काही मत असते. त्याबद्दल कुणाची हरकत असण्याचेही कारण नाही. परंतु प्रत्येक बाबतीतले आपले मत जाहीरपणे प्रदर्षित करण्याची गरज नसताना जेव्हा तसे केले जाते

बरे-वाईट, अनुकूल-प्रतिकूल असे काहीही असो; हरेक बाबतीत प्रत्येकाचेच काहीना काही मत असते. त्याबद्दल कुणाची हरकत असण्याचेही कारण नाही. परंतु प्रत्येक बाबतीतले आपले मत जाहीरपणे प्रदर्षित करण्याची गरज नसताना जेव्हा तसे केले जाते व वाद अंगावर ओढून घेतले जातात तेव्हा प्रसिद्धीचा स्टंट म्हणून त्याकडे बघितले जाणे स्वाभाविक असते. विशेषत: सोशल मीडियाचा सुळसुळाट झाल्याच्या आजच्या काळात तर अनेकांना कशाच्याही बाबतीतली आपली मते चावडीवर मांडण्याची जणू घाईच झालेली दिसून येते. घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे हे खरे, परंतु याचा अर्थ कुणाची मने दुखावतील अथवा भावनांना ठेस पोहोचेल, अशी मते मांडण्याचे परवाने दिलेले नाहीत. मात्र, त्याचे भान बाळगले जात नाही. अर्थातच कसेही करून प्रसिद्धीचा झोत आपल्या अंगावर राहील याची काळजी घेण्याचा हेतू त्यामागे असतो, हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. या मालिकेत जी अनेक नावे घेता येणारी आहेत त्यात अभिनेते ऋषी कपूर यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. आपल्या अभिनयासाठी ते जसे वा जितके ख्यातनाम आहेत तसे वा तितकेच हल्ली ते त्यांच्या टिवटिवाटमुळेही प्रसिद्धी मिळवत असतात. पण ‘फालोअर्स’ टिकवून ठेवण्याच्या नादात त्यांच्यासारखे सेलिब्रिटीही जेव्हा विवेक गहाण ठेवून बेताल बडबडून जातात किंवा एखादे छायाचित्र प्रसारित करून बसतात, तेव्हा कायद्याच्या कचाट्यात सापडल्याखेरीज राहत नाहीत. ऋषी कपूर यांच्यावर तशीच वेळ ओढविली आहे. एका लहान मुलाचा विवस्त्र फोटो टिष्ट्वट केल्याने जय हो फाउंडेशन या संस्थेने त्यांच्या विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नंतर कपूर यांनी ही पोस्ट हटविली खरी, परंतु कपूर यांचे २५ लाखांहून अधिक टिष्ट्वट फालोअर्स असल्याने त्यात सदरचे अश्लील छायाचित्र प्रसारित झाले त्यामुळे त्यांच्या विरोधात ‘पॉस्को’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीत आहे. मागेही मुंबईतील बांद्रा-वरळी सी लिंकच्या नावावरून असेच वादग्रस्त टिष्ट्वट करताना व काँग्रेस तसेच गांधी घराण्यावर टिप्पणी करताना ‘बाप का माल समझ रखा था’ अशा आशयाचे तारे या कपूर महाशयाने तोडल्याने वादाला सामोरे जावे लागले होते. क्रिकेट सामन्यासंबंधी पाकिस्तानचे अभिनंदन ते मांसाहारावरही मत प्रदर्शित करण्यापर्यंतचा त्यांचा आजवरचा टिवटिवाट पाहता वाद ओढवून घ्यायला त्यांना आवडते, असाच अर्थ काढता यावा. त्यामुळे कपूर यांच्या या साºया उपद्व्यापांकडे बेतालपणा म्हणूनच पाहता यावे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरFacebookफेसबुक