शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
2
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
3
Shantanu Naidu : रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
4
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
5
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
6
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
7
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
8
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
9
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
10
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
11
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
12
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
13
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
14
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
15
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
16
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
17
चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स वाचवा; सरकारकडून १६,५६३ कोटी रुपये पॅकेजची घोषणा!
18
तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे
19
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
20
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली

...तर तेव्हा कोणाचा कपाळमोक्ष होईल! गुन्हेगारीचा आलेख उंचावता, शैक्षणिक दर्जाची अधोगती

By नंदकिशोर पाटील | Updated: December 23, 2024 19:24 IST

ज्या प्रदेशात सुबत्ता असते तिथे तुलनेने गुन्हेगारीचे प्रमाण कमी असते. मराठवाड्यात गुन्हेगारीचा आलेख का उंचावतोय, याच्या मुळाशी गेल्यानंतर मागासलेपणात त्याची कारणं दडली असल्याचे दिसून येईल.

विधानसभा निवडणूक आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे कवित्व संपत नाही, तोच मराठवाड्यातील घटना-घडामोडींनी वर्तमानपत्रांतील जागा व्यापली. गेल्या पंधरा दिवसांतील वर्तमानपत्रं चाळली तर ही बाब लक्षात येईल. विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या केंद्रस्थानीदेखील मराठवाडाच होता. एकूणच काय मराठवाडा चर्चेत आणि बातमीत आहे. दुर्दैव इतकेच की, ही सगळी चर्चा मराठवाड्याच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक अधोगतीबद्दल आहे. परभणी आणि बीड जिल्ह्यांत घडलेल्या घटनांबाबत आजवर बरेच काही लिहून, बोलून आणि दाखवून झाले आहे. आपणही मागील सदरात याची दखल घेतली होती. आता या दोन्ही जिल्ह्यांत घडलेल्या घटनांची न्यायालयीन आणि एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. एखाद्या असामाजिक घटनांवर तत्काळ कारवाई करणे सोयीचे नसते, तेव्हा अशा प्रकारची चौकशी समिती वगैरे नेमण्याचा सोपस्कार पार पाडला जातो. आजवरच्या सर्वच सरकारांनी हाच राजमार्ग निवडलेला आहे. त्यामुळे यथावकाश या चौकशी समित्यांचे निष्कर्ष समोर येतील तेव्हा यातील खरे गुन्हेगार कोण? हे स्पष्ट होईल. परंतु, तोपर्यंत बरेच पाणी वाहून गेलेले असेल. या घटनांमुळे झालेल्या जखमा कालांतराने भरून निघतील, पण व्रण तसेच राहतील. ना झालेले नुकसान भरून निघेल ना बळी परत येतील...

मराठवाड्यानं विद्यापीठ नामांतर लढ्यात खूप काही भोगलं आहे. त्या जखमा आता कुठे भरून निघत असताना त्याला नख लावण्याचे प्रयत्न होत आहेत. धार्मिक आणि जातीय विद्वेषाचे विष पेरून इथले सामाजिक साैहार्द बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. मागासलेल्या प्रदेशात असे प्रयोग हमखास केले जातात. अलीकडच्या काळात मराठवाडा अशा धार्मिक ध्रुवीकरणाची प्रयोगशाळाच बनला आहे. यातून कोणाचे सुप्त इप्सित साध्य होत असेलही, परंतु अंतिमतः नुकसान होते ते इथे राहणाऱ्या माणसांचे. हिंदू विरुद्ध मुस्लिम, मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध वंजारी असे वाद निर्माण करून काहींनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली. पण मराठवाड्याच्या पदरात काय पडले? धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाच्या जोरावर निवडून आलेले आमदार-खासदार या प्रदेशासाठी काही करणार आहेत की नाही? विकासाचा कोणता रोडमॅप त्यांच्याकडे आहे? या भाैगोलिक प्रदेशातील सर्व शहरांत आज आठ-दहा दिवसांतून एकदा पाणी येते. किमान एक दिवसाआड पाणी देणार आहात का? मराठवाड्यातील आठपैकी सात जिल्हे दरडोई उत्पन्नात गडचिरोली, चंद्रपूर अथवा सिंधुदुर्गपेक्षा मागे आहेत. राज्याला दोन-दोन मुख्यमंत्री देणाऱ्या लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचादेखील यात समावेश आहे!

ज्या प्रदेशात सुबत्ता असते तिथे तुलनेने गुन्हेगारीचे प्रमाण कमी असते. मराठवाड्यात गुन्हेगारीचा आलेख का उंचावतोय, याच्या मुळाशी गेल्यानंतर मागासलेपणात त्याची कारणं दडली असल्याचे दिसून येईल. मूठभर बागायतदार सोडले तर सोयाबीन आणि कापूस पिकवणाऱ्या माणसांचा हा प्रदेश आहे. पाऊस आणि बाजारपेठ अशा दोन्ही बिनभरवशी घटकांवर अवलंबून असलेल्या इथल्या बहुजन समाजाचे नेमके दुखणे कोणी समजून घ्यायला तयार नाही. निवडणुका आल्या की पाणीदार आश्वासनांची अतिवृष्टी होते. नंतर इकडे कोणी ढुंकूनही पाहात नाही. आजवर जलसिंचनाच्या नावाखाली सरकारी तिजोरीतील कोट्यवधी रुपये खर्च झाले. परंतु, जायकवाडी सोडले तर एकाही धरणाच्या कालव्यातून पाणी वाहत नाही. सिंचनाची सोय नसल्याने शेती उत्पन्नात होणारी घट शेतकऱ्यांचे जगणे असह्य करते. रोजगाराच्या संधीचा अभाव असल्याने इथल्या तरुणाईच्या हाताला काम नाही. एखादा तरुण जेव्हा एसटी अथवा दुकानांवर दगड भिरकावतो तेव्हा तो व्यवस्थेवर असलेला आपला राग व्यक्त करत असतो. सामाजिक आंदोलनातून ही धग दिसून येते. जातीय आणि धार्मिक विद्वेषाचे विष पेरून अशा तरुणांची माथी भडकवली जातात.

एकीकडे गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे, तर दुसरीकडे शैक्षणिक गुणवत्तेची अधोगती होत चालली आहे. विभागीय आयुक्तालयाने अलीकडेच सादर केलेल्या अहवालातील निष्कर्ष धक्कादायक आहेत. ३३ टक्के विद्यार्थ्यांना साधे शब्द वाचता येत नाहीत तर प्राथमिक वर्गातील ३१ टक्के विद्यार्थ्यांना ९९ पर्यंतचे अंकज्ञान नाही. मराठवाड्यातील सुमारे बारा हजार शाळांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. प्राथमिक शिक्षणाचा पाया इतका कच्चा असलेल्या या विद्यार्थ्यांचे पुढे काय होत असेल? भविष्यात या विद्यार्थ्यांपैकी एखाद्याने दगड उचलला तर कोणाचा कपाळमोक्ष होईल!

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीstone peltingदगडफेकEducationशिक्षण