शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

...तर खरंच भाकरीला महाग होऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 11:43 IST

मराठवाड्यात कोणी मोठ्या आर्थिक संकटात असेल तर तो म्हणतो, भाकरीला महाग झालो आहे.

- धर्मराज हल्लाळे

महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात कोणी मोठ्या आर्थिक संकटात असेल तर तो म्हणतो, भाकरीला महाग झालो आहे. अगदी शेवटचा पर्याय म्हणजे भाकर. म्हणजेच रोजचे अन्न तेही न मिळणे म्हणजे मोठी अडचण असणे. मात्र आजच्या परिस्थितीत स्वस्त धान्य दुकानातून अत्यल्प किमतीत मिळणारे गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल यामुळे अन्नधान्याची उपलब्धता शेवटच्या घटकापर्यंत झाली आहे. सदरील दुकानांमधून अजून तरी ज्वारी मिळत नाही. रबी हंगामातील ज्वारी हे मुख्य पीक आहे. परंतु, यंदाच्या दुष्काळजन्य स्थितीत रबीचा पेराच झालेला नाही. परिणामी पुढच्या वर्षी ज्वारी मिळणे कठीण आहे. त्याला आणखी एक वर्ष असताना आत्ताच बाजारपेठेत ज्वारीची आवक एकदम कमी झाली आहे.

लातूरची बाजार समिती राज्यात नावाजलेली आहे. गेल्या तीन वर्षांतील आवक लक्षात घेतली तर ज्वारी उत्पादनात फार मोठी घट झाल्याचे दिसते. त्यामुळे गेल्या  वर्षीच्या तुलनेत आत्ताच दुप्पट भाव झाला आहे. साधारणपणे १७३५ रूपये क्विंटल असणारी ज्वारी ३२०० रूपयांवर गेली आहे. पुढच्या वर्षी तर जवळजवळ आवक नगण्य होईल. त्यामुळे भाव किती पटीने वाढतील, हे सांगणे कठीण आहे. उद्भवलेल्या स्थितीचा फायदा घेऊन काही जण ज्वारीचा साठा करण्याची शक्यता आहे. परिणामी ज्वारीचे भाव आणखी वाढतील.

अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे ज्वारीच्या पेऱ्यात घट झाली आजपर्यंत भाव कितीही वाढले, तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ज्वारीच्या भाकरी आहारात असतात. मात्र भविष्यात आवकच झाली नाही तर नेहमी सहज परवडणारी ज्वारी मिळणे कठीण होईल. त्यामुळे नक्कीच आपण भाकरीला महाग होऊ त्याचवेळी पशुधनाचीही मोठी अडचण होणार आहे. कारण ज्वारीच्या कडब्याला सर्वाधिक मागणी असते. साधारणत: रबी ज्वारीची पेरणी आॅक्टोबरमध्ये होते. काढणी फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊन ज्वारी बाजारपेठेत उपलब्ध होते. मात्र रबी पेराच निम्म्यावर आला. त्यातही ज्वारी अत्यल्प असल्याने पुढचे वर्ष भाकरीसाठी नक्कीच महाग असणार आहे.

एकीकडे भाकरीचा प्रश्न, दुसरीकडे खरिपातील तुरीचा खराटा झाला आहे. त्यामुळे तुरीच्या दरातही वाढ झाली आहे. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांत लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. इथे लातूरबरोबरच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून शेतमाल विक्रीसाठी येतो. साधारणपणे दररोज २० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. दुष्काळामुळे आवक कमी होऊनही उलाढाल मोठी आहे. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्राच्या आॅनलाईन फेऱ्यात न अडकता सोयाबीनची विक्री थेट बाजारात करीत आहेत. सोयाबीनचा भाव स्थिर असून तुरीचा मात्र पाच हजारावर पोहोचला आहे. हरभरा, मूग, उडीद या शेतमालाच्या दरातही वाढ झाली असून आवक कमी झाल्याने येणाऱ्या काळात भाव वाढतीलच असे दिसते. 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडा