शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

...तर खरंच भाकरीला महाग होऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 11:43 IST

मराठवाड्यात कोणी मोठ्या आर्थिक संकटात असेल तर तो म्हणतो, भाकरीला महाग झालो आहे.

- धर्मराज हल्लाळे

महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात कोणी मोठ्या आर्थिक संकटात असेल तर तो म्हणतो, भाकरीला महाग झालो आहे. अगदी शेवटचा पर्याय म्हणजे भाकर. म्हणजेच रोजचे अन्न तेही न मिळणे म्हणजे मोठी अडचण असणे. मात्र आजच्या परिस्थितीत स्वस्त धान्य दुकानातून अत्यल्प किमतीत मिळणारे गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल यामुळे अन्नधान्याची उपलब्धता शेवटच्या घटकापर्यंत झाली आहे. सदरील दुकानांमधून अजून तरी ज्वारी मिळत नाही. रबी हंगामातील ज्वारी हे मुख्य पीक आहे. परंतु, यंदाच्या दुष्काळजन्य स्थितीत रबीचा पेराच झालेला नाही. परिणामी पुढच्या वर्षी ज्वारी मिळणे कठीण आहे. त्याला आणखी एक वर्ष असताना आत्ताच बाजारपेठेत ज्वारीची आवक एकदम कमी झाली आहे.

लातूरची बाजार समिती राज्यात नावाजलेली आहे. गेल्या तीन वर्षांतील आवक लक्षात घेतली तर ज्वारी उत्पादनात फार मोठी घट झाल्याचे दिसते. त्यामुळे गेल्या  वर्षीच्या तुलनेत आत्ताच दुप्पट भाव झाला आहे. साधारणपणे १७३५ रूपये क्विंटल असणारी ज्वारी ३२०० रूपयांवर गेली आहे. पुढच्या वर्षी तर जवळजवळ आवक नगण्य होईल. त्यामुळे भाव किती पटीने वाढतील, हे सांगणे कठीण आहे. उद्भवलेल्या स्थितीचा फायदा घेऊन काही जण ज्वारीचा साठा करण्याची शक्यता आहे. परिणामी ज्वारीचे भाव आणखी वाढतील.

अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे ज्वारीच्या पेऱ्यात घट झाली आजपर्यंत भाव कितीही वाढले, तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ज्वारीच्या भाकरी आहारात असतात. मात्र भविष्यात आवकच झाली नाही तर नेहमी सहज परवडणारी ज्वारी मिळणे कठीण होईल. त्यामुळे नक्कीच आपण भाकरीला महाग होऊ त्याचवेळी पशुधनाचीही मोठी अडचण होणार आहे. कारण ज्वारीच्या कडब्याला सर्वाधिक मागणी असते. साधारणत: रबी ज्वारीची पेरणी आॅक्टोबरमध्ये होते. काढणी फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊन ज्वारी बाजारपेठेत उपलब्ध होते. मात्र रबी पेराच निम्म्यावर आला. त्यातही ज्वारी अत्यल्प असल्याने पुढचे वर्ष भाकरीसाठी नक्कीच महाग असणार आहे.

एकीकडे भाकरीचा प्रश्न, दुसरीकडे खरिपातील तुरीचा खराटा झाला आहे. त्यामुळे तुरीच्या दरातही वाढ झाली आहे. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांत लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. इथे लातूरबरोबरच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून शेतमाल विक्रीसाठी येतो. साधारणपणे दररोज २० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. दुष्काळामुळे आवक कमी होऊनही उलाढाल मोठी आहे. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्राच्या आॅनलाईन फेऱ्यात न अडकता सोयाबीनची विक्री थेट बाजारात करीत आहेत. सोयाबीनचा भाव स्थिर असून तुरीचा मात्र पाच हजारावर पोहोचला आहे. हरभरा, मूग, उडीद या शेतमालाच्या दरातही वाढ झाली असून आवक कमी झाल्याने येणाऱ्या काळात भाव वाढतीलच असे दिसते. 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडा