शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

...तर खरंच भाकरीला महाग होऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 11:43 IST

मराठवाड्यात कोणी मोठ्या आर्थिक संकटात असेल तर तो म्हणतो, भाकरीला महाग झालो आहे.

- धर्मराज हल्लाळे

महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात कोणी मोठ्या आर्थिक संकटात असेल तर तो म्हणतो, भाकरीला महाग झालो आहे. अगदी शेवटचा पर्याय म्हणजे भाकर. म्हणजेच रोजचे अन्न तेही न मिळणे म्हणजे मोठी अडचण असणे. मात्र आजच्या परिस्थितीत स्वस्त धान्य दुकानातून अत्यल्प किमतीत मिळणारे गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल यामुळे अन्नधान्याची उपलब्धता शेवटच्या घटकापर्यंत झाली आहे. सदरील दुकानांमधून अजून तरी ज्वारी मिळत नाही. रबी हंगामातील ज्वारी हे मुख्य पीक आहे. परंतु, यंदाच्या दुष्काळजन्य स्थितीत रबीचा पेराच झालेला नाही. परिणामी पुढच्या वर्षी ज्वारी मिळणे कठीण आहे. त्याला आणखी एक वर्ष असताना आत्ताच बाजारपेठेत ज्वारीची आवक एकदम कमी झाली आहे.

लातूरची बाजार समिती राज्यात नावाजलेली आहे. गेल्या तीन वर्षांतील आवक लक्षात घेतली तर ज्वारी उत्पादनात फार मोठी घट झाल्याचे दिसते. त्यामुळे गेल्या  वर्षीच्या तुलनेत आत्ताच दुप्पट भाव झाला आहे. साधारणपणे १७३५ रूपये क्विंटल असणारी ज्वारी ३२०० रूपयांवर गेली आहे. पुढच्या वर्षी तर जवळजवळ आवक नगण्य होईल. त्यामुळे भाव किती पटीने वाढतील, हे सांगणे कठीण आहे. उद्भवलेल्या स्थितीचा फायदा घेऊन काही जण ज्वारीचा साठा करण्याची शक्यता आहे. परिणामी ज्वारीचे भाव आणखी वाढतील.

अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे ज्वारीच्या पेऱ्यात घट झाली आजपर्यंत भाव कितीही वाढले, तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ज्वारीच्या भाकरी आहारात असतात. मात्र भविष्यात आवकच झाली नाही तर नेहमी सहज परवडणारी ज्वारी मिळणे कठीण होईल. त्यामुळे नक्कीच आपण भाकरीला महाग होऊ त्याचवेळी पशुधनाचीही मोठी अडचण होणार आहे. कारण ज्वारीच्या कडब्याला सर्वाधिक मागणी असते. साधारणत: रबी ज्वारीची पेरणी आॅक्टोबरमध्ये होते. काढणी फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊन ज्वारी बाजारपेठेत उपलब्ध होते. मात्र रबी पेराच निम्म्यावर आला. त्यातही ज्वारी अत्यल्प असल्याने पुढचे वर्ष भाकरीसाठी नक्कीच महाग असणार आहे.

एकीकडे भाकरीचा प्रश्न, दुसरीकडे खरिपातील तुरीचा खराटा झाला आहे. त्यामुळे तुरीच्या दरातही वाढ झाली आहे. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांत लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. इथे लातूरबरोबरच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून शेतमाल विक्रीसाठी येतो. साधारणपणे दररोज २० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. दुष्काळामुळे आवक कमी होऊनही उलाढाल मोठी आहे. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्राच्या आॅनलाईन फेऱ्यात न अडकता सोयाबीनची विक्री थेट बाजारात करीत आहेत. सोयाबीनचा भाव स्थिर असून तुरीचा मात्र पाच हजारावर पोहोचला आहे. हरभरा, मूग, उडीद या शेतमालाच्या दरातही वाढ झाली असून आवक कमी झाल्याने येणाऱ्या काळात भाव वाढतीलच असे दिसते. 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडा