शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

...तर उरतील सगळ्या त्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:52 IST

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बहुमताचे सरकार तब्बल ३० वर्षांनंतर स्थापन झाल्यापासून अनेक फेरबदल करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे.

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बहुमताचे सरकार तब्बल ३० वर्षांनंतर स्थापन झाल्यापासून अनेक फेरबदल करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. वर्षानुवर्षे सादर होणारा रेल्वे अर्थसंकल्प बंद करण्यात आला. आता आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च असे न अमलात आणता जानेवारी ते डिसेंबर अमलात आणण्याचे घाटत आहे. परिणामी, नागपूर या राज्याच्या उपराजधानीत दरवर्षी गुलाबी थंडीत साजरा होणारा विधिमंडळ अधिवेशनाचा सोहळा यावर्षीपासून साजरा होणार नाही. डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल आणि जुलै महिन्यात नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन घेण्यात येणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे हा निर्णय अमलात येण्याची दाट शक्यता दिसत आहे. राजकारणात नॉस्टेल्जियाला काडीमात्र महत्त्व असत नाही. असे असले तरी नागपूरचे अधिवेशन, त्या काळातील ती गुलाबी थंडी आणि त्याच वेळी बाजारात मुबलक असलेली रसाळ टवटवीत संत्री हा योग यापुढे येणार नाही. नागपूरचे अधिवेशन हे सर्वपक्षीय आमदार तसेच मंत्री इतकेच काय, बडे नोकरशहा यांचा फॅशन शो असतो. रंगीबेरंगी ऊबदार जॅकेटस्, ब्लेझर्स, सूट, जोधपुरी कोट परिधान केलेले सदस्य जेव्हा सभागृहात जमा होतात, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर अक्षरश: रंगांची उधळण झालेली असते. रात्री थंडी वाढल्यावर वेगवेगळ्या बंगल्यांतून दूरवर पदार्थांचे पसरणारे चमचमीत, सुग्रास, सुवास वºहाडी, खान्देशी, कोकणी, आगरी अशा वेगवेगळ्या प्रदेशांतील वेगवेगळ्या डेलिकसींचा फूड फेस्टिव्हल सुरू झाल्याची याद देतात. धगधगणाºया शेकोट्यांच्या भोवती बसलेली मंडळी कधी एखाद्या आर्त सूरांना मान डोलावून दाद देत असतात किंवा एखाद्या कवीच्या खुसखुशीत शब्दरचनेचा आनंद घेताना खुसखुशीत पदार्थ अलगद जिभेवर ठेवत असतात. नागपूरचे अधिवेशन अशा सोहळ्यांबरोबरच वादळांनी गाजलेले आहे. ‘हे हिंदुहृदयसम्राटा, हा छगन करी तुज टाटा’ या पंक्ती सुरेश भट यांना लिहिण्याची प्रेरणा देणारे छगन भुजबळ यांचे शिवसेनेतील बंड नागपूरच्या भूमीत साकारले. बाबासाहेब भोसले यांच्याविरुद्धचा आमदारांचा आक्रोश हाही त्याच गुलाबी थंडीत उफाळून आला. त्यानंतर, बाबासाहेबांनी केलेली ‘बंडोबा, गुंडोबा आणि थंडोबा’ ही टिप्पणी महाराष्ट्राच्या राजकारणात गाजली. शंकरराव चव्हाण आणि शरद पवार या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी परस्परांवर मात देण्याकरिता नागपूरचीच खेळपट्टी निवडली होती. दीर्घकाळाची ही घडी विस्कटण्याकरिता सरकारने दिलेले कारण तितकेसे पटण्यासारखे नाही. मार्चमध्ये अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर कामाचे नियोजन होईपर्यंत पावसाळा येतो व त्यानंतर कामे रखडतात आणि सरकारवर टीका होते, असे सरकारचे म्हणणे आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी