शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

...तर उरतील सगळ्या त्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:52 IST

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बहुमताचे सरकार तब्बल ३० वर्षांनंतर स्थापन झाल्यापासून अनेक फेरबदल करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे.

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बहुमताचे सरकार तब्बल ३० वर्षांनंतर स्थापन झाल्यापासून अनेक फेरबदल करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. वर्षानुवर्षे सादर होणारा रेल्वे अर्थसंकल्प बंद करण्यात आला. आता आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च असे न अमलात आणता जानेवारी ते डिसेंबर अमलात आणण्याचे घाटत आहे. परिणामी, नागपूर या राज्याच्या उपराजधानीत दरवर्षी गुलाबी थंडीत साजरा होणारा विधिमंडळ अधिवेशनाचा सोहळा यावर्षीपासून साजरा होणार नाही. डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल आणि जुलै महिन्यात नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन घेण्यात येणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे हा निर्णय अमलात येण्याची दाट शक्यता दिसत आहे. राजकारणात नॉस्टेल्जियाला काडीमात्र महत्त्व असत नाही. असे असले तरी नागपूरचे अधिवेशन, त्या काळातील ती गुलाबी थंडी आणि त्याच वेळी बाजारात मुबलक असलेली रसाळ टवटवीत संत्री हा योग यापुढे येणार नाही. नागपूरचे अधिवेशन हे सर्वपक्षीय आमदार तसेच मंत्री इतकेच काय, बडे नोकरशहा यांचा फॅशन शो असतो. रंगीबेरंगी ऊबदार जॅकेटस्, ब्लेझर्स, सूट, जोधपुरी कोट परिधान केलेले सदस्य जेव्हा सभागृहात जमा होतात, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर अक्षरश: रंगांची उधळण झालेली असते. रात्री थंडी वाढल्यावर वेगवेगळ्या बंगल्यांतून दूरवर पदार्थांचे पसरणारे चमचमीत, सुग्रास, सुवास वºहाडी, खान्देशी, कोकणी, आगरी अशा वेगवेगळ्या प्रदेशांतील वेगवेगळ्या डेलिकसींचा फूड फेस्टिव्हल सुरू झाल्याची याद देतात. धगधगणाºया शेकोट्यांच्या भोवती बसलेली मंडळी कधी एखाद्या आर्त सूरांना मान डोलावून दाद देत असतात किंवा एखाद्या कवीच्या खुसखुशीत शब्दरचनेचा आनंद घेताना खुसखुशीत पदार्थ अलगद जिभेवर ठेवत असतात. नागपूरचे अधिवेशन अशा सोहळ्यांबरोबरच वादळांनी गाजलेले आहे. ‘हे हिंदुहृदयसम्राटा, हा छगन करी तुज टाटा’ या पंक्ती सुरेश भट यांना लिहिण्याची प्रेरणा देणारे छगन भुजबळ यांचे शिवसेनेतील बंड नागपूरच्या भूमीत साकारले. बाबासाहेब भोसले यांच्याविरुद्धचा आमदारांचा आक्रोश हाही त्याच गुलाबी थंडीत उफाळून आला. त्यानंतर, बाबासाहेबांनी केलेली ‘बंडोबा, गुंडोबा आणि थंडोबा’ ही टिप्पणी महाराष्ट्राच्या राजकारणात गाजली. शंकरराव चव्हाण आणि शरद पवार या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी परस्परांवर मात देण्याकरिता नागपूरचीच खेळपट्टी निवडली होती. दीर्घकाळाची ही घडी विस्कटण्याकरिता सरकारने दिलेले कारण तितकेसे पटण्यासारखे नाही. मार्चमध्ये अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर कामाचे नियोजन होईपर्यंत पावसाळा येतो व त्यानंतर कामे रखडतात आणि सरकारवर टीका होते, असे सरकारचे म्हणणे आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी