शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

...तर उरतील सगळ्या त्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:52 IST

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बहुमताचे सरकार तब्बल ३० वर्षांनंतर स्थापन झाल्यापासून अनेक फेरबदल करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे.

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बहुमताचे सरकार तब्बल ३० वर्षांनंतर स्थापन झाल्यापासून अनेक फेरबदल करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. वर्षानुवर्षे सादर होणारा रेल्वे अर्थसंकल्प बंद करण्यात आला. आता आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च असे न अमलात आणता जानेवारी ते डिसेंबर अमलात आणण्याचे घाटत आहे. परिणामी, नागपूर या राज्याच्या उपराजधानीत दरवर्षी गुलाबी थंडीत साजरा होणारा विधिमंडळ अधिवेशनाचा सोहळा यावर्षीपासून साजरा होणार नाही. डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल आणि जुलै महिन्यात नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन घेण्यात येणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे हा निर्णय अमलात येण्याची दाट शक्यता दिसत आहे. राजकारणात नॉस्टेल्जियाला काडीमात्र महत्त्व असत नाही. असे असले तरी नागपूरचे अधिवेशन, त्या काळातील ती गुलाबी थंडी आणि त्याच वेळी बाजारात मुबलक असलेली रसाळ टवटवीत संत्री हा योग यापुढे येणार नाही. नागपूरचे अधिवेशन हे सर्वपक्षीय आमदार तसेच मंत्री इतकेच काय, बडे नोकरशहा यांचा फॅशन शो असतो. रंगीबेरंगी ऊबदार जॅकेटस्, ब्लेझर्स, सूट, जोधपुरी कोट परिधान केलेले सदस्य जेव्हा सभागृहात जमा होतात, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर अक्षरश: रंगांची उधळण झालेली असते. रात्री थंडी वाढल्यावर वेगवेगळ्या बंगल्यांतून दूरवर पदार्थांचे पसरणारे चमचमीत, सुग्रास, सुवास वºहाडी, खान्देशी, कोकणी, आगरी अशा वेगवेगळ्या प्रदेशांतील वेगवेगळ्या डेलिकसींचा फूड फेस्टिव्हल सुरू झाल्याची याद देतात. धगधगणाºया शेकोट्यांच्या भोवती बसलेली मंडळी कधी एखाद्या आर्त सूरांना मान डोलावून दाद देत असतात किंवा एखाद्या कवीच्या खुसखुशीत शब्दरचनेचा आनंद घेताना खुसखुशीत पदार्थ अलगद जिभेवर ठेवत असतात. नागपूरचे अधिवेशन अशा सोहळ्यांबरोबरच वादळांनी गाजलेले आहे. ‘हे हिंदुहृदयसम्राटा, हा छगन करी तुज टाटा’ या पंक्ती सुरेश भट यांना लिहिण्याची प्रेरणा देणारे छगन भुजबळ यांचे शिवसेनेतील बंड नागपूरच्या भूमीत साकारले. बाबासाहेब भोसले यांच्याविरुद्धचा आमदारांचा आक्रोश हाही त्याच गुलाबी थंडीत उफाळून आला. त्यानंतर, बाबासाहेबांनी केलेली ‘बंडोबा, गुंडोबा आणि थंडोबा’ ही टिप्पणी महाराष्ट्राच्या राजकारणात गाजली. शंकरराव चव्हाण आणि शरद पवार या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी परस्परांवर मात देण्याकरिता नागपूरचीच खेळपट्टी निवडली होती. दीर्घकाळाची ही घडी विस्कटण्याकरिता सरकारने दिलेले कारण तितकेसे पटण्यासारखे नाही. मार्चमध्ये अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर कामाचे नियोजन होईपर्यंत पावसाळा येतो व त्यानंतर कामे रखडतात आणि सरकारवर टीका होते, असे सरकारचे म्हणणे आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी