शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

धर्म, विद्वेष अन् शक्तिपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 08:36 IST

देशाच्या कोनाकोपऱ्यात विद्वेषाच्या राजकारणाचे पीक जोमात आहे. धर्मरक्षकांच्या टोळ्या जागोजागी जाऊन मेळावे घेताहेत.

महाराष्ट्रातील हिंदू जनाक्रोश मोर्चामध्ये केली जाणारी भाषणे, पसरवला जाणारा विद्वेष आणि पोलिसांची निष्क्रियता यासंदर्भात दाखल एका याचिकेच्या विषयाने सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत सरकारला कर्तव्याची जाणीव करून दिली, हे बरे झाले. सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी हे इतर राज्यांमध्येही सुरू असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरकारच शक्तिहीन किंवा नपुंसक असल्यामुळे हे घडत असल्याचे न्यायालयाने सुनावले. न्या. के. एम. जोसेफ व न्या. श्रीमती बी. व्ही. नागरत्ना यांची ही चपराक केवळ महाराष्ट्र सरकारलाच नाही. कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या सगळ्याच राज्य सरकारांची आणि धर्म व राजकारणाची सरमिसळ करणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांची कानउघाडणी न्यायालयाने केली आहे. कारण, हे केवळ महाराष्ट्रातच सुरू आहे असे नाही.

देशाच्या कोनाकोपऱ्यात विद्वेषाच्या राजकारणाचे पीक जोमात आहे. धर्मरक्षकांच्या टोळ्या जागोजागी जाऊन मेळावे घेताहेत. एका धर्माच्या जागरणाला दुसऱ्या धर्माकडून तितक्याच जोरकसपणे उत्तर दिले जाते. तिथे होणारी आत्यंतिक विखारी भाषणे हा गंभीर चिंतेचा विषय आहे. ही भाषणे दंगली पेटवतील, देश खड्ड्यात जाईल, अशी भीती शहाणीसुरती माणसे वारंवार व्यक्त करीत असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. खरेतर धर्म माणसांनीच निर्माण केला. माणसांच्या सामाईक वर्तणुकीला नियम, चौकट असावी हा त्यामागे हेतू होता; पण धर्मानुसार बदलणाऱ्या चौकटीच इतक्या जीवघेण्या ठरल्या की धर्माच्या अतिरेकामुळे माणसांचे जीव धोक्यात आले.

प्रत्येकाला आपलाच धर्म संकटात असल्याचे वारंवार सांगितले जाते. ते संकट निवारण्यासाठी सज्ज होण्याची आवाहने केली जातात. मग, धर्मरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरतात. मोर्चे काढतात, निदर्शने करतात. बहुतेक वेळा दुसऱ्या धर्मावर पातळी सोडून टीका केली जाते. विखार पसरवला जातो. विद्वेषाचे वातावरण सतत तापत ठेवले जाते. कधीमधी त्यामुळे दंगली पेटतात. निरपराधांचे, महिला मुले वृद्धांचे, हातावर पोट असलेल्या गोरगरिबांचे जीव जातात. त्यातून पुन्हा धर्मरक्षणाची हाक दिली जाते. काल, सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानुसार हे एक दुष्टचक्र आहे. ते रोखण्याची जबाबदारी सरकार नावाच्या व्यवस्थेची आहे.

धार्मिक सौहार्द बिघडवणाऱ्या प्रत्येक कृतीविरुद्ध धर्म न पाहता कारवाई व्हायला हवी. त्यासाठी कायदे आहेत, कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे आणि दोषींना सजा देण्यासाठी न्यायालयेही आहेत; पण असे होताना दिसत नाही. कारण, सरकार चालविणाऱ्यांना त्या विद्वेषाला खतपाणी घालून मतांचे पीक काढायचे असते. वास्तविक ज्याने त्याने धर्म घरात ठेवावा. धर्मनिरपेक्ष राज्यघटनेनुसार देश चालावा. कोणताही धर्म नव्हे तर त्या धर्मावर चालणारे राजकारण संकटात असते. लोकांच्या पोटापाण्याच्या, रोजीरोटीच्या प्रश्नांवर द्यायला उत्तरे नसली की राजकीय पक्ष धार्मिक विषयांकडे वळतात. एव्हाना अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलेल्या या समस्येच्या मुळाशी धर्माचे राजकारणच आहे. म्हणूनच न्यायालयाने राजकारण्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

राजकीय नेत्यांचे सार्वजनिक ठिकाणी वागणे हा वेगळा विषय किमान त्यांची भाषणे तरी लोकांची माथी भडकवणारी असू नयेत, न्यायालयाने पंडित जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी यांची नावे घेत भाषणांमधील फरक स्पष्ट केला. नेहरू, वाजपेयींकडे भाषावैभव होते, शब्दसाठा होता, उपमा- अलंकारांचा वापर करीत मतदारांना खेळवून ठेवण्याची हातोटी होती. म्हणून लोक दूरवरून त्यांना ऐकायला यायचे. तसले कौशल्य नसले की मग तोंडात येईल ते बोलावे लागते आणि बहुतेक वेळा ते अन्य धर्माच्या, पक्षांच्या लोकांना लक्ष्य करणारे असते.

राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे, की अवतीभोवती अशी गरळ ओकणारेच अधिक सापडतात. आणखी एक मुद्दा असा विखार पसरविणाऱ्यांशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही, असे सांगत त्यांना मुख्य प्रवाहाबाहेरचे, फ्रिंज ठरविण्याचा प्रयत्न होतो; परंतु हे समाजकंटक कधीच फ्रिंज नसतात. पाण्याचा अंदाज घेण्यासाठी टाकले जाणारे ते दगड असतात. लोकांची माथी भडकविण्यात त्यांना यश येत असले की ते राजकीय पक्षांचे असतात आणि ते अडचणीत आले की त्यांना फ्रिंज ठरवून बाहेर फेकले जाते. स्वतःला धर्मरक्षक म्हणवून घेत धर्मरक्षणाच्या पवित्र कार्यासाठी आपली निवड झालेल्यांच्या ज्या दिवशी हे लक्षात येईल, तेव्हाच या दुष्टचक्राला आळा बसेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliticsराजकारणIndiaभारत