शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

राष्ट्रकुल स्पर्धेतून क्रिकेट, हॉकी वगळण्याचे राजकारण! भारतीय पारंगत असलेलेच खेळ का वर्ज्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 10:49 IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा ज्या खेळांमध्ये दबदबा, नेमके तेच खेळ राष्ट्रकुलमधून वगळण्यात आले आहेत. यामागे राजकारणही असू शकते.

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर

ग्लासगो येथे २०२६ साली होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांमधून हॉकी, नेमबाजी, क्रिकेट आणि कुस्ती यासारखे काही खेळ वगळले गेले. ज्या खेळांमध्ये भारत पारंगत आहे प्रामुख्याने तेच खेळ राष्ट्रकुलमध्ये राहणार नसल्याने सध्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. कारण भारताच्या पदकतालिकेवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. खर्चावर लगाम लावण्याचे कारण समोर करून राष्ट्रकुल खेळ महासंघाने प्रमुख क्रीडा प्रकारांना वगळण्याचा घेतलेला निर्णय अनाकलनीय आहे.

ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतून हटवण्यात आलेल्या खेळांवर नजर टाकल्यास एक गोष्ट लक्षात येते की, या खेळांवर प्रामुख्याने भारत आणि चीन या दोन देशांचाच जास्त दबदबा होता. भारताचे सर्वाधिक नुकसान हॉकी, क्रिकेट आणि बॅडमिंटन वगळल्यामुळे होणार आहे. कारण या तिन्ही खेळांमध्ये आपण पदकाचे प्रमुख दावेदार होतो. बॅडमिंटनचा समावेश न करणे एकवेळ समजून घेता येऊ शकेल, कारण चीन, जपान, कोरिया आणि भारत या चारच संघांचा या खेळावर जास्त प्रभाव आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल दहा खेळाडूंमध्ये भारताचे काही शटलर आहेत; पण ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, बेल्जियम, अर्जेंटिना, कॅनडा यासारख्या देशांचा वरचष्मा असूनही हॉकीला वगळणे समजण्यापलीकडचे आहे. गेल्या काही काळापासून भारतीय संघाने हॉकीचे सुवर्णयुग पुन्हा आल्यासारखा खेळ केला आहे. दुसरीकडे, क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास आपल्या देशात धर्म म्हणून या खेळाकडे पाहिले जाते. त्यामुळेच जगाच्या कोपऱ्यात कुठेही भारताचा सामना असला तरी चाहते हजेरी लावत असतात.

यजमान देश आणि त्यांच्या क्रिकेट बोर्डाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मग अशा सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीलाच पिंजऱ्यात कोंडून ठेवण्यात काय हशील? राष्ट्रकुल महासंघाची धोरणे भारतासाठी अवघड रसायन होऊन बसले आहे. यामागे भारतीयांची पदकसंख्या आणखी घटवणे असे राजकारणदेखील असू शकते. कारण, क्रिकेट, हॉकी आणि नेमबाजी हे खेळ महासंघाला मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करून देतात. त्यामुळे खर्चाचे कारण देणे पटण्यासारखे नाही. आता नव्याने समाविष्ट झालेल्या खेळांचा विचार करायचा झाल्यास ॲथलेटिक्स (ट्रॅक अँड फिल्ड), जलतरण, कलात्मक जिम्नॅस्टिक, ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, भारोत्तोलन, मुष्टियुद्ध, ज्युदो, बाउल्स, ३x३ बास्केटबॉल यासारख्या खेळांमध्ये अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, न्यूझीलंड या देशांच्या वर्चस्वाला धक्का लावणे सोपे नाही. शिवाय या खेळांमध्ये भारताच्या पदकाच्या आशा कितपत आहेत, याचाही विचार करावा लागेल. आशियाई क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये भारताने जवळपास प्रत्येक प्रकारात पदक मिळवल्याने यामध्ये भारताच्या पदकाच्या आशा उंचावतील; पण मुष्टियुद्ध, ज्युदो, जलतरण यामध्ये भारताच्या पदकांविषयी ठामपणे सांगता येणार नाही. त्यामुळे एकूणच आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पदक मोहिमेला फार मोठा धक्का लागला आहे.

जागतिक स्तरावर भारताला जर आपले नाणे खणखणीत वाजवायचे असेल तर कुठलेही कारण न देता या खेळांमध्ये लवकरात लवकर पारंगत व्हावेच लागेल, तेव्हा कुठे २०३६ सालची ऑलिम्पिक यजमानपदाची दावेदारी आपण छातीठोकपणे पेश करू शकू. त्यासाठी खेलो इंडिया, विद्यापीठाच्या स्पर्धा किंवा शालेय क्रीडा स्पर्धांमधून आपल्याला अधिकाधिक चांगले खेळाडू घडवावे लागतील. दर्जेदार स्पर्धांचे सातत्याने आयोजन करत राहावे लागेल. यासाठी चीनकडून आपण काही धडे घेऊ शकतो. लंडन ऑलिम्पिक १९४८ ची सांगता झाल्यानंतर चीनने काही काळ मोठ्या स्पर्धांच्या आयोजनापासून स्वत:ला दूर ठेवले आणि या काळात उत्तमोत्तम ॲथलिट आपल्या देशात घडवले. त्याचा परिणाम आता जगासमोर आहे.

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाcricket off the fieldऑफ द फिल्डHockeyहॉकीShootingगोळीबार