शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पारा किती का चढेना; भारत म्हणतो, कोळसा जाळावा लागेलच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 05:56 IST

जागतिक पर्यावरण परिषद - कॉप २८ मध्ये भारताने सुरुवातीला तरी नकारघंटाच कायम ठेवली आहे. ‘भारत काय करणार नाही’ हेच आपण सांगतो आहोत!

प्रियदर्शिनी कर्वे, इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज (आयनेक)

दुबई येथे जागतिक तापमानवाढीवरील अठ्ठाविसाव्या वार्षिक बैठकीचा पहिला आठवडा ६ डिसेंबर रोजी संपला. परिषदेतील वाटाघाटींत सरकारी शिष्टमंडळांबरोबरच जगभरातून विविध समूहांचे प्रतिनिधी निरीक्षक म्हणून असतात, त्यापैकी मीही एक होते. जागतिक तापमानवाढ नियंत्रित न केल्यास पुढच्या दोन-तीन दशकांत आर्थिक-सामाजिक-राजकीय व्यवस्था कोलमडून पडेल. त्यामुळे या परिषदेतील वाटाघाटींत भारत घेत असलेल्या भूमिकेचा तुमच्या-माझ्या रोजच्या जगण्याशी थेट संबंध आहे.

२००० पासून जागतिक तापमानवाढीतील भारताचे वार्षिक सरासरी योगदान जगात तिसरे/चौथे आहे. भारताने पॅरिस करारांतर्गत फारच माफक ध्येय ठेवल्याची टीका सुरुवातीपासून होत होती. पण गेल्या दोनशे वर्षांतल्या एकूण हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचा जेमतेम ३- ४ टक्के वाटा भारताचा असल्याने महत्त्वाकांक्षी ध्येय घेण्याचे काही कारण नाही, ही भारताची भूमिका होती. वीजनिर्मितीमध्ये नूतनक्षम ऊर्जास्रोतांचा टक्का वाढवण्याचे आपण ठरवलेले लक्ष्य वेळेआधीच साध्य केल्याच्या घोषणेकडे या पार्श्वभूमीवर पहायला हवे. 

दोन वर्षांपूर्वी खनिज कोळशाचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करावा, अशा आशयाच्या ठरावात भारताने, एकतर हे सर्व खनिज इंधनांबाबत म्हणा नाहीतर कोळशाचा वापर कमी करावा म्हणा, अशी भूमिका घेऊन ऐनवेळी बदल करणे भाग पाडले होते. खनिज इंधन उत्पादक देशात भरलेल्या या परिषदेत हा विषय परत ऐरणीवर आहे. खनिज इंधनांचा वापर चालूच राहील, इंधनांचे खनन व प्रक्रिया यांमध्ये होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करू, अशी यजमानांसह सर्व इंधन उत्पादक देशांची भूमिका आहे. भारताने आपण कोळशाचा वापर चालूच ठेवू, असे स्पष्ट केले आहे. सर्वच खनिज इंधनांचा वापर टप्प्याटप्प्याने बंद व्हायला हवा, यावर वैज्ञानिकांचे आणि निरीक्षकांचे एकमत आहे. वास्तविक २०४७ पर्यंत भारताची संपूर्ण ऊर्जाप्रणाली नूतनक्षम ऊर्जेवर आधारित बनू शकते, असे अनेक अभ्यास सांगतात. तरीही भारत सरकार कोळशाचा वापर चालू ठेवण्याची भूमिका केवळ मोठ्या कोळसा उत्पादक उद्योजकांच्या दबावामुळे घेत आहे, हे उघडपणे दिसते. पहिल्याच आठवड्यात परिषदेतून आलेल्या दोन जाहीरनाम्यांमध्ये भारत सहभागी नाही. त्यामागेही काही अंशी हा दबाव कारणीभूत आहे.

१ डिसेंबर रोजी १३० देशांच्या वतीने जागतिक अन्ननिर्मितीमधील हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याबाबत जाहीरनामा प्रसृत केला गेला. अन्ननिर्मितीमध्ये खनिज इंधनांच्या वापराचे मोठे योगदान आहे. त्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करून अन्नसुरक्षिततेसाठी तांत्रिक व आर्थिक योगदानाची गरज आहे. भारताने सौरपंपांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून सिंचनासाठी डिझेलचा वापर कमी केला आहे. रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय खते, नैसर्गिक शेती, इ. साठी प्रोत्साहनाच्या योजनाही राबवल्या आहेत. पण तरीही भारत या करारात सहभागी होऊ इच्छित नाही. मोठ्या प्रमाणावर असलेल्या पशुधनामुळे मिथेन उत्सर्जन कमी करण्याचे ध्येय गैरसोयीचे ठरू शकते हे एक कारण असू शकते, पण रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या खनिज इंधन उद्योजकांचा दबावही निश्चितच आहे.

कोविड-१९ मुळे तापमानवाढ आणि आरोग्यावरील संकटे यांमधील संबंध अधोरेखित झाला. आरोग्य यंत्रणांना अखंडित व चांगल्या दर्जाच्या विजेचा पुरवठा आवश्यक आहे. त्यामुळे जगातील आरोग्य यंत्रणा बळकट करत असताना त्यातील हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचा जाहीरनामा ३ डिसेंबरला १२४ देशांतर्फे प्रसृत केला गेला. यातील ध्येय अवास्तव आहेत, असे अधिकृत कारण देऊन भारत यापासून दूर राहिला. पण हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी कोळशापासून वीजनिर्मिती कमी व्हायला हवी, असे जाहीरनाम्यात ठळकपणे म्हटले असल्याने भारताने ही भूमिका घेतली, अशी एकंदर चर्चा आहे.

परिषदेच्या पहिल्याच दिवशी यजमान देशाने आपण जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान यांच्या भरपाईसाठीच्या निधीत योगदान देणार असल्याची घोषणा केली. दुबई, आबूधाबी ही शहरे सोडल्यास संयुक्त अरब अमिरातीचा इतर भाग मागासलेला असल्याने हा देश विकसनशील मानला जातो. पण तरीही त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे लाजेकाजेस्तव जर्मनी, अमेरिका व इतरही विकसित देशांनी आपापले योगदान जाहीर केले. चीन, भारत, इ. इतर सक्षम विकसनशील देशांवरही अप्रत्यक्ष दबाव आहे. अजूनतरी याबाबत भारताकडून काही भाष्य आलेले नाही. एकूणात किमान पहिल्या आठवड्यात तरी भारत तापमानवाढीविरुद्धच्या उपाययोजनांत काय करणार नाही, हेच अधोरेखित झाले आहे!

pkarve@samuchit.com

 

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटIndiaभारत