शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

सरकार खोटारडे आहे, शेतकरी आंदोलन संपलेले नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 09:49 IST

भारतीय किसान युनियनचे उपाध्यक्ष राकेश टिकैत यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या चर्चेचा संपादित अंश.

प्रश्न - देशाच्या इतिहासातले दीर्घ काळ चाललेले शेतकरी आंदोलन आपण केले. तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आपले समाधान झाले काय? - तीन कायदे ही मोठी अडचण तूर्त दूर झाली, परंतु किमान हमीभावासह इतर अनेक मुद्दे अनिर्णितच  आहेत. प्रश्न - हमीभावाबाबत समिती स्थापन करण्यासाठी सरकारने नावे मागितली आहेत. आपण ती देत का नाही? - सरकारने ना समितीचे नाव ठरविले, ना अध्यक्ष वा सदस्य संख्या. कार्यकाळाचा पत्ता नाही, ना विषय माहिती. आम्ही सरकारच्या थापांना फसणार नाही. दोन सदस्यांची नवे आमच्याकडे मागितली, पण ८ सदस्यांत दोन आमचे असतील, तर आमचे म्हणणे ऐकले कसे जाईल?प्रश्न - सरकारचे म्हणणे आहे की, त्यांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ केलाय आणि आता दुप्पट करणार आहेत.- सगळे खोटे. सरकारने ‘ए २ प्लस एफ एल’ दिले आहे. स्वामीनाथन समितीच्या अहवालात ‘सी २ प्लस ५०’चे सूत्र होते. सरकारने उत्पादन खर्चाच्या हिशेबात शेतकऱ्यांची मजुरी जमेस धरली नाही, तसेच जमिनीचे भाडेही. एखादे दुकान, घरभाडे न देता मिळेल काय? मग शेतकऱ्यांच्या जमिनीचे भाडे सरकार का गृहीत धरत नाही?प्रश्न - आपण उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला धडा शिकवायचे ठरविले होते, त्याचे काय झाले?- आम्ही ना निवडणूक लढविली, ना कोणाला पाठिंबा दिला वा विरोध केला. आमच्या आंदोलनात सर्व विचारधारांचे लोक होते आणि भाजपची यंत्रणा निवडणुका कशी जिंकते, हे तुम्हाला माहीत नाही का? प्रश्न - मोठ्या उद्योग घराण्यांच्या कृषी व्यापारावर बंदी आणण्याची भूमिका आपण घेतली, पण आज शेतकरी त्यांच्या भांडारगृहासमोर धान्य विकण्यासाठी रांगा लावत आहेत... शेतकरी आपले ऐकत नाहीत का? - सरकार बाजार समित्या बंद करत असल्याने हे घडते आहे. मध्य प्रदेशात १८२ समित्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हरयाणा आणि पंजाबात शेतकऱ्यांचे धान्य नाकारले जाते. देशात लोकसंख्येच्या ६५ टक्के शेतकरी असताना हे सरकार ती संख्या कमी करू पाहतेय... जिथे पैसा मिळेल, तिथे शेतकरी माल विकेल. नाईलाज आहे. हवेत प्राणवायू मोफत मिळतो, पण कोरोना काळात श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यावर लोकांनी चढ्या भावात प्राणवायू खरेदी केलाच ना?प्रश्न - जमिनीचे तुकडे पडल्याने शेतकरी तोट्यात जातो, म्हणून सहकारी समिती स्थापून किंवा मोठ्या उद्योगांना जमीन भाड्याने देऊन शेती फायद्याची करता येईल का? शेतकऱ्यांनी आपली जमीन विकावी, असे सरकारला वाटते तर आहे. असे अनेक अहवाल आले आहेत की, सरकार ६५ टक्के शेतकरी संख्या २५ टक्क्यांवर आणू इच्छिते. म्हणजे ४० टक्क्यांनी आपल्या जमिनी विकून टाकाव्यात, पण नंतर शेतकऱ्यांनी पोट कसे भरावे, हे सरकार सांगत नाही.प्रश्न - मग यावर तोडगा काय? - जोवर शेतीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन दिले जात नाही आणि ग्रामीण विकास होत नाही, तोवर परिस्थिती बदलणार नाही. तेलंगणा सरकार शेतकऱ्याला एकरी १० हजार देत आहे. जगभर शेतकऱ्याना अनुदान दिले जाते. मग आपल्याकडे का नाही? सरकार ब्राझील मॉडेल आणू पाहतेय. जेथे २८५ लोकांकडे ८० टक्के जमीन आहे. तिथले बहुतेक शेतकरी उद्ध्वस्त झालेत.प्रश्न - विदर्भ, मराठवाडा, बुंदेलखंड अशा क्षेत्रांत शेतीवर संकट आहे. आपण त्यांचे मुद्दे का मांडत नाही? - या सर्व क्षेत्रांत पाण्याचे संकट आहे. लाभदायी भाव मिळत नाही. परिणामी, शेतकरी कर्ज फेडू शकत नाही. आत्महत्या करतात. शेतकरी संघटना आणखी मजबूत होईल, तेव्हा त्यांचेही प्रश्न मांडू.प्रश्न - कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करण्याचा मध्य प्रदेश सरकारचा प्रस्ताव आहे...- हे दु:खद आहे. शेतकऱ्यांकडून शेती काढून घेण्याचे मार्ग सरकार शोधत आहे. राजस्थानात एका शेतकऱ्याचे ७ लाखांचे कर्ज वसूल करण्यासाठी पक्क्या घरासह त्याची सुमारे १० एकर जमीन लिलाव करून ४० लाख मिळविले. आम्ही शेतकरी संघटना मध्यस्थी घालून शेतकऱ्याला जमीन परत मिळवून दिली.प्रश्न - शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार का?- आमचे आंदोलन  संपलेले नाही. सरकार काय करतेय ते आम्ही पाहत आहोत... लवकरच निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी