शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पाकिस्तानचा ‘चेहरा’ बदलतो आहे, त्याची गोष्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 08:46 IST

गेल्या दोन दशकांत पाकिस्तानात मध्यमवर्गाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हा वर्ग देशाचा सामाजिक-सांस्कृतिक चेहरा बदलायला हातभार लावील, असे दिसते!

- जावेद जब्बार, ख्यातनाम पत्रकार, कराचीसंस्कृती, समाज आणि सरकार-  गेल्या ७५ वर्षांत पाकिस्तानने तिन्हींच्या बाबतीत दोन टोकांमधला प्रवास अनुभवला आहे. स्वातंत्र्याच्या वेळी पश्चिम पाकिस्तान मेहगडपासून सुरू होऊन नंतर मोहंजोदारोपर्यंत विस्तारलेल्या ७५०० वर्षांच्या संस्कृतीशी जोडले गेले होते.  पूर्वेकडे मौर्य साम्राज्याशी जोडली गेलेली आणि इतर संस्कृतींची संवादी अशी संस्कृती होती.

ऑगस्ट १९४७ आणि नंतर ४९ मध्ये झालेल्या मोठ्या स्थलांतरामुळे आधीच समृद्ध असलेल्या देशपटलावर नवे प्रवाह दाखल झाले. दोन्ही हिस्से प्राय: मुस्लिम होते आणि भाषिक वैविध्य त्यात मोठ्या प्रमाणावर होते. सत्तरहून अधिक भाषा आणि डझनावर बोलीभाषा आज देशात कानावर पडतात. वैविध्य, उत्स्फूर्तता आणि गोंधळ असे मिश्रण असलेल्या या देशाच्या उत्क्रांतीचे दोन भाग पडतात. १९४७ ते १९७१ ही पहिली २४ वर्षे आणि १९७२ ते २०२२ ही पुढची पन्नास वर्षे. पहिल्या २४ वर्षांत दोन्ही पाकिस्तानी संस्कृतींच्या मिलाफाचे प्रयत्न झाले. हे करताना प्रदेशांचे, प्रांतांचे सांस्कृतिक वैविध्य नजरेआड केले गेले.  आधुनिक देशाचा जन्म झाल्यापासूनच  सुरक्षा आणि स्थैर्य याला प्राधान्य द्यावे लागले. त्यासाठी अंतर्गत सलोखा आवश्यक होता, त्यासाठी समानता गरजेची आहे, असा चुकीचा अर्थ लावला जाऊन ‘ब्युरो ऑफ नॅशनल इंटिग्रेशन’सारखे मंच तयार झाले. ज्यांनी एकसारखेपणावर अतिरेकी भर दिला.  

जनरल झिया यांच्या अकरा वर्षांच्या इस्लामी राजवटीत लष्कराकडे सूत्रे जाऊन बऱ्याच सामाजिक उलथापालथी झाल्या. पत्रकारांचा, बुद्धिमंत्ताचा, स्पष्टवक्त्या महिलांचा छळ होऊ लागला. माध्यमातून त्यांची हकालपट्टी झाली. पुढे बेनझीर पंतप्रधान झाल्यावर आशेची काही किरणे दिसू लागली. नवाज शरीफ यांच्या काळातही परिस्थिती बरी होती. परवेज मुशर्रफ यांची धोरणे झियांच्या अगदी उलटी, उदारमतवादी, सांस्कृतिक स्वातंत्र्य देणारी होती. सर्व कायदेमंडळात त्यांनी महिलांसाठी राखीव जागा वाढवल्या. इलेक्ट्रॉनिक माध्यमात खासगी गुंतवणूक येऊ दिली. २००५ साली कराचीत नॅशनल अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना झाली. सांस्कृतिक विकासात सरकार योगदान देऊ शकते, हे दिसून आले. त्यांच्या नंतरच्या काळात आलेल्या सरकारने काही जुजबी बदल वगळता धोरणात ढवळाढवळ केली नाही.

गेल्या दोन दशकांत पाकिस्तानात मध्यमवर्गाची वाढ झाली आहे. या वर्गात  सुखलोलुपता दिसते. या वर्गात नवे ज्ञान, तंत्रज्ञान बदल यांना सन्मुख नसणारा मध्ययुगातील इस्लामसारखा एक प्रवाह आहे. तो बुरख्याचा पुरस्कार करतो. कुटुंबनियोजन त्याला मान्य नाही. दुसरा प्रवाह आधुनिक आणि  धर्मनिरपेक्ष आहे. जुने सर्व वाईटच आहे, असेही तो म्हणत नाही. माध्यमे, नागरी समाज, लष्कर, खासगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, विद्यापीठे, कायदा अशा बाबतीत आधुनिक दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी तो आग्रही आहे. समाजात आळस, ओंगळपणा, धर्मावर खुलेपणाने चर्चा करण्यात भावनिक असमर्थता, बेशिस्त, स्त्रीद्वेष, महिला व बालकांच्या हक्कांची पायमल्ली, बिगर मुसलमानांबाबत असंवेदनशीलता, पर्यावरणाविषयी उदासीनता असे काही दोषही शिरलेले दिसतात. त्याचबरोबर काही सकारात्मक बाजूही आहेत. त्यात असामान्य सहानुभाव, मित्रत्व, आतिथ्यशीलता, लोकशाहीस अनुकूल मनोवृत्ती, नवीन जीवनशैली स्वीकारण्याची तयारी, कितीही अडचणी दिसत असल्या तरी उद्याचा दिवस आजच्यापेक्षा चांगला असेल, यावर विश्वास ठेवणे या काही जमेच्या बाजू होत.  पाकिस्तानच्या विशाल इतिहासाचा हा काही अंश झाला. येणाऱ्या काळात ही वैशिष्ट्ये समाजमनात आणखी मुरत जातील आणि सांस्कृतिक परिपक्वता येईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान