शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

देशाला आता ‘पुढे’ पाहावे लागेल, ‘मागे’ नव्हे; काँग्रेस हाच प्रमुख विरोधी पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 09:42 IST

खरे तर आता इतिहासात डोकावत राहण्यापेक्षा भविष्याचा विचार, नियोजन आणि आखणी करणे, त्याचबरोबर ‘पुढे पाहणे’ अधिक महत्त्वाचे आहे, असे मी मानतो!

शशी थरूर, खासदार, ज्येष्ठ काँग्रेस नेते

मी अनेक लोकांना विचारत असतो, तुम्हाला गेल्या आठ वर्षांतील मोदी सरकारच्या राजवटीतून काय लाभ झाला? मुंबईत एका कार्यक्रमावेळी मोठी गर्दी होती; तेव्हाही मी हा प्रश्न विचारला होता. फक्त एकट्यानेच ‘हो, मला फायदा झाला’- असे उत्तर दिले. उर्वरितांनी नाही. मोदी सरकारच्या काळात महागाई चहूबाजूंनी वाढली. तेल, डाळीसह स्वयंपाकाचे पदार्थ व वस्तू, तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले. महागाईबाबत लोकांना राग आहे आणि येत्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस हाच लोकांना महत्त्वाचा पर्याय वाटतो. 

केवळ एकटा काँग्रेस पक्ष मोदींच्या भाजपला टक्कर देऊ शकेल काय असा प्रश्न मला माध्यमांकडून विचारला जातो. मी म्हणेन, लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध काँग्रेस हाच प्रमुख पक्ष असेल. देशभर काँग्रेस पसरलेली आहे. अनेक राज्यांत काँग्रेसकडे सत्ता नसली तरी, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच आहे. काही राज्यांत अन्य प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत. अशा मजबूत प्रादेशिक पक्षांसोबत लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसला जागांबाबत समझोता करावा लागेल.  विविध राज्यांमध्ये समविचारी व बलवान पक्ष हेरून त्यांच्याशी काँग्रेसने राज्यनिहाय समझोता केला तर ते लाभदायी ठरेल.

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ने काँग्रेसच्या केडरमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. भारत जोडो यात्रेला सगळीकडे प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. विविध स्तरांवरील लोक या पदयात्रेत सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांचा खरा, सतेज चेहरा या यात्रेतून पुढे आला. राहुल गांधी यांची चुकीची प्रतिमा भाजपसारख्या विरोधकांनी गेल्या काही वर्षांत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारत जोडो यात्रेद्वारे खूप प्रभावी असे राहुल गांधी पुढे आले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेगळीच ऊर्जा व उत्साह यात्रेद्वारे प्राप्त झाला आहे. राहुल गांधी यात्रेत अखंडपणे चालतात. शिवाय प्रत्येक ठिकाणी ते लोकांशी संवाद साधतात आणि प्रत्येक दिवशी ते लोकांचे वेगळे विषय घेऊन बोलतात. प्रत्येक भागात वेगळे प्रश्न असतात, त्या प्रश्नांवर राहुल बोलताना पाहायला मिळतात. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून काँग्रेसला जबरदस्त बळ मिळवून दिले आहे हे मान्य करावे लागेल.

महाराष्ट्रात यात्रा होती तेव्हा सावरकरांविषयी बोलण्याची गरज होती काय असा प्रश्न येऊ शकतो; पण त्यांना कुणी प्रश्न केल्यामुळे किंवा अन्य कारणास्तव बोलावे लागले काय हे मला ठाऊक नाही. मला त्याबाबतची पार्श्वभूमी ठाऊक नाही. महाराष्ट्रात असताना राहुल गांधी सावरकरांविषयी का व्यक्त झाले याचे कारण किंवा त्यावेळची नेमकी स्थिती, त्यांच्या विधानाचा नेमका संदर्भ मला ठाऊक नाही. त्यांनी स्वत:हून विषय काढला की, अन्य कुणीतरी विषय उपस्थित केला म्हणून त्यांना प्रतिक्रिया द्यावी लागली, हेही मला ठाऊक नाही. महाराष्ट्रात सावरकरांविषयी वेगळी जनभावना आहे हे मी जाणतो. शिवाय राहुल गांधी यांची सावरकरांविषयीची मते  देशाला ठाऊक आहेत. त्यांनी पुन्हा त्या विषयाला स्पर्श करणे गरजेचे होते काय, असा मुद्दा येऊ शकतो; पण मी वर म्हटल्याप्रमाणे मला पार्श्वभूमी ठाऊक नाही. खरे तर आता इतिहासात डोकावत राहण्यापेक्षा भविष्याचा विचार, नियोजन आणि आखणी करणे अधिक महत्त्वाचे आहे असे मी मानतो. आज कधी नव्हती एवढी देशाला पुढे पाहण्याची गरज आहे!

(शब्दांकन : सद्गुरू पाटील, संपादक, लोकमत, गोवा)

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी