शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

नेतृत्वाची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 12:40 IST

जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली ही स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुरेपूर प्रयत्न चालविले आहेत.

 - मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिका निवडणुकीसाठी  मतदान होत आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली ही स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुरेपूर प्रयत्न चालविले आहेत. ३५ वर्षांपासून या संस्थेवर हुकमी राज्य करणाऱ्या शिवसेनेच्या सुरेशदादा जैन यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. भाजपाने केंद्र व राज्य सरकारमधील सत्तेचा उपयोग करीत २०० कोटी रुपये जळगाव शहराच्या विकासासाठी आणणार असल्याची ग्वाही मतदारांना दिलेली आहे. त्यासोबतच जळगाव महापालिका कर्जबाजारी होण्यासाठी आणि विकास कामे न होण्यासाठी सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीला जबाबदार धरले आहे. भाजपाच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिवसेनेने २५ कोटी रुपयांचा मुद्दा चांगलाच तापविला आहे. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिलेल्या विशेष निधीमध्ये भाजपाच्या आमदारांनी आडकाठी आणल्याने एक पैसाही खर्च झाला नसल्याचे सेना ठासून सांगत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मदतीपेक्षा महापालिका स्वबळावर शहराचा विकास करु शकते, असा विश्वास सेनेने व्यक्त केला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची चाचपणी दोन्ही पक्षांकडून केली जात आहे. लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपाकडे असल्या तरी सेनेने स्वबळाचे रणशिंग फुंकल्यास त्याची पूर्वतयारी या निवडणुकीच्या माध्यमातून केली जात आहे. सेनेने संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याची सूचना केली असून ते यानिवडणुकीत सक्रीय आहे. भाजपाचे खासदार आणि जळगावचे आमदारदेखील या निवडणुकीच्या माध्यमातून ‘संपर्क से समर्थन तक’ अभियान राबवित आहे. भाजपाचा जिल्ह्याचा नेता कोण याचा फैसलादेखील या निवडणूक निकालासोबत होणार आहे. आजपर्यंत एकनाथराव खडसे हे निर्विवाद नेते होते. परंतु गैरव्यवहाराच्या आरोपामुळे मंत्रिपद गमवावे लागलेल्या खडसे यांच्यामागे आरोप, याचिका आणि चौकशांचे शुक्लकाष्ट लागले, ते अद्याप कायम आहे. त्यामुळे खडसे यांना या निवडणुकीपासून भाजपाने खड्यासारखे दूर ठेवले. शेवटच्या चार दिवसात समर्थक सहा उमेदवारांच्या प्रचारासाठी केवळ खडसे मैदानात उतरले. परंतु इतर वेळी त्यांनी भाजपा नेतृत्व आणि महाजन यांच्या कार्यशैलीवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. केंद्र व राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भाजपा-शिवसेनेमधील या लढतीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. भाजपाच्या दिग्वीजयी रथाला रोखण्याचे काम मुंबई, नांदेड आणि नंदुरबार या पालिका निवडणुकीमध्ये झाले होते, त्याची पुनरावृत्ती जळगावात होते काय किंवा नाशिक, पिंपरी चिंचवड, लातूर, पुणे पालिकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात यश मिळालेल्या भाजपाचे हे स्वप्न जळगावात पूर्ण होते काय, याविषयी उत्सुकता आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव