शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नेतृत्वाची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 12:40 IST

जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली ही स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुरेपूर प्रयत्न चालविले आहेत.

 - मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिका निवडणुकीसाठी  मतदान होत आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली ही स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुरेपूर प्रयत्न चालविले आहेत. ३५ वर्षांपासून या संस्थेवर हुकमी राज्य करणाऱ्या शिवसेनेच्या सुरेशदादा जैन यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. भाजपाने केंद्र व राज्य सरकारमधील सत्तेचा उपयोग करीत २०० कोटी रुपये जळगाव शहराच्या विकासासाठी आणणार असल्याची ग्वाही मतदारांना दिलेली आहे. त्यासोबतच जळगाव महापालिका कर्जबाजारी होण्यासाठी आणि विकास कामे न होण्यासाठी सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीला जबाबदार धरले आहे. भाजपाच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिवसेनेने २५ कोटी रुपयांचा मुद्दा चांगलाच तापविला आहे. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिलेल्या विशेष निधीमध्ये भाजपाच्या आमदारांनी आडकाठी आणल्याने एक पैसाही खर्च झाला नसल्याचे सेना ठासून सांगत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मदतीपेक्षा महापालिका स्वबळावर शहराचा विकास करु शकते, असा विश्वास सेनेने व्यक्त केला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची चाचपणी दोन्ही पक्षांकडून केली जात आहे. लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपाकडे असल्या तरी सेनेने स्वबळाचे रणशिंग फुंकल्यास त्याची पूर्वतयारी या निवडणुकीच्या माध्यमातून केली जात आहे. सेनेने संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याची सूचना केली असून ते यानिवडणुकीत सक्रीय आहे. भाजपाचे खासदार आणि जळगावचे आमदारदेखील या निवडणुकीच्या माध्यमातून ‘संपर्क से समर्थन तक’ अभियान राबवित आहे. भाजपाचा जिल्ह्याचा नेता कोण याचा फैसलादेखील या निवडणूक निकालासोबत होणार आहे. आजपर्यंत एकनाथराव खडसे हे निर्विवाद नेते होते. परंतु गैरव्यवहाराच्या आरोपामुळे मंत्रिपद गमवावे लागलेल्या खडसे यांच्यामागे आरोप, याचिका आणि चौकशांचे शुक्लकाष्ट लागले, ते अद्याप कायम आहे. त्यामुळे खडसे यांना या निवडणुकीपासून भाजपाने खड्यासारखे दूर ठेवले. शेवटच्या चार दिवसात समर्थक सहा उमेदवारांच्या प्रचारासाठी केवळ खडसे मैदानात उतरले. परंतु इतर वेळी त्यांनी भाजपा नेतृत्व आणि महाजन यांच्या कार्यशैलीवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. केंद्र व राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भाजपा-शिवसेनेमधील या लढतीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. भाजपाच्या दिग्वीजयी रथाला रोखण्याचे काम मुंबई, नांदेड आणि नंदुरबार या पालिका निवडणुकीमध्ये झाले होते, त्याची पुनरावृत्ती जळगावात होते काय किंवा नाशिक, पिंपरी चिंचवड, लातूर, पुणे पालिकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात यश मिळालेल्या भाजपाचे हे स्वप्न जळगावात पूर्ण होते काय, याविषयी उत्सुकता आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव