शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यावर दहशतवादी सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:14 IST

एटीएसने पुण्यात अल्-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना नुकतेच पकडले अन् पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे पुणे कनेक्शन उघड झाले. याआधी इंडियन मुजाहिदीन, पाकिस्तानच्या आयएसआयशी संपर्क असणाऱ्यांचे जाळे पुण्यात असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

एटीएसने पुण्यात अल्-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना नुकतेच पकडले अन् पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे पुणे कनेक्शन उघड झाले. याआधी इंडियन मुजाहिदीन, पाकिस्तानच्या आयएसआयशी संपर्क असणाऱ्यांचे जाळे पुण्यात असल्याचे स्पष्ट झालेले आहे. विद्येचे माहेरघर, पेन्शनरांचे शहर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या दोन दशकांत झपाट्याने बदल झाले. १९९२मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांद्वारे पहिले दहशतवादी हल्ले झाले. त्यानंतर स्थलांतरित होणाºया मध्यमवर्गीयांचे शांत शहर असलेल्या पुण्यात स्थायिक होण्याचा कल वाढला. कोथरूडसारखे उपनगर अल्पावधीत वेगाने विकसित होण्याचा विक्रम झाला. मुंबईखालोखाल पुण्यात रोजगारासाठी स्थलांतरितांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. त्यात परप्रांतीय, बांगलादेशींची संख्या मोठी होती. कालांतराने पुण्याची शांतता धोक्यात आली. २००८मध्ये कोंढवा भागातील एका सदनिकेत मीडिया सेलद्वारे देशभरातील तरुणांची माथी भडकवली जात असल्याचे कारवाईद्वारे उघड झाले. देशभरातील बॉम्बस्फोटांचा सूत्रधार रियाझ भटकळचा पुण्यात वावर असल्याचे या वेळी उघड झाले होते. पुण्यात आणि देशात अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांत कोंढव्यातील मोहसीन चौधरीचा हात असल्याचा तपास अद्याप सुरू आहे. २०१०मध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाने पुणेच नव्हे, तर देश हादरला. त्यात १७ जण ठार, तर ५३ हून अधिक जखमी झाले. यात रियाझ-यासीन भटकळ यांचा हात होता. त्यानंतर जंगली महाराज रस्त्यावर काही अंतराने बॉम्बस्फोट झाले; पण त्यात काही तांत्रिक चूक राहिल्याने ते फसले. अन्यथा, हे शक्तिशाली स्फोट झाले असते तर मोठी जीवित-वित्तहानी झाली असती. त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवला गेला. पुण्यात नक्षलवाद्यांचे स्लीपर सेल असल्याचेही पोलिसांनी याआधी सांगितले आहे. शहरालगतच्या गावांतून नक्षलवादी चळवळीशी संबंधितांना एटीएसने यापूर्वी पकडले होते. आता यात बांगलादेशी घुसखोरांची भर पडली आहे. अटक झालेले तीन बांगलादेशी नागरिक मजूर असल्याचा बहाणा करीत होते; मात्र प्रत्यक्षात दहशतवादी कारवायांसाठी पैसे उभारणे, आवश्यक जाळे तयार करणे ही कामे ते करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहेच; त्याचबरोबर आपण समस्त सुज्ञ पुणेकरांनी सलोखा राखून सावधता बाळगावी. पुतळे, अस्मिता, जातीय-धर्मीय अभिनिवेश बाजूला ठेवून अहोरात्र जागरूक राहणे, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :Terrorismदहशतवाद