शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

पुण्यावर दहशतवादी सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:14 IST

एटीएसने पुण्यात अल्-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना नुकतेच पकडले अन् पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे पुणे कनेक्शन उघड झाले. याआधी इंडियन मुजाहिदीन, पाकिस्तानच्या आयएसआयशी संपर्क असणाऱ्यांचे जाळे पुण्यात असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

एटीएसने पुण्यात अल्-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना नुकतेच पकडले अन् पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे पुणे कनेक्शन उघड झाले. याआधी इंडियन मुजाहिदीन, पाकिस्तानच्या आयएसआयशी संपर्क असणाऱ्यांचे जाळे पुण्यात असल्याचे स्पष्ट झालेले आहे. विद्येचे माहेरघर, पेन्शनरांचे शहर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या दोन दशकांत झपाट्याने बदल झाले. १९९२मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांद्वारे पहिले दहशतवादी हल्ले झाले. त्यानंतर स्थलांतरित होणाºया मध्यमवर्गीयांचे शांत शहर असलेल्या पुण्यात स्थायिक होण्याचा कल वाढला. कोथरूडसारखे उपनगर अल्पावधीत वेगाने विकसित होण्याचा विक्रम झाला. मुंबईखालोखाल पुण्यात रोजगारासाठी स्थलांतरितांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. त्यात परप्रांतीय, बांगलादेशींची संख्या मोठी होती. कालांतराने पुण्याची शांतता धोक्यात आली. २००८मध्ये कोंढवा भागातील एका सदनिकेत मीडिया सेलद्वारे देशभरातील तरुणांची माथी भडकवली जात असल्याचे कारवाईद्वारे उघड झाले. देशभरातील बॉम्बस्फोटांचा सूत्रधार रियाझ भटकळचा पुण्यात वावर असल्याचे या वेळी उघड झाले होते. पुण्यात आणि देशात अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांत कोंढव्यातील मोहसीन चौधरीचा हात असल्याचा तपास अद्याप सुरू आहे. २०१०मध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाने पुणेच नव्हे, तर देश हादरला. त्यात १७ जण ठार, तर ५३ हून अधिक जखमी झाले. यात रियाझ-यासीन भटकळ यांचा हात होता. त्यानंतर जंगली महाराज रस्त्यावर काही अंतराने बॉम्बस्फोट झाले; पण त्यात काही तांत्रिक चूक राहिल्याने ते फसले. अन्यथा, हे शक्तिशाली स्फोट झाले असते तर मोठी जीवित-वित्तहानी झाली असती. त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवला गेला. पुण्यात नक्षलवाद्यांचे स्लीपर सेल असल्याचेही पोलिसांनी याआधी सांगितले आहे. शहरालगतच्या गावांतून नक्षलवादी चळवळीशी संबंधितांना एटीएसने यापूर्वी पकडले होते. आता यात बांगलादेशी घुसखोरांची भर पडली आहे. अटक झालेले तीन बांगलादेशी नागरिक मजूर असल्याचा बहाणा करीत होते; मात्र प्रत्यक्षात दहशतवादी कारवायांसाठी पैसे उभारणे, आवश्यक जाळे तयार करणे ही कामे ते करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहेच; त्याचबरोबर आपण समस्त सुज्ञ पुणेकरांनी सलोखा राखून सावधता बाळगावी. पुतळे, अस्मिता, जातीय-धर्मीय अभिनिवेश बाजूला ठेवून अहोरात्र जागरूक राहणे, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :Terrorismदहशतवाद