शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘पेन्शन’चे टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:08 IST

उतारवयात पेन्शन हा निवृत्त कर्मचाऱ्याचा उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असतो.

उतारवयात पेन्शन हा निवृत्त कर्मचाऱ्याचा उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असतो. ज्याची पेन्शन सुरू त्याला कशाचेही टेन्शन नसते. काही पेन्शनधारकही गर्वाने ही बाब सांगतात. मात्र सध्या डिजिटलायझेशनच्या नावावर पेन्शनधारकांची फरपट सुरू आहे. शासकीय यंत्रणेत डिजिटलायझेशनवर सरकारचा भर आहे. त्याला कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. मात्र डिजिटलायझेशनच्या नावावर वृद्धांचा आधार हिरावून घेणे, ही निश्चित चिंतेची बाब आहे. संसदेत थोडी वर्षे सेवा देणाºया खासदारांना पेन्शन नियमित मिळते. मात्र ३० ते ३५ वर्षे सेवा करणाºयांना सध्या पेन्शनसाठी संघर्ष करावा लागतो आहे. अशासकीय कर्मचाºयांना केवळ हजार रुपये पेन्शन मिळते. आधीच कमी पेन्शन, वरून डिजिटलायझेशनच्या नावाखाली वृद्ध पेन्शनर्सना प्रकृती साथ देत नसताना जीवन प्रमाणपत्र, आधार लिंक आदींसाठी स्वत:च्या खर्चाने ईपीएफओ कार्यालयाच्या खेटा घालाव्या लागतात. तरीही काम होत नाही. वारंवार बोलावले जाते. म्हातारपणात सुद्धा संघर्ष करावा लागतो आहे. वृद्धांना सहानुभूती देण्याऐवजी अधिकाधिक कसा त्रास होईल, याचाच प्रयत्न शासन-प्रशासन करीत असल्याचा आरोप सध्या होतो आहे. कर्मचारी भविष्य निधी नागपूर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १ लाख २४ हजार ५७९ पेन्शनर्स येतात. यापैकी ११ हजार १६५ पेन्शनर्सची गेल्या काही महिन्यांपासून पेन्शन रोखण्यात आली आहे. कारण काय तर भविष्यनिधी कार्यालयाशी टायअप करणाºया बँकांनी जीवन प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली. ही स्थिती राज्यातील इतर भागातही आहे. केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निधीचे काम डिजिटल केले आहे. त्यामुळे भविष्य निधी कार्यालयाचा बँकांशी होणारा व्यवहार आता आॅनलाईन झाला आहे. कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाशी स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक व सेंट्रल बँक आॅफ इंडिया या बँका जुळल्या आहेत. गावाखेड्यातील सेवानिवृत्त कर्मचारी या बँकेच्या त्या-त्या जिल्ह्यातील शाखेतून पेन्शन प्राप्त करतात. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कर्मचाºयांच्या जीवन प्रमाणपत्रासाठी आधार लिंक केले आहे. कर्मचाºयांचा आधार नंबर लिंक झाल्यावर कर्मचाºयांना जीवनप्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्रासाठी भविष्य निधीच्या केंद्रीय कार्यालयाने प्रत्येक बँकेला त्यासाठी सेटअप तयार करण्याचे सांगितले होते. परंतु यासाठी बहुतांश बँकांनी हात वर केले. एकीकडे सरकारी बँका तोट्यात जात असताना त्या नफ्यात कशा येतील यावर मंथन होण्याऐवजी पेन्शनधारकांना मात्र सतराशेसाठ नियम सांगितले जातात. ही निश्चितच लाजिरवाणी बाब आहे. महागाईने जनसामान्यांचे कंबरडे मोडले असताना हजार रुपये पेन्शन मिळविण्यासाठी वृद्ध पेन्शनधारकांना ईपीएफओ कार्यालयाच्या या चक्रातून मुक्ती देण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का ?

टॅग्स :MONEYपैसा