शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

घरातल्या तरुण मुला-मुलींशी तातडीने ‘एवढे’ बोलाच..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 09:20 IST

१८ ते १९ वयोगटातील महाराष्ट्रातील साधारण ४३ लाख तरुणांपैकी केवळ आठ लाखांनीच मतदार यादीत नाव नोंदवले आहे ! बाकीची ३५ लाख मुले गेली कुठे?

- डॉ. हमीद दाभोलकर(कार्यकर्ता, महा अंनिस)२०२४च्या निवडणुकीच्या निमित्ताने अद्ययावत केलेल्या महाराष्ट्रातील मतदार आकडेवारीमधून लोकशाहीच्या तब्बेतीसाठी चिंताजनक वाटावी अशी एक गोष्ट समोर आली आहे. १८ ते १९ वयोगटातील महाराष्ट्रातील साधारण ४३ लाख तरुणांपैकी केवळ आठ लाख तरुणांनीच मतदार यादीत त्यांचे नाव नोंदवले आहे! टक्केवारीचा विचार करता, हे प्रमाण वीस टक्क्यांपेक्षा कमी भरते. 

लोकशाहीत नागरिक म्हणून मतदान करणे या मूलभूत कर्तव्याविषयी तरुणाई इतकी उदासीन आहे, हे अस्वस्थ करणारे वास्तव! समाजातील सर्व लोकांच्या सहभागातून निर्माण होणारी रसरशीत लोकशाही आपल्या समाजात असावी, अशी इच्छा असलेल्या प्रत्येकाने याचा गांभीर्याने विचार करायला हवा. मुळात आपल्या तरुणांमध्ये ही उदासीनता निर्माण का झाली? 

- एक महत्त्वाचे आणि सहज दिसून येणारे कारण म्हणजे राजकारणाचा अत्यंत खालावलेला स्तर. गेली काही वर्षे राजकारणाच्या माध्यमातून समाजात काही सकारात्मक घडत असल्याचा अनुभव जवळजवळ नाहीच. रोज एकमेकांवर गलिच्छ भाषेत केलेली आगपाखड, धर्म, जात आणि प्रांताच्या इतिहासावरून उकरून काढलेले अस्मितेचे झगडे हे सगळे उबग येणारे आहे. त्यामुळे  सज्जन लोक निवडणुकीत उभे राहण्यापासून दूर झाले; आता तरुण पिढीला तर मतदार होणेही नकोसे झाले आहे का, अशी शंका  निर्माण होते. गेल्या काही वर्षांत “लोकशाहीऐवजी या देशाला एखादा हुकूमशहाच पाहिजे”, अशी जी कुजबुज कॅम्पेन आपल्या समाजात केली जात आहे, त्याची पार्श्वभूमीदेखील या गोष्टीला आहे, हे विसरता येणार नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पोलिस आणि न्यायव्यवस्थेकडून नैसर्गिक न्याय मिळण्याची शक्यता झपाट्याने कमी होणे. सध्याच्या  यंत्रणेमध्ये तुमच्याकडे पैसे किंवा सत्ता यापैकी काहीतरी एक असल्याशिवाय न्याय मिळणे जवळजवळ अशक्य  अथवा अत्यंत त्रासाचे असल्याची सार्वत्रिक भावना आहे. अशा वातावरणात कशाला नोंदवायचे मतदार यादीत नाव ? मत देऊन तरी काय फरक पडणार आहे? - अशा मानसिकतेमधूनदेखील वरील परिस्थिती उद्भवलेली असू शकते.

खरे तर ज्या गोष्टींना वयाची मर्यादा घातलेली आहे, अशा गोष्टी कधी एकदा करतो, अशी तरुण मुलांची मानसिकता असते. उदाहरणार्थ, गाडी चालवण्याचे वय, मद्य पिण्यासाठीचे वय, लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठीचे / लग्नाचे वय.. पण मतदार होणे आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पडायला लागणे ह्या बाबतीत मात्र एकदम उलटी परिस्थिती दिसून येते.

जयप्रकाश नारायण एकदा म्हणाले होते, ‘स्वातंत्र्याची सगळ्यात मोठी किंमत म्हणजे सतत बाळगावी लागणारी सजगता होय!’’. नागरिक म्हणून आपण सजग राहिलो नाही, तर आपले स्वातंत्र्य आपण कोणातरी दुसऱ्याच्या दावणीला बांधत असतो, हे आपण समजून घ्यायला हवे.अठराव्या वर्षी अचानक या सर्व गोष्टींचा साक्षात्कार आपल्या मुलांना होईल, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. त्यासाठी नागरिकशास्त्राच्या अभ्यासात बदल करणे, भाषा - गणित -विज्ञान अशा विषयांइतकेच महत्त्व नागरिकशास्त्राला देणे आवश्यक आहे. या विषयाचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, हे  मुलांना समजून सांगणेही आवश्यक आहे. 

महा अंनिसमार्फत चालवल्या जाणाऱ्या विवेकवाहिनीचे ब्रीदवाक्य आहे : ‘आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच, पण कर्तव्य आधी’. आपण केवळ हक्कांविषयी बोलत राहिलो आणि नागरिक म्हणून आपले मूलभूत कर्तव्य बजावायचे विसरलो, तर लोकशाहीचा गाडा  पुढे जाऊ शकत नाही, ही साधी गोष्ट समाज म्हणून आपण विसरता कामा नये. निवडणूक आयोगासारख्या सरकारी यंत्रणांना नागरिकांनीही बळ देणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मतदार यादीतील नाव नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी करण्याचे प्रयत्नही गरजेचेच! मतदार नोंदणी ही जबाबदार नागरिक होण्याच्या प्रक्रियेमधील पहिली पायरी आहे. अधिकाधिक लोकांचा सहभाग असणारी लोकशाही आपल्याला हवी असेल तर, त्याची सुरुवात मतदार नोंदणीपासून होते. या विषयी समोर आलेले वास्तव स्वीकारून ते चित्र बदलावे म्हणून कृतिशील होणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. - मी माझ्या आजूबाजूच्या तरुण मुलांशी याविषयी बोलायचे ठरवले आहे; तुम्हीपण हा प्रयत्न कराल ?(hamid.dabholkar@gmail.com)

टॅग्स :Socialसामाजिकrelationshipरिलेशनशिप