शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

जरा झूल उतरवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:40 IST

मिलिंद कुलकर्णी संकटकाळात धावून येतो, मदत करतो तो आयुष्यभरासाठी लक्षात राहतो, असे म्हणतात. या सुविचाराचा प्रत्यय ह्यकोरोनाह्णच्या निमित्ताने सगळ्यांना ...

मिलिंद कुलकर्णीसंकटकाळात धावून येतो, मदत करतो तो आयुष्यभरासाठी लक्षात राहतो, असे म्हणतात. या सुविचाराचा प्रत्यय ह्यकोरोनाह्णच्या निमित्ताने सगळ्यांना येत आहे. नातलग, जिवाभावाचे मित्र, विचार-वाद यामुळे घनिष्ट संबंध तयार झालेले नेते-कार्यकर्ते हे ह्यशारीरिक अंतराह्णच्या नियमामुळे दुरावले आहेत. प्रगत तंत्रज्ञानामुळे किमान दर्शन व ध्वनीद्वारे निकटता येत आहे, तेवढाच दिलासा आहे.कोरोना पूर्व आणि कोरोना पश्चात अशी नवीन संस्कृती आता जगभर अस्तित्वात येणार आहे. कोरोना पश्चात संस्कृतीचे नीती-नियम अद्याप ठरायचे असले तरी त्याविषयी संकेत जाणवू लागले आहे. कोरोना पूर्व काळात भारतीय संस्कृती ही आतिथ्यशील मानली जात होती. आता काय आहे, नातलग जरी असला तरी तो येऊ नये, अशी मनोमन इच्छा असते. परदेश, परराज्यातील नातलग, मित्र आला तरी प्रशासकीय यंत्रणा त्याला आधी क्वारंटाईन करते. नंदुरबार जिल्ह्यातील श्रमिक मंडळी गुजराथमधून परत आली, मात्र त्यांना गावात घेण्यापूर्वी गावाबाहेर, शेतात १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले. भेद याठिकाणीही आहे. श्रीमंतांसाठी विलगीकरण कक्ष आहेत, गरिबांसाठी माळरान आहे. नवीन संस्कृती उदयाला येत असली तरी भेदाभेदसारखे दुर्गुण मात्र कायम राहिले आहेत.ह्यकोरोनाह्णच्या संकटात माणुसकी शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न पडत असताना उत्तर प्रदेशातील महिलेची प्रसुती करण्यासाठी कवी कासार हा राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता पुढे येतो आणि कन्यारत्न जन्माला येते. संघाचे पदाधिकारी डॉ.विलास भोळे सहाय्यभूत ठरतात. त्याच जळगावात ५० दिवसांच्या लॉकडाऊनने वडील आणि भावाचा रोजगार बुडाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या तरुणीने गळफास घेऊन जीवन संपविले. शासकीय विभाग, सामाजिक संघटनांनी अन्नछत्र उघडूनदेखील भूकबळी कसे होतात? कुठेतरी समन्वय कमी पडतोय काय, असे या घटनेतून जाणवले.नंदुरबार- धुळ्यात स्थलांतरित कामगारांसाठी मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे या आदिवासी समाजासाठी झटणाऱ्या नेत्या प्रयत्नशील आहेत. गुजराथ व मध्य प्रदेशातून आदिवासी बांधव यावेत, यासाठी शिंदे यांनी मंत्री व प्रशासनाकडे पाठपुरावा केला. स्थलांतरितांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाटकर यांनी मध्य प्रदेशात ४८ तासांचे उपोषण केले. गेल्या दोन दिवसांपासून धुळ्यात थांबून त्या उपाययोजनांवर चर्चा करीत आहे. परप्रांतीय कामगारांना राज्य सरकार केवळ त्या राज्याच्या सीमेवर सोडत असताना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवा, अशी त्यांची मागणी आहे. समाजाविषयीची कळकळ, तळमळ यातून दिसून येते.या पार्श्वभूमीवर अधिकार, पदांची झूल पांघरलेल्या मंडळींच्या अस्तित्वाची खरी कसोटी आहे. वर्षभरापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात संपूर्ण समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, अध्यात्म, वैचारिक आणि मतदानाच्या आदल्या रात्री आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने झटणाºया भावी लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांची कळकळ किती फोल होती, हे कोरोनाच्या संकटकाळात दिसून येते. समाजमाध्यमांवर सक्रीय असलेली ही मंडळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी मात्र अदृश्य आहे. एका कार्यकर्त्याला सहज विचारले, बाबा रे आता तुझी समाजकार्याची उर्मी कशी जागृत होत नाही. तेव्हा तो विनयशील स्वरात म्हणाला, आम्ही ठरवलेय, आमचे नेते जोवर घरातून बाहेर पडत नाही, तोवर आम्ही पण पडणार नाही.समाजाच्या कल्याणाची कळकळ वर्षभरापूर्वी वाटणाºया या मंडळींनी सरड्यासारखा रंग बदललेला दिसला. लोकांना केवळ धीर, आधार हवा आहे. संकट कोसळल्यावर ह्यलढ म्हणाह्ण असा आपुलकीचा शब्द हवा आहे. पण त्यापासून लोक वंचित आहे.प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी, परिचारिका हे सध्याचे खरे हिरो आहेत. हजाराहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. प्रशासकीय अधिकारी, डॉक्टरदेखील कोरोनापासून बचावलेले नाही. पण धीरोदात्तपणे ते संकटाशी मुकाबला करीत आहेत. वाद असतील, नियोजनातील गोंधळ असेल, साधनसामुग्रीची कमतरता असेल, निधीचा ठणठणाट असेल पण इच्छाशक्ती दांडगी आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी समाजाने स्वयंशिस्त, संयम पाळायला हवा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव