शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

जरा झूल उतरवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:40 IST

मिलिंद कुलकर्णी संकटकाळात धावून येतो, मदत करतो तो आयुष्यभरासाठी लक्षात राहतो, असे म्हणतात. या सुविचाराचा प्रत्यय ह्यकोरोनाह्णच्या निमित्ताने सगळ्यांना ...

मिलिंद कुलकर्णीसंकटकाळात धावून येतो, मदत करतो तो आयुष्यभरासाठी लक्षात राहतो, असे म्हणतात. या सुविचाराचा प्रत्यय ह्यकोरोनाह्णच्या निमित्ताने सगळ्यांना येत आहे. नातलग, जिवाभावाचे मित्र, विचार-वाद यामुळे घनिष्ट संबंध तयार झालेले नेते-कार्यकर्ते हे ह्यशारीरिक अंतराह्णच्या नियमामुळे दुरावले आहेत. प्रगत तंत्रज्ञानामुळे किमान दर्शन व ध्वनीद्वारे निकटता येत आहे, तेवढाच दिलासा आहे.कोरोना पूर्व आणि कोरोना पश्चात अशी नवीन संस्कृती आता जगभर अस्तित्वात येणार आहे. कोरोना पश्चात संस्कृतीचे नीती-नियम अद्याप ठरायचे असले तरी त्याविषयी संकेत जाणवू लागले आहे. कोरोना पूर्व काळात भारतीय संस्कृती ही आतिथ्यशील मानली जात होती. आता काय आहे, नातलग जरी असला तरी तो येऊ नये, अशी मनोमन इच्छा असते. परदेश, परराज्यातील नातलग, मित्र आला तरी प्रशासकीय यंत्रणा त्याला आधी क्वारंटाईन करते. नंदुरबार जिल्ह्यातील श्रमिक मंडळी गुजराथमधून परत आली, मात्र त्यांना गावात घेण्यापूर्वी गावाबाहेर, शेतात १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले. भेद याठिकाणीही आहे. श्रीमंतांसाठी विलगीकरण कक्ष आहेत, गरिबांसाठी माळरान आहे. नवीन संस्कृती उदयाला येत असली तरी भेदाभेदसारखे दुर्गुण मात्र कायम राहिले आहेत.ह्यकोरोनाह्णच्या संकटात माणुसकी शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न पडत असताना उत्तर प्रदेशातील महिलेची प्रसुती करण्यासाठी कवी कासार हा राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता पुढे येतो आणि कन्यारत्न जन्माला येते. संघाचे पदाधिकारी डॉ.विलास भोळे सहाय्यभूत ठरतात. त्याच जळगावात ५० दिवसांच्या लॉकडाऊनने वडील आणि भावाचा रोजगार बुडाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या तरुणीने गळफास घेऊन जीवन संपविले. शासकीय विभाग, सामाजिक संघटनांनी अन्नछत्र उघडूनदेखील भूकबळी कसे होतात? कुठेतरी समन्वय कमी पडतोय काय, असे या घटनेतून जाणवले.नंदुरबार- धुळ्यात स्थलांतरित कामगारांसाठी मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे या आदिवासी समाजासाठी झटणाऱ्या नेत्या प्रयत्नशील आहेत. गुजराथ व मध्य प्रदेशातून आदिवासी बांधव यावेत, यासाठी शिंदे यांनी मंत्री व प्रशासनाकडे पाठपुरावा केला. स्थलांतरितांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाटकर यांनी मध्य प्रदेशात ४८ तासांचे उपोषण केले. गेल्या दोन दिवसांपासून धुळ्यात थांबून त्या उपाययोजनांवर चर्चा करीत आहे. परप्रांतीय कामगारांना राज्य सरकार केवळ त्या राज्याच्या सीमेवर सोडत असताना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवा, अशी त्यांची मागणी आहे. समाजाविषयीची कळकळ, तळमळ यातून दिसून येते.या पार्श्वभूमीवर अधिकार, पदांची झूल पांघरलेल्या मंडळींच्या अस्तित्वाची खरी कसोटी आहे. वर्षभरापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात संपूर्ण समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, अध्यात्म, वैचारिक आणि मतदानाच्या आदल्या रात्री आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने झटणाºया भावी लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांची कळकळ किती फोल होती, हे कोरोनाच्या संकटकाळात दिसून येते. समाजमाध्यमांवर सक्रीय असलेली ही मंडळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी मात्र अदृश्य आहे. एका कार्यकर्त्याला सहज विचारले, बाबा रे आता तुझी समाजकार्याची उर्मी कशी जागृत होत नाही. तेव्हा तो विनयशील स्वरात म्हणाला, आम्ही ठरवलेय, आमचे नेते जोवर घरातून बाहेर पडत नाही, तोवर आम्ही पण पडणार नाही.समाजाच्या कल्याणाची कळकळ वर्षभरापूर्वी वाटणाºया या मंडळींनी सरड्यासारखा रंग बदललेला दिसला. लोकांना केवळ धीर, आधार हवा आहे. संकट कोसळल्यावर ह्यलढ म्हणाह्ण असा आपुलकीचा शब्द हवा आहे. पण त्यापासून लोक वंचित आहे.प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी, परिचारिका हे सध्याचे खरे हिरो आहेत. हजाराहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. प्रशासकीय अधिकारी, डॉक्टरदेखील कोरोनापासून बचावलेले नाही. पण धीरोदात्तपणे ते संकटाशी मुकाबला करीत आहेत. वाद असतील, नियोजनातील गोंधळ असेल, साधनसामुग्रीची कमतरता असेल, निधीचा ठणठणाट असेल पण इच्छाशक्ती दांडगी आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी समाजाने स्वयंशिस्त, संयम पाळायला हवा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव