शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खालेल्लं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
3
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
4
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
5
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
6
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
7
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
8
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
9
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
10
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
11
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
12
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
13
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
14
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
15
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
16
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
18
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
19
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

स्वीडन ते मुंबई ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’

By गजानन दिवाण | Updated: September 21, 2019 11:29 IST

विकासाच्या नावाखाली आपण निसर्ग संपविण्याच्या विडा उचलला आहे.

- गजानन दिवाण (उपवृत्तसंपादक, लोकमत)

विकासाच्या नावाखाली आपण निसर्ग संपविण्याच्या विडा उचलला आहे. त्यामुळे सध्या दररोज किमान २०० वनस्पती आणि कीटकांच्या प्रजाती नामशेष होत आहेत. विनाशाचा हा वेग असाच राहिला तर जीवसृष्टीच नष्ट होईल, असा इशारा युनोने दिला आहे. जीवसृष्टीच नष्ट झाली तर केलेल्या विकासाचा उपयोग तो काय? हा विचार आज ना राज्यकर्ते करतात ना सर्वसामान्य माणूस म्हणून आपण सारे. असे असले तरी उद्याचे भविष्य असलेल्या मुलांमध्ये तो होतो आहे. म्हणूनच तर स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग ही मुलगी पृथ्वीची विनाशाकडे होत असलेली वाटचाल रोखण्यासाठी काही तरी करा अशी साद घालत आॅगस्ट २०१८ पासून सलग ३ आठवडे स्वीडनच्या संसदेसमोर बसली. पुढे ती दर शुक्रवारी स्वीडनच्या संसदेबाहेर बसू लागली. आज तिच्या ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ या आंदोलनात जगभरातील शंभराहून अधिक देशांतील लाखो मुलं सहभागी झाली आहेत. महाराष्ट्रातही यात मागे नाही. म्हणूनच स्वीडन ते मुंबईचा हा प्रवास आशावादी आहे.

मूळचा अमरावती जिल्ह्यातला रहिवासी असलेला आणि आता सध्या मुंबईत राहणारा २४ वर्षांचा निखिल काळमेघ सध्या याच आंदोलनाचा भाग आहे. अन्न, पाणी आणि हवा या माणसाच्या मूळ गरजा. प्रदूषणामुळे त्याच धोक्यात आल्या. कोल्हापुरात ओला दुष्काळ असताना मराठवाडा कोरड्या दुष्काळाशी लढताना यंदा सर्वांनीच पाहिला. एकट्या महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत १२ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका गरिबांना विशेषत: शेतकऱ्यांना बसतो.

यातून सावरण्यासाठी ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)’च्या अहवालानुसार आपल्या हातात २०३० सालापर्यंतचाच वेळ आहे. त्यामुळेच ग्रेटाच्या ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ आंदोलनात १५ मार्च रोजी सहभागी झाल्याचे निखिल सांगतो. या लढाईत मुंबईतून तो एकटाच होता. निखिलने एकट्यानेच मंत्रालयासमोर आंदोलन केले. नंतर आपल्या कॉलेजसमोर, मरिन ड्राइव्हवर आंदोलन केले. आता मुंबईपासून ते पुण्यापर्यंत ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ आंदोलनात त्याने अनेकांना जोडले आहे. या ग्रुपमध्ये उदगीरपासून मुंबईपर्यंत आणि अमरावतीपासून कोल्हापूरपर्यंत राज्यभरातील हजारो युवक-विद्यार्थी जोडले गेले आहेत.

मुंबईत निखिलनंतर या आंदोलनाशी जोडली गेलेली पूजा दोमडिया म्हणाली, विकासामुळे आपले आणि आपल्या मुलांचे जगणे अवघड झाले आहे. मरणदेखील सोपे राहिले नाही. पृथ्वीला आणि ओघाने स्वत:ला संपविणारा हा विकास कशासाठी, हा तिचा सवाल. त्यामुळे वातावरणातील बदलाचा फटका मला बसणार नाही, असे म्हणणे वेडेपणाचे आहे. ते रोखायचे असेल तर प्रत्येकाने जागृत होऊन याकडे पाहिले पाहिजे, असे ती सांगते. एप्रिल महिन्यापासून मुंबईत कुठल्या तरी एका भागात ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ आंदोलनांतर्गत दर शुक्रवारी एक जनजागृती कार्यक्रम घेतला जातो. तेव्हापासून एकाही शुक्रवारी यात खंड पडला नाही. हे इतर कोणासाठी नाही, तर स्वत:साठीचे आंदोलन असल्याचे ती सांगते. या आंदोलनांतर्गत २० सप्टेंबरपासून पुढे आठवडाभर शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन, रॅली, जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत. त्याची सुरुवात पहिल्याच दिवशी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे मोठ्या संख्येने झाली आहे. अनेक शाळांनी यात सहभाग नोंदविला आहे. प्रत्येक गावातून-शाळेतून यात सहभाग वाढला पाहिजे, ही तिची अपेक्षा.

कोल्हापुरातही काही संवेदनशील कार्यकर्ते ग्रेटाच्या आंदोलनाने प्रभावित झाले. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून शाळा-महाविद्यालयांत जनजागृती सुरू केली आहे. पर्यावरणातील बिघाडांना जबाबदार असणाºया आपण सर्वांनी या मुलांची हाक ऐकून एक तरी पाऊल टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ आंदोलनात सहभागी होऊ या, असे आवाहन कोल्हापूरचा नितीन डोईफोडे करतो.पुण्याचा शुभम हाळ्ळे हा एसपी कॉलेजचा विद्यार्थी. तो पर्यावरणाशी निगडित अनेक संस्थांसोबत काम करतो. तो मूळचा उदगीरचा. आजी-आजोबा तिथेच राहतात. अधूनमधून येणे-जाणे होत असल्याने मराठवाड्याचा दुष्काळ जवळून अनुभवला असल्याचे तो सांगतो. मुंबईत महाविद्यालयात शिकत असतानाच पॅरिस करार झाला. तेव्हापासून तो पर्यावरणाशी जोडला गेला आहे. पुण्यात प्रत्येक शाळेत, प्रत्येक मुलापर्यंत हे आंदोलन पोहोचविण्यासाठी तो व त्याचे सहकारी झटत आहेत. पुण्यात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे. कसे परडवडेल हे आम्हाला, हा त्याचा सवाल. सार्वजनिक वाहनांचा वापर करावा हे आम्ही शाळेत वाचले आणि तिथेच सोडून दिले. आता स्वत:ला आणि पृथ्वीला वाचवायचे असेल तर या गाड्यांच्या संख्येवर निर्बंध यायला हवेत, असे तो म्हणतो.पृथ्वीला नव्हे तर स्वत:ला वाचविण्यासाठी ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ हे आंदोलन असल्याची जाणीव अनेकांना झाली आहे. आपल्याच कृतीमुळे होणारा निसर्गाचा कोप रोखायचा असेल, तर ही जाणीव प्रत्येकामध्ये व्हायला हवी. तेव्हाच सर्वांचे भविष्य उज्ज्वल असेल. अन्यथा सर्वांचाच विनाश अटळ आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणpollutionप्रदूषणStudentविद्यार्थी