शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 07:11 IST

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना दिलेल्या सल्ल्यामुळे समस्या सुटण्याऐवजी वाढल्या आहेत. राज्यपालांच्या 'कृती'कडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही.

कपिल सिब्बलराज्यसभा खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ

राष्ट्रपतींच्या विचारणीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या उत्तरामुळे संबंधित समस्येचे निराकरण न होता उलट अधिकच प्रश्न निर्माण झाले आहेत. न्यायालयाचे स्पष्टीकरण घटनात्मक दृष्ट्वा सदोष आणि राजकीय दृष्ट्या तापदायक ठरले आहे. परंतु प्रथम या घटनापीठाने केलेल्या उचित गोष्टी पाहू. राज्य विधानसभेने मंजूर केलेले विधेयक राज्यपाल किंवा राष्ट्रपती अमर्याद काळ रोखू शकत नाहीत, असे या घटनापीठाने स्पष्ट केले आहे. वस्तुतः हे उघडच होते. सर्वोच्च न्यायालय याबाबत अन्य भूमिका घेऊच शकले नसते.

वाजवी कारण नसताना, राज्यपाल किंवा राष्ट्रपर्तीनी एखादे विधेयक दीर्घकाळ अनिर्णीत ठेवले तर केवळ विलंब याच मुद्द्यावर न्यायिक पुनरावलोकनाची मागणी करता येईल हेही न्यायालयाने स्पष्ट केले. परंतु न्यायालयाने राष्ट्रपतींना दिलेल्या सल्ल्यामुळे काही घटनात्मक आणि राजकीय समस्या निर्माण होतात. त्यापैकी घटनात्मक समस्या अशा :

१) हा सल्ला देशाच्या संघराज्यात्मक संरचनेवर नकारात्मक परिणाम घडवतो.२) त्यानुसार प्रथम राज्यपाल आणि नंतर राष्ट्रपती यांचे 'व्यक्तिगत समाधान' हे न्यायालयीन निर्णयाच्या कक्षेत येत नाही.३) राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्या कार्यकारी आदेशाच्या आधारे लोकेच्छेच्या अंमलबजावणीला अवाजवी विलंब लावून राज्य विधिमंडळाचे निर्विवाद अधिकार निष्फळ केले जाऊ शकतात.

राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीतील दुसऱ्या यादीत नमूद केल्याप्रमाणे निव्वळ राज्याच्या अधिकारात असलेल्या कोणत्याही विषयावर कायदे बनवण्याचा राज्य विधिमंडळाला घटनादत्त अधिकार आहे. एखादे विधेयक राज्य विधिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी रोखून धरणे हे देशाच्या संघराज्यीय संरचनेशी विसंगत आहे. समजा विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती करण्याचा राज्यपालांचा अधिकार काढून घेण्याची कायदादुरुस्ती करणारे एक विधेयक राज्य विधिमंडळाने मंजूर केले. राज्यपालांना हा अधिकार मुळात विधिमंडळानेच दिलेला असल्याने तो काढून घेण्याचा पूर्ण अधिकार राज्य विधिमंडळाला आहे.

अशा विधेयकाची मंजुरी रोखून ठेवण्याचा स्वेच्छाधिकार राज्यपालांना असूच शकत नाही. तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या या सल्ल्यानुसार राज्यपालांना तशी मुभा दिली गेलेली आहे. राज्य विधिमंडळाच्या विधेयकात प्रतिबिंबित झालेली लोकेच्छा दडपण्याचे कार्यकारी अधिकार कायद्यानुसार राज्यपालांना नाहीत. एखादे विधेयक राज्यपालांना सादर होताच त्यांनी एक तर ते मंजूर केले पाहिजे किंवा त्यात दुरुस्ती सुचवली पाहिजे. पुनर्विचारांती, ते विधेयक दुरुस्त्यांसह किंवा शिवाय, राज्यपालांना पुनश्च सादर केले गेले तर मात्र त्याची मान्यता त्यांना रोखता येत नाही. याबाचत याहून वेगळा सल्ला देण्याचा कोणताही घटनात्मक अवकाश न्यायालयाला उपलब्ध नाही. तरीही या सल्ल्यात न्यायालयाने मान्य केलेले दिसते की, विधिमंडळाने विधेयक परत पाठवल्यानंतरही राज्यपाल त्याची मान्यता रोखून धरू शकतात किंवा ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. आपल्या देशाच्या संघराज्यीय संरचनेवरचा हा आणखी एक आघात होय.

वरील सल्ल्यानुसार राज्यपाल अगर राष्ट्रपती यांचे व्यक्तिगत समाधान हे न्यायालयाच्या कक्षेत येत नाही. सदर सल्ल्याला कोणतीही घटनात्मक पूर्वपीठिका नाही, जनतेच्या इच्छेचे प्रतिबिंब असलेल्या विधेयकाच्या संदर्भात तर नाहीच नाही. प्रत्यक्ष जनतेच्या इच्छेला कार्यकारी प्रमुखाने केलेल्या विरोधाला न्यायालयात आव्हान देता येणार नाही असा याचा अर्थ होतो.

आता आपण या सल्ल्यातून उ‌द्भवणाऱ्या हानिकारक राजकीय परिणामांचा विचार करू. विधिमंडळाने विधेयक संमत करून पाठवल्यानंतर राज्यपाल ते किती काळ अनिर्णीत ठेवू शकतात हे न्यायालयाने राष्ट्रपतींना दिलेल्या सल्ल्यातून स्पष्ट होत नाही. किती उशीर म्हणजे प्रचंड उशीर हे स्पष्ट होत नाही. दीर्घ विलंब या संज्ञेचा अर्थही स्पष्ट होत नाही. तथ्ये आणि परिस्थिती यांच्या आधारे हे मुद्दे कसे ठरवले जातात हेही कळत नाही.

राज्यपालांच्या संमतीला का विलंब लागतो, राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवणे का आवश्यक ठरावे किंवा संबंधितांना आपल्या विरोधाची कारणे देणे बंधनकारक का नसावे अशा कुठल्याच प्रश्नांची उत्तरे या न्यायालयीन सल्ल्यातून मिळत नाहीत. न्यायालयीन प्रक्रिया धीम्या असतात, त्या विलंब लावतात. त्यामुळे संबंधित कायद्यांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम नक्कीच होणार.

गंभीर राजकीय परिणाम होतील ते वेगळेच. राज्यपालांच्या निवडक क्रियाशीलतेचे आणि निष्क्रियतेचे जाहीर दर्शन घडत असताना न्यायालय त्यातील वास्तवाकडे डोळेझाक करू शकत नाही.

खेदाने म्हणावे लागते की, राष्ट्रपतींच्या मागणीवरून न्यायालयाने दिलेला सल्ला हा पुरेसा विचारपूर्वक दिलेला नाही. लोकेच्छा दर्शविणाऱ्या विधेयकांच्या मंजुरीबाबत निःसंदिग्ध स्पष्टता देणे दूरच, तो उलट अनिश्चिततेत भर टाकतो. राज्यपालांच्या प्रदीर्घ निष्क्रियतेच्या पार्श्वभूमीवर, मंजुरीबाबत निश्चितता प्रदान करणारा सर्वोच्च न्यायालयाचा अलीकडचाच स्वागतार्ह निर्णय याद्वारे उलटवला गेला आहे ही अत्यंत खेदाची गोष्ट होय.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court's advice: Less answer, more confusion, political uncertainty increased.

Web Summary : The Supreme Court's advice on pending bills has sparked constitutional and political concerns, impacting federal structure and potentially delaying implementation of laws. Ambiguity persists regarding timelines and reasons for delays, raising questions about governors' roles and legislative authority.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत